शहरं
Join us  
Trending Stories
1
...पण हे मराठ्यांचे आंदोलन आहे; मनोज जरांगे पाटलांचा अमित शाह यांना थेट इशारा
2
Akola: किरकाेळ वादातून आमदार नितीन देशमुख यांच्या पुत्राला मारहाण, पाेलिसांत तक्रार दाखल
3
अक्षय शिंदेवर अंत्यसंस्कार; उल्हासनगरातील शांतीनगर स्मशानभूमीला छावणीचे स्वरुप
4
Ratnagiri: गणपतीपुळे समुद्रात तिघे बुडाले; दाेघांचा मृत्यू, एकाला वाचविण्यात यश ​​​​​​​
5
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
6
"सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सोमवारी मिळणार अनुदानाची रक्कम’’, अजित पवार यांची घोषणा  
7
विधानसभा निवडणूक लढवलेला नेता निघाला कार चोरी करणाऱ्या टोळीचा सदस्य, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
8
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
9
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
10
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
11
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
12
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
13
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
14
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
15
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
16
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या
17
'वन नेशन-वन इलेक्शन'बाबत मोदी सरकार संसदेत विधेयक आणणार; अंमलबजावणी कधी होणार?
18
'प्रत्येक घरातून हिजबुल्ला निघणार', जम्मू-काश्मीरमध्ये उमटले नसरुल्लाहच्या मृत्यूचे पडसाद
19
भाजपा नेत्याच्या मुलानं उचललं टोकाचं पाऊल, संपवलं जीवन, या राज्यात खळबळ
20
AI चा गैरवापर! विद्यार्थ्यांनी अश्लील फोटो व्हायरल केले; महिला शिक्षिका नैराश्याच्या छायेत, FIR दाखल

Chanakyaniti: अपयशाला यशात बदलायचे असेल तर चाणक्यनीतीत सांगितलेले उपाय करा!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2024 12:59 PM

Chanakyaniti: अपयशाने खचून न जाता कम्बर कसून नव्या उमेदीने उभे राहणारे तुम्ही असाल तर आचार्य चाणक्य यांचा कानमंत्र खास तुमच्यासाठी!

आचार्य चाणक्य हे भारतातील सर्वोत्तम विद्वानांपैकी एक होते. चाणक्य यांनी लिहिलेली चाणक्य नीति ही सर्वात लोकप्रिय धोरणांपैकी एक मानली जाते. मनुष्यासाठी आदर्श जीवनाचा वस्तुपाठ आचार्यांनी घालून दिला आहे. छोट्यात छोट्या गोष्टींवर विचार करून नीतिमत्तेच्या गोष्टी सांगितल्या आहेत. यशापयशाचा विचार करता आचार्यांनी त्यावरही तोडगे दिले आहेत. अशा परिस्थितीत आपण चाणक्य नीतीच्या अशा काही उपयुक्त गोष्टी वाचूया ज्याद्वारे व्यक्ती जीवनात प्रगती करू शकते.

आचार्य चाणक्य यांनी आपल्या नीतिशास्त्रात अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्यांचा अवलंब करून कोणतीही व्यक्ती आपल्या जीवनात यश मिळवू शकते. त्यातील काही निवडक विषय पाहता अशा परिस्थितीत चाणक्यजींनी सांगितलेल्या काही गोष्टी जीवनात अवलंबून तुम्ही तुमच्या अपयशाचे यशात रूपांतर करू शकता.

आचार्य चाणक्य म्हणतात की यशस्वी होण्याचे पहिले सूत्र कठोर परिश्रम आहे. जर एखादी व्यक्ती आपल्या कामाप्रती प्रामाणिक असेल आणि कठोर परिश्रम करत असेल तर त्याच्यावर देवी लक्ष्मी आणि धनाची देवता भगवान कुबेर यांची कृपा राहते. त्यामुळे आपल्या जबाबदाऱ्या पूर्ण मेहनतीने पार पाडणे गरजेचे आहे आणि प्रयत्नांना उपासनेचे पाठबळ देणे आवश्यक आहे. 

आचार्य चाणक्य यांच्यानुसार, कोणत्याही व्यक्तीची कृती त्याच्या चांगल्या किंवा वाईट काळाचे कारण बनते. म्हणून माणसाने नेहमी सत्कर्म करत राहावे. तसेच, एखाद्या व्यक्तीने त्याच्या पदाचा आणि पैशाचा कधीही गर्व करू नये.

आचार्य चाणक्य यांनी आपल्या निती शास्त्रामध्ये सांगितले आहे की ज्या लोकांचे वागणे आणि बोलणे चांगले असते त्यांना जीवनात नक्कीच यश मिळते. या दोन्ही गोष्टी माणसाच्या यशाच्या मार्गात मोठी भूमिका बजावू शकतात. माणसाने आपल्या ध्येयाकडे लक्ष केंद्रित केले पाहिजे, तरच तो जीवनात यश मिळवू शकतो.

एखाद्या व्यक्तीला सुरुवातीच्या काळात यश मिळते हे फारच कमी आहे. ध्येय मोठे असताना सुरुवातीला अनेक अपयशांना सामोरे जावे लागते. या विषयाबाबत चाणक्य म्हणतात की, अपयशाची भीती ही आपल्या कल्पनेपेक्षा अधिक नसते. जर तुम्हाला तुमचे ध्येय साध्य करायचे असेल तर तुम्ही कठोर पावले उचलण्यास घाबरू नका.