शहरं
Join us  
Trending Stories
1
"जाऊ दे यार, कामाचं बोला"; राज-उद्धव एकत्र येण्याच्या प्रश्नावर एकनाथ शिंदे चिडले
2
कॅनडात बस स्टॉपवर भारतीय तरुणीची गोळीबारात हत्या; हल्लेखोरांना दुसऱ्यावर चालवायची होती गोळी
3
Vaibhav Suryavanshi : "छोटा पॅक बडा धमाका"! पहिल्याच बॉलवर सिक्सर.. तेही लॉर्ड शार्दुल ठाकूरसमोर
4
IPL 2025 GT vs DC : बटलर इज बॉस! दिल्ली कॅपिटल्सला पराभूत करत गुजरात टायटन्सनं रचला इतिहास
5
"देशात धार्मिक युद्ध भडकवण्यासाठी सुप्रीम कोर्ट जबाबदार"; मर्यादेबाहेर जाताय म्हणत भाजप खासदाराची टीका
6
वाळूमाफियांची आता खैर नाही! नियमांचे उल्लंघन केल्यास थेट डेपो होणार रद्द, सर्वांना नोटीस जारी
7
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेवर मनसे नेते नाराज? म्हणाले, “त्यांनी आम्हाला दोनदा फसवलेय”
8
8व्या वेतन आयोगाबाबत मोठी बातमी; सरकार या 35 पदांवर करणार नवीन नियुक्त्या
9
IPL 2025 Video: भरमैदानात झाला राडा !! इशांत शर्मा भडकला, आशुतोषवर बोट रोखलं, नेमकं काय घडलं?
10
राज ठाकरेंशी युती झाल्यास उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतून बाहेर पडणार का?; संजय राऊत म्हणाले...
11
Big Breaking: तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात अखेर डॉ. सुश्रुत घैसास यांच्यावर गुन्हा दाखल
12
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षीय वैभव सूर्यवंशी पदार्पणासह रचणार इतिहास; जाणून घ्या सविस्तर
13
Video - अग्निकल्लोळ! एका ठिणगीमुळे बोटीला भीषण आग; १४८ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
14
“मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमुळे राज ठाकरेंची उपयुक्तता सर्वांना वाटत आहे”: छगन भुजबळ
15
“राहुल गांधींचा ‘डरो मत’ संदेश अमलात आणू, एकता, अखंडतेची मशाल घेऊन वाटचाल करू”: सपकाळ
16
IPL 2025 Video: 'सुपरमॅन' कॅच! विपराजला हवा होता चौकार, पण जोस बलटरने हवेत उडत घेतला भन्नाट झेल
17
Maharashtra Politics : राज ठाकरे अन् उद्धव ठाकरे एकत्र येणार का? संजय राऊतांनी सगळंच सांगितलं
18
“इथले मीठ खाता अन् मराठीला विरोध करता? हिंदीची सक्ती होऊ देणार नाही”; उद्धव ठाकरेंनी ठणकावले
19
IPL 2025: चेन्नई सुपर किंग्जमध्ये आला 'बेबी एबी'; अशी आहे टी२० कारकीर्द

विवाहित माणूस ब्रह्मचारी असू शकतो का? हो! वाचा वसिष्ठ ऋषींची कथा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2021 12:15 IST

प्रापंचिक जबाबदाऱ्या सांभाळून अध्यात्मसाधना करणाऱ्या साधकाला ही विदेही अवस्था प्राप्त होऊ शकते!

'अवघा रंग एक झाला' या संत चोखामेळा यांच्या लोकप्रिय अभंगात एक ओळ आहे, `देही असोनि विदेही, सदा समाधिस्त राही' या ओळीचा फार मोठा गर्भितार्थ आहे. देहात राहूनही देह वासनांपासून अलिप्त राहणे, ही कला केवळ भक्तांनाच जमू जाणे. ते देहकर्म, देहधर्म करतात परंतु आत्मा प्रभू चरणांशी समाधिस्त ठेवतात. ही सिद्धी प्राप्त होण्यासाठी देवाशी समरसून जाणे संतांना अपेक्षित आहे, तेव्हाच तर अवघा रंग एक होईल! याबाबत एक कथा सांगता येईल, ती आहे वशिष्ठ ऋषी, अरुंधती आणि विश्वामित्र ऋषींची!

नदीच्या एका तीरावर वशिष्ठमुनींचा तपश्चर्येने सजलेला, फुललेला आणि डवरलेला आश्रम होता. एक दिवस हे महामुनी आपल्या धर्मपत्नीला म्हणाले, 'अरुंधती, आज सुग्रास भोजन कर आणि ते भोजन समोरील तीरावर घेऊन ये. बऱ्याच काळानंतर विश्वामित्रांची तपश्चर्या आज संपणार आह़े  त्यांना भूक लागलेली असेल. मी पुढे होतो, तूही लवकर ये'

पतीआज्ञेप्रमाणे अरुंधतीने पाकसिद्धी केली आणि नदीच्या त्या तीरावर जाणार तर नदीला पूर आलेला. वसिष्ठांनी पलिकडून पाहिले आणि तिचे भाव ओळखत म्हणाले, 'घाबरतेस काय? नदीला प्रार्थना कर, माझे पती ब्रह्मचारी असतील तर मला वाट करून दे!'

अरुंधती गोंधळली. लग्न होऊन हे ब्रह्मचारी कसे? तिने नदीला विनंती केली आणि काय आश्चर्य, नदीने वाट मोकळी करून दिली. अरुंधती पलीकडे पोहोचली. तिने विश्वामित्रांना जेऊ घातले. पोटभर जेवण झाले. वसिष्ठ निघून गेले होते. अरुंधतीने नदीला पूर आल्याचे सांगत विश्वामित्रांना उपाय विचारला. विश्वामित्र म्हणाले, 'देवी, नदीला सांग, विश्वामित्र आताच्या क्षणापर्यंत उपाशी असतील तर मला वाट करून दे!'

पोटभर जेवलेल्या विश्वामित्रांचे बोल ऐकून अरुंधती पुन्हा गोंधळली. तिने दिलेला उपाय ऐकला, नदीनेही तिचे ऐकले, अरुंधती स्वगृही पोहोचली. दिवसभर विचार करत बसलेली अरुंधती सायंकाळी वसिष्ठ परत आल्यावर विचारती झाली, `तुम्ही विवाहित असून, स्वत:ला ब्रह्मचारी म्हणवता, विश्वामित्र जेवून स्वत:ला उपाशी म्हणवतात आणि नदीला हे पटते व ती वाट मोकळी करते, हे काय गौडबंगाल आहे? मला काहीच कळले नाही.'

त्यावर हसून वसिष्ठ सांगतात, 'अगं देहबुद्धीने केलेले कर्तव्य वेगळे आणि आत्मबुद्धीचे कर्म वेगळे. तू आमच्या देहबुद्धीचा आणि देहधर्माचा विचार करत होतीस परंतु आम्ही आत्मशक्तीच्या आणि आत्मकर्माच्या बळावर नदीला आवाहन कर असे सांगितले. आमच्या आत्मबुद्धीच्या पावित्र्याची साक्ष नदीला पटल्यामुळे तिने मार्ग मोकळा केला. यालाच देही असोनि विदेही अवस्था म्हणतात.'

असाच प्रपंच संतांनीदेखील केला, परंतु देहबुद्धीने! आत्मबुद्धीने मात्र ते प्रभू चरणी समर्पित होते. आपल्याही या अवस्थेपर्यंत पोहोचायचे असेल, तर प्रापंचिक जबाबदाऱ्या पार पाडून मनाने अलिप्त होता आले पाहिजे, तसे करणे जमेल का?