शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
2
"गोली का जवाब गोले से...!"; गृह मंत्री अमित शाह यांची कश्मिरात गर्जना; विरोधकांवरही निशाणा
3
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
4
जरांगेंच्या तालावर मुख्यमंत्री नाचतात; ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
5
IND vs BAN : डोळ्याची पापणी लवण्याच्या आत खेळ खल्लास! यशस्वीनं घेतलेला भन्नाट कॅच बघाच (VIDEO)
6
"काशीचा प्रसाद मिळाला, तेव्हा माझ्या मनात तिरुपतीचा विचार आला", लाडू वादावर माजी राष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता
7
IND vs BAN : Rishabh Pant चे झंझावाती शतक! गर्लफ्रेंड ईशाने मानले आभार, म्हणाली...
8
LLC 2024 : इरफान पठाणची जादू अन् विजयी सलामी; जुन्या आठवणींना उजाळा, भज्जीचा संघ हरला
9
BSNL नं जिओ, एअरटेल, Vi ला दिला 'जोर का झटका'; एकाच महिन्यात वाढले लाखो ग्राहक
10
'खोसला का घोसला'मधील लोकप्रिय अभिनेत्याचा भीषण अपघात, ICU त उपचार सुरु
11
काय सांगता! ६०० ब्राह्मण करतात तिरुपतीचा प्रसाद; १ लाख लाडू रामलला चरणी केले होते अर्पण
12
Leela Palace IPO: पैशांची व्यवस्था करून ठेवा! आता दिग्गज हॉटेल ब्रँडचाही येणार IPO; पाहा डिटेल्स
13
"पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलाचा मृत्यू झाला असता तर आरोपीला ३० मिनिटांत जामीन दिला असता का?"
14
हिज्बुल्लाहची झोप उडवणाऱ्या कंपनीची CEO असणारी ही फिल्मी महिला आहे तरी कोण? 
15
तिरुपती बालाजींवर कुबेराचे ऋण; आजही भाविक फेडतात कर्ज! वाचा, लाडू प्रसादम अद्भूत गोष्टी
16
IND vs BAN : शुबमन गिलची कमाल! शतकी खेळीसह द्रविड-कोहलीसह रुट-बाबरला धोबी पछाड!
17
पॅसेन्जरच्या जेवणात निघाला जिवंत उंदीर, कराव लागलं विमानाचं इमरजन्सी लॅन्डिंग; नेमकं काय घडलं?
18
पितृपक्षात महालक्ष्मी गजकेसरी योग: ९ राशींना वरदान काळ, सर्वोत्तम संधी; लाभच लाभ, शुभ होईल!
19
मशिदीचे अतिक्रमित बांधकाम स्वतःहून काढण्यासाठी विश्वस्तांनी मागितली मुदत
20
३ महिन्यांपासून थंडावलेले डिफेन्स कंपन्यांचे स्टॉक्स; आता जोरदार तेजी; एकात लागलं अपर सर्किट

चाणक्य नीती : वय, कर्म, धन अन्...; आईच्या गर्भातच निश्चित होतात माणसाच्या जीवनातील 'या' ५ गोष्टी

By श्रीकृष्ण अंकुश | Published: August 19, 2024 12:56 PM

आचार्य चाणक्य हे इतिहासातील एक असे व्यक्तिमत्व होते, ज्याने हाती शस्त्र न घेता, केवळ बुद्धी आणि नीतीच्या बळावर भारताच्या इतिहासाला एक सुंदर दिशा दिली. आर्य चाणक्य यांनी धर्म, कर्म, समाजकारण, राजकारण, अर्थकारण आदी अनेक विषयांवर आपले विचार मांडले आहेत.

आचार्य चाणक्य हे नाव ऐकताच अशक्यही शक्य करून दाखवणाऱ्या एका अलौकिक आणि बुद्धिमान अशा युग पुरुषाची प्रतिमा डोळ्यांसमोर उभी राहते. आचार्य चाणक्य हे इतिहासातील एक असे व्यक्तिमत्व होते, ज्याने हाती शस्त्र न घेता, केवळ बुद्धी आणि नीतीच्या बळावर भारताच्या इतिहासाला एक सुंदर दिशा दिली. आर्य चाणक्य यांनी धर्म, कर्म, समाजकारण, राजकारण, अर्थकारण आदी अनेक विषयांवर आपले विचार मांडले आहेत. ते आपल्या नीतीशास्त्रामुळे सर्वपरिचित आहेत. त्यांच्या नीती 'चाणक्य नीती' म्हणून ओळखल्या जातात. त्यांचे विचार अथवा सिद्धांत आजही आपल्याला मार्गदर्शक ठरू शकतात.

चाणक्य म्हणतात -आयुः कर्म च वित्तं च, विद्या निधनमेव च।पञ्चैतानि हि सृज्यन्ते, गर्भस्थस्यैव देहिनः।। 

अर्थ - जीव जेव्हा आईच्या गर्भात येतो, तेव्हाच त्याचे वय, कर्म, धन, विद्या आणि मृत्यू या पाच गोष्टी निश्चित होऊन जातात.

आचार्य चाणक्य यांच्या मते, मानवाच्या जीवनातील काही गोष्टी आधीपासूनच निश्चित असतात. जसे, एखादी व्यक्ती किती वर्षांपर्यंत जगणार? ती कशाप्रकारचे कर्म करणार? तिला धनाची प्राप्ती कशी, केव्हा आणि किती होणार? तिचे शिक्षण कसे आणि किती होणार? इथपासून ते मृत्यूपर्यंत. अर्थात, आचार्य चाणक्य यांनी कर्मालाही अत्यंत महत्त्व दिले आहे. यामुळे व्यक्तीने कर्म करत राहायला हवे. कारण मानवी जीवनात कर्माला सर्वात वरचे स्थान देण्यात आले आहे. 

चाणक्य यांच्या मते, वरील पाच गोष्टी आधीपासूनच निश्चित असल्या तरी, व्यक्तीने कर्माचा त्याग करावा, असे त्यांनी कुठेही म्हटलेले नाही. हिंदू धर्मशास्त्रांतही, कर्माला सर्वाधिक महत्त्व देण्यात आले आहे. पण, असे असले तरी, एखादी व्यक्ती तिने ग्रहण केलेल्या विद्येनुसार आणि विवेकानुसारच चांगले-वाईट कर्म करत असते. भगवद्गितेतही भागवान श्रीकृष्णांनी कर्माचे महत्त्व विशद केले आहे...

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी