शहरं
Join us  
Trending Stories
1
हाती 'धनुष्यबाण', कुडाळमधून विजयाचा निर्धार; शिवसेना प्रवेशानंतर निलेश राणे भावूक
2
मावळमध्ये भाजपाचा सांगली पॅटर्न; राष्ट्रवादीच्या उमेदवाराला धक्का देण्याची तयारी
3
मनसेची १३ जणांची तिसरी यादी जाहीर; नाशिकमध्ये भाजपाला अन् पालघरमध्ये काँग्रेसला धक्का
4
शिवसेनेच्या पहिल्या यादीत चूक, उमेदवार बदलणार?; राऊतांनी पत्रकार परिषदेत केले कबूल
5
अखेर ठरलं! ८५-८५-८५ मविआच्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब; उर्वरित जागांचं गणित कसं असणार?
6
'सीमेवरील शांततेला प्राधान्य', पंतप्रधान मोदी आणि शी जिनपिंग यांच्यात 50 मिनिटांची बैठक
7
Mahayuti Seat update: साताऱ्यात महायुतीचा विद्यमान आमदारांवरच भरोसा! 
8
इस्रायलची मोठी कारवाई; हिजबुल्लाच्या नसरल्लाहनंतर आता हाशिम सफीद्दीनचाही केला खात्मा
9
Maharashtra Election 2024: भाजपसमोर बंड थंड करण्याचे आव्हान; नाशिकमध्ये समीकरण काय?
10
मोठी बातमी: CM शिंदेंविरोधात केदार दिघे; ठाकरेंच्या शिवसेनेकडून ६५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
11
तुर्कीची राजधानी अंकारामध्ये मोठा दहशतवादी हल्ला; अनेकांचा मृत्यू
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सकाळी पक्षप्रवेश अन् संध्याकाळी मिळालं तिकीट; के.पी. पाटलांना दिली उमेदवारी; शाहूवाडीतही शिलेदार मैदानात उतरवला
13
मुंबईतील 'या' १३ जागांवर ठाकरेंचे शिलेदार ठरले; शिवडी मतदारसंघात ट्विस्ट? 
14
जागावाटपाआधीच ठाकरेंकडून AB फॉर्म वाटप; नाशिक मध्य मतदारसंघात काँग्रेस बंडखोरी करणार
15
जालन्यात शिवसेनेच्या अर्जुन खोतकरांविरोधात रावसाहेब दानवेंच्या भावाने ठोकला शड्डू
16
Madha Vidhan Sabha 2024: चार वेळा काँग्रेस, पाच वेळा राष्ट्रवादी, शेकापला एकदा मिळाली संधी!
17
अद्भुत! झिम्बाब्वेने ट्वेंटी-२० मध्ये केल्या तब्बल ३४४ धावा; सिकंदर रझाची झंझावाती खेळी
18
Maharashtra Vidhan Sabha Election : बारामतीचं ठरलं! काका विरोधात पुतण्या निवडणूक लढणार? जितेंद्र आव्हाडांनी दिले संकेत
19
Virat Kohli Record : पुण्याच्या मैदानात किंग कोहलीच्या निशाण्यावर असतील हे ५ विक्रम 
20
फडणवीसांची शिष्टाई, राज पुरोहित आणि राहुल नार्वेकरांमध्ये दिलजमाई, कुलाब्यातील बंड शमवण्यात भाजपाला यश 

आध्यात्मिकतेची संस्कृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2020 4:22 AM

कारण त्या क्षणापासून ती केवळ त्या ओळखीच्या चौकटीतूनच कार्य करू लागते.

-सद्गुरू जग्गी वासुदेवमानवी बुद्धीने जीवन आणि त्यापलीकडे काय आहे, याचा शोध घेणे स्वाभाविक आहे.ङ्क्तजीवनाचे अवलोकन करणे आणि ते जाणून घेण्यासाठी आतुर असणे. वास्तविकता अशी असताना, तुम्ही अध्यात्म कसे टाळू शकता? दीर्घकाळापासून तुम्ही हे टाळत आला आहात. कारण जे तुम्ही नाही, अशा अनेक गोष्टींप्रती तुम्ही आसक्त झाला आहात आणि तुमची ओळख बांधली आहे. जेव्हा मी ‘जे तुम्ही नाही अशा गोष्टी’ असे म्हणतो, तेव्हा त्यात तुमचे शरीर आणि मनही सामील आहे. एकदा तुम्ही ‘जे नाही’ अशा गोष्टींसोबत तुमची ओळख बांधली की तुमची बुद्धी विकृत होते आणि मग ती काहीही स्पष्टपणे पाहू शकत नाही. कारण त्या क्षणापासून ती केवळ त्या ओळखीच्या चौकटीतूनच कार्य करू लागते.

समजा तुम्ही म्हणालात, ‘मी एक स्त्री आहे.’ मग तुमची विचार करण्याची पद्धत, तुमच्या भावना, सर्वकाही एका स्त्रीसारखे असणार. म्हणजे तुम्ही तुमच्या शरीराच्या काही अवयवांसोबत तुमची ओळख जोडली. यासाठीच ‘आध्यात्मिक प्रक्रिया’ आवश्यक ठरतात. जर लोक सहज, निरागस असते तर अध्यात्म ही एक नैसर्गिक गोष्ट असली असती. तुमच्या सभोवताली दृष्टिक्षेप टाकणे आणि जीवनाच्या भौतिकतेच्या पलीकडे काहीतरी आहे याची जाणीव होणे फार स्वाभाविक आहे आणि हे जाणून घेणेही फार सोपे आहे; पण जगातील बहुतेक लोकांच्या हे लक्षात येत नाही ही आश्चर्यकारक बाब आहे. तुम्ही जर फक्त दोन मिनिटांसाठी डोळे बंद केले तर पाहाल की, तुम्ही शरीरापेक्षा जरा अधिक काहीतरी आहात हे लक्षात येईल. एक प्रकारे, ही खरोखरच लाजिरवाणी गोष्ट आहे की, आपल्याला लोकांना त्यांच्या आध्यात्मिकतेबद्दल आठवण करून द्यावी लागत आहे. आम्हाला आध्यात्मिक प्रक्रि या दैनंदिन जीवनाचा भाग व्हावा अशी इच्छा आहे. एक आई आपल्या मुलाला दात घासण्यास शिकविते त्याप्रमाणे, आपल्याला आध्यात्मिक प्रक्रियाही तशी व्हायला हवी आहे, कोणत्याही प्रयत्नांशिवाय.