शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा फोटो समोर, ओळखही पटली, दोघे पाकिस्तानी तर दोघे स्थानिक
2
'आम्हाला न्याय हवाय', अमित शाहांना बघताच मृतांच्या नातेवाईकांच्या अश्रूंचा फुटला बांध
3
IPL 2025: भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध! ना फटाके, ना चीअरलीडर्स; खेळाडू, पंच बांधणार काळ्या फिती
4
"इथले सर्वजण प्रचंड घाबरलेत"; रुपाली पाटील ठोंबरे काश्मीरमध्ये अडकल्या, सरकारला केली विनंती
5
पहलगाम म्हणजे काश्मीराचा स्वर्ग; हिरव्यागार दऱ्या आणि खळकळणाऱ्या नद्या; पर्यटक का करतात हजारो खर्च?
6
हॉटेल बाहेर बसलेले, गोळी लागली,अर्धा तास मदत मिळाली नाही;पुण्यातील पर्यटकांसोबत नेमकं काय घडलं?
7
Terrorist Attack: महाजन श्रीनगरला रवाना, तीन मंत्री विमानतळावर; मुख्यमंत्री कार्यालयाने काय माहिती दिली?
8
Pahalgam Attack: हेच ते तीन नराधम! निरपराध भारतीयांचा जीव घेणाऱ्या दहशतवाद्यांचं चित्र प्रशासनाकडून जारी
9
Pahalgam Terror Attack: 'हा' आहे पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड! कटामध्ये तिघांचा समावेश
10
Pahalgam Attack : "न्याय मिळायलाच पाहिजे..."; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर विराट कोहली संतापला
11
लग्नाचा जल्लोष संपलाच नाही इतक्यात घरातून तिरडी उठणार; दहशतवादी हल्ल्यात शुभमचा मृत्यू
12
Pahalgam Attack Update : "लग्नानंतर त्याला स्वित्झर्लंडला जायचं होतं पण..."; ढसाढसा रडले आजोबा, गमावला एकुलता एक मुलगा
13
३ राजयोगात गुरुवारी वरुथिनी एकादशी: ७ राशींना शुभ फले, यशच यश; भरघोस भरभराट, पैसाच पैसा!
14
"हा देशातील दोन समाजांमध्ये वाद निर्माण होऊन देश अस्थिर करण्याचा कट’’, विजय वडेट्टीवार यांचा दावा   
15
Pahalgam Attack Update : पाकिस्तानच्या 'उरी' धडधड वाढली! सर्जिकल स्ट्राईकची भीती; रात्रीपासूनच हवाई दलाला केले ॲलर्ट
16
पहलगाम इथं पर्यटकांवर हल्ला करणारे दहशतवादी भारतात कसे घुसले?; समोर आला मार्ग
17
दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधील पर्यटनाचं काय होणार? स्थानिक लोकांचं सर्वाधिक नुकसान
18
Pahalgam Attack Update : "भाऊ, वहिनी मॅगी खात होते, गोळी लागताच रक्ताच्या थारोळ्यात..."; काळजात चर्र करणारी घटना
19
रिझर्व्ह बँकेनं छत्रपती संभाजीनगर येथील 'या' बँकेचा परवाना केला रद्द, जमा रकमेचं काय होणार? 
20
हृद्रयद्रावक! काश्मीर खोऱ्यात पतीच्या मृतदेहाशेजारी स्तब्ध पडून राहिली नवी नवरी

Children's Day 2022: 'लहानपण देगा देवा' असे तुकाराम महाराज का म्हणतात? बालदिनानिमित्त जाणून घेऊ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2022 11:51 IST

Children's Day 2022: असे बालपण एक दिवसापुरते नाही तर कायम स्वरूपी अंगीकारून घ्या, तुमचा निश्चितच उत्कर्ष होईल याची खात्री तुकोबा देतात!

आज बालदिनानिमित्त सोशल मीडिया बालपणीच्या फोटोंनी, आठवणींनी, गाण्यांनी भरून गेले आहे. हे बालपण हवेहवेसे का वाटते आणि ते का जपले पाहिजे? संतांच्या मनावरही बालपणीचे गारुड का होते, चला जाणून घेऊ!

लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा।

तुकाराम महाराजांच्या या अभंगातल्या ओळी आपण अनेकदा वेगवेगळ्या आशयाने वापरतो. आज पूर्ण अभंगाचे रसग्रहण करू. तुकोबा राय लहानपण मागतात, का आणि कशासाठी? एक तर आयुष्याची नव्याने सुरुवातीपासून सुरुवात करता यावी आणि दुसरी गोष्ट म्हणजे लहानपणी सगळे अपराध पोटात घातले जातात. लहान म्हणून प्रत्येक गोष्टीत मुभा मिळतो. सोबतच कानउघडणीदेखील केली जाते, मात्र त्यावेळी झालेल्या चुकांना अपराधाचे लेबल लावले जात नाहीत, तर मोठ्या मनाने क्षमा केली जाते. म्हणून वयाने, पदाने, परिस्थितीने कितीही मोठे झालात तरी मनाने, आचरणाने लहानच राहा असे तुकोबा रायांना सुचवायचे आहे. याचे उदाहरण देताना महाराज म्हणतात, एखाद्या घरात बलाढ्य हत्ती प्रवेश करू शकत नाही, पण छोटीशी मुंगी प्रवेश करते आणि साखरेची गोडीही विनासायास चाखते. तशी नम्रता बाळगायला शिका. 

ऐरावत रत्न थोर, त्यासी अंकुशाचा मार।

हत्ती दिसताच आपण कुतूहलाने बघायला जातो. त्याची ऐट पाहण्यासारखी असते. सगळ्यांच्या नजरा त्याच्यावर रोखलेल्या असतात. मात्र हा विशाल ऐरावत माहुताच्या अंकुशाखाली असतो. त्याची टोचणी त्याला सहन करावी लागते. याचाच अर्थ, मोठे पद, सत्ता यांची इच्छा धरताना त्याबरोबर येणारे आव्हान, जबाबदाऱ्या, टक्के टोणपे सहन करण्याची क्षमता ठेवावी लागते. ऐरावत होणे सोपे नाही, त्यापेक्षा मुंगी होऊन साखर खा असे तुकोबा आपल्याला सुचवतात. 

जया अंगी मोठेपण,तया यातना कठीण।

बालपणी आपल्याला कधी एकदा मोठे होऊ असे वाटते तर मोठे झाल्यावर बालपण परत मिळावे असे वाटते. म्हणून वयाने मोठे झालो तरी मनातल्या मनात शक्य तेवढे बालपण जपण्याचा आपण प्रयत्न करतो. कारण मोठे झाल्यावर अनेक यातना सहन कराव्या लागतात तेव्हा वाटते, बालपण होते तेच बरे होते. मात्र वय थांबत नाही की काळ थांबत नाही, यावर पर्याय हाच की मन लहान मुलांसारखे आनंदी ठेवा. सतत नाविन्याची ओढ ठेवा, नवे काही ना काही शिकत रहा. लहान मुले जशी राग झटकून पुन्हा खेळायला लागतात, एकत्र होतात, तसे आपापसातले हेवे दावे सोडून एकत्र या आणि आनंदाने जगा. 

तुका म्हणे बरवे जाण, व्हावे लहानाहुनी लहान। 

एवढे मोठे संत शिरोमणी तुकोबा राय सांगतात, व्हावे लहानाहूनि लहान. ज्याची शिकायची तयारी असते त्याची प्रगती कधीच खुंटत नाही. अध्यात्मातले अधिकारी पुरुष असूनही तुकोबांनी कायम अंगी नम्रता बाणली आणि कमी पण स्वतःकडे घेऊन चांगल्या गोष्टी आत्मसात केल्या. एकदा का दुसऱ्याला मोठेपण दिले की आपोआप कमीपणा नव्हे तर विनम्र भाव अंगात भिनतो. 

असे बालपण एक दिवसापुरते नाही तर कायम स्वरूपी अंगीकारून घ्या, तुमचा निश्चितच उत्कर्ष होईल याची खात्री तुकोबा देतात!

टॅग्स :children's dayबालदिन