शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
2
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
3
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
5
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
6
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
7
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
8
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
9
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
10
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
11
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
12
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
13
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
14
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
15
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
16
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
17
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
18
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
19
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
20
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल

पुरुषांच्या तुलनेत 'या' तीन बाबतीत महिला ठरतात सरस; सांगताहेत आचार्य चाणक्य!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2022 3:42 PM

स्त्री पुरुष परस्परांना पूरक असले तरी काही बाबतीत महिला पुरुषांच्या तुलनेत उजव्या ठरतात. त्यांनी या तीन गुणांवर अधिक लक्ष दिले पाहिजे. 

आचार्य चाणक्य हे महान विद्वान, अर्थतज्ञ, मुत्सद्दी म्हणून ओळखले जातात. आचार्य चाणक्य यांनी आपल्या धोरणात जीवनातील व्यावहारिक पैलूंबद्दल अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. चाणक्य नीतीमध्ये स्त्रिया आणि पुरुषांचे चारित्र्य, गुण आणि अवगुण याबद्दलही महत्त्वाच्या गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. चाणक्य नीतीनुसार महिलांमध्ये असे काही गुण असतात, ज्यामध्ये त्या पुरुषांपेक्षा खूप पुढे असतात. या बाबतीत पुरुष त्यांना कधीही हरवू शकत नाहीत. यामुळेच महिला या बाबतीत पुरुषांपेक्षा वरचढ ठरतात.

धाडस: चाणक्य नीतीनुसार पुरुषांसमोर स्त्रियांची प्रतिमा दुर्बल व्यक्तीची असली तरी वस्तुस्थिती यापेक्षा वेगळी आहे. आचार्य चाणक्य म्हणतात की संकट काळात न डगमगता पुरुषांपेक्षा मनाने स्त्रिया जास्त स्थिर असतात. पुरुष पटकन खचून जातात, स्त्रिया निर्भयपणे प्रसंगाला सामोऱ्या जातात, आव्हान स्वीकारतात आणि जबाबदाऱ्या पार पडतात. म्हणून सजीव निर्मितीचे दान समस्त चराचरातल्या स्त्रीत्त्वाला नियतीने प्रदान केले आहे. 

बुद्धी: स्त्रिया पुरुषांपेक्षा अधिक हुशार असतात. त्या प्रत्येक मुद्द्यावर बारकाईने विचार करून निर्णय घेतात. निर्णय प्रक्रियेत त्यांच्या सिक्स्थ सेन्सची सुद्धा त्यांना मदत होते. याउलट पुरुष रागाच्या भरात अनेकवेळा चुकीचे निर्णय घेतात आणि त्यांचे मोठे नुकसान होते. तर महिला या बाबतीत संयमाने आणि हुशारीने काम करतात. वाढत्या वयानुसार त्यांची निर्णय क्षमताही वाढत जाते. 

वात्सल्य : नैसर्गिकरित्या स्त्रियांमध्ये वात्सल्य भाव असतोच. पुरुषांच्या तुलनेत त्या पटकन भावुक होतात आणि समोरच्याला क्षमा करतात. मात्र हा गुण स्त्रियांची दुर्बलता मानण्याची चूक करू नये. कारण त्या गौरीसारखे शीतल रूप धारण करत असल्या तरी क्षणात चंडिका होण्याचे सामर्थ्यही बाळगतात. म्हणून त्यांना गृहीत धरू नये.