शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर साळवींना उमेदवारी नाकारल्याने शिवडीत ठाकरे गटात नाराजी, राजीनामा देण्याची तयारी
2
महायुतीचा २७८ जागांचा फॉर्मुला ठरला; देवेंद्र फडणवीसांनी काढला मविआला चिमटा
3
काँग्रेसची ४८ जणांची पहिली उमेदवार यादी जाहीर; अनेक बड्या नेत्यांचा समावेश 
4
जस्टीस संजीव खन्ना होणार देशाचे पुढील सरन्यायाधीश; 11 नोव्हेंबरला पदभार स्वीकारणार...
5
"...तर मी येवल्यातून भुजबळांविरोधात निवडणूक लढवेन", सुहास कांदेंना शिंदे-फडणवीसांचा मेसेज काय?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; भाजपामधून आलेल्या तिघांना शरद पवारांनी दिली उमेदवारी
7
"त्यांचा इतिहासच गद्दारीचा, आईबापासोबतही..."; छगन भुजबळांचा कांदेंनी काढला इतिहास
8
गुलमर्गमध्ये लष्कराच्या वाहनावर दहशतवादी हल्ला, 5 जवान जखमी तर एका साथीदाराचा मृत्यू
9
अयोध्येतील 55 घाटांवर 28 लाख दिव्यांची रोषणाई; झळाळून निघणार श्रीराम जन्मभूमी...
10
'भ्रष्टाचार, गुन्हेगारी वाढली', उमेदवारी मिळताच युगेंद्र पवारांनी काकाविरोधात थोपाटले दंड
11
'मविआ'त सांगोला मतदारसंघ कोणाला? जयंत पाटील म्हणाले, "एक-दोन दिवसात..."
12
ना हडपसर, ना खडकवासला...ठाकरे गटात प्रवेश केलेले वसंत मोरेंचा पुढचा प्लॅन ठरला
13
इम्तियाज जलीलांची वेगळीच खेळी; ३ विधानसभा मतदारसंघातून घेतले अर्ज, लोकसभाही लढणार
14
NCP SP Candidate List : राष्ट्रवादी काँग्रेसची (शरद पवार) पहिली यादी जाहीर! कोणाची नावे?
15
पुण्यात ठाकरे गट बंडखोरी करणार?; हडपसर जागेवर राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला, तर...
16
कोरेगावमधून शशिकांत शिंदे; कऱ्हाड दक्षिणमधून अतुल भोसले यांनी भरला अर्ज 
17
शरद पवार गटाची पहिली यादी जाहीर; मराठवाड्यात कुणाला संधी? पाहा...
18
बारामतीत हाय व्होल्टेज सामना रंगणार: शरद पवारांकडून युगेंद्र पवारांना उमेदवारी; अजितदादांना भिडणार!
19
शिवडीत अजय चौधरींनाच पुन्हा उमेदवारी; मातोश्रीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचा निर्णय
20
"मला प्रेम करायचंय..."; वयाच्या २२ व्या वर्षीच 'या' अभिनेत्रीने केलंय फॅमिली प्लॅनिंग

आधी स्वत:ला तपासावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2020 2:09 AM

ईश्वराच्या कृपेइतकीच तळमळ समाजसेवेच्या व्रताची अंत:करणात असावी लागते. तेव्हा समाजातील ईश्वर आपल्यावर प्रसन्न होईल.

- मोहनबुवा रामदासीएक भक्त होता. तो प.पू. गोंदवलेकर महाराजांकडे गेला आणि म्हणाला ‘महाराज! हा समाज सुधारला पाहिजे हो! ही समाजाची दु:ख वेदना पहावत नाहीत हो! आपणच काहीतरी करा.’ प.पू. महाराजांनी त्याचे ते आवेशपुर्व बोलणं ऐकले आणि एवढेच म्हणाले, ‘समाजातील दु:खे योग्य वेळी कमी होतीलच. पण समाजातील ही दु:खे तुला खरेच कमी व्हावीत असे वाटत असेल तर तू तुझ्या दु:खाची भर त्यात टाकू नकोस...’ म्हणून यासाठी समर्थही म्हणतात ‘पहावे आपणासी आपण। या नाव ज्ञान।’ कोणत्याही समाजसुधारणेचा मूळ ज्ञानाचा अंकूर प्रत्येकाच्या अंत:करणात असतो. त्याचे संवर्धन विवेकसंपन्नतेने करता येणे अवश्यक आहे. दुसऱ्याला तपासण्यातच माणूस स्वत:ची युक्ती, शक्ती आणि बुद्धी वाया घालवतो. समर्थांनी समाजसुधारणेचा संकल्प रामापुढे केला व सुरवात स्वत:पासून केली. ते म्हणतातकेल्याने होत आहे रे। आधी केलेची पाहीजे।यत्न तो देव जाणावा। अंतरी धरता बरे।।समाज सुधारणेसाठी समर्थांचे खूप बोलके विचार पहा.शरीर परोपकारी लावावे। बहुतांचे कार्यास यावे।उणे पडो नेदावे। कोणी एकाचे।आडले जाकसले जाणावे। यथानुशक्ती कामास यावे।मृदूवचने बोलीत जावे। कोणी एकासी।।दुसºयाच्या दु:खे दुखवावे। परसंतोषे सुखी व्हावे।प्राणीमात्रास मेळवून घ्यावे। बºया शब्दे।।ही समर्थांची समाजसेवेची गीता आहे. म्हणून पंपू गोंदवलेकर महाराजही म्हणतात : ज्याने समाजसेवेचे व्रत घेतले असेल त्याने स्वत:भोवती एक प्रदक्षिणा घालावी. समाजातील प्रत्येक व्यक्तीच्या अंत:करणात त्या रामरायाचेच अस्तित्व आहे, या श्रद्धेने समाजसेवा करावी.समाजसेवा हीच खºया अर्थाने ईश सेवा असते. ईश्वराच्या कृपेइतकीच तळमळ समाजसेवेच्या व्रताची अंत:करणात असावी लागते. तेव्हा समाजातील ईश्वर आपल्यावर प्रसन्न होईल.