शहरं
Join us  
Trending Stories
1
Ratan Tata News LIVE: ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा पंचत्वात विलीन, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
2
लोकसभेला ठाकरेंच्या उमेदवाराविरोधात प्रचार करणारे नेते शरद पवारांच्या भेटीला
3
ओबीसींमध्ये १५ नव्या जातींचा समावेश; मनोज जरांगेंनी सरकारला खिंडीत गाठलं, म्हणाले...
4
PAK vs ENG: धो डाला! पाकिस्तानच्या सहा गोलंदाजांची बॉलिंगमध्ये 'शतकं', एक पोहोचला 'द्विशतका'जवळ
5
दिल्लीतील आमदारांची' आतिशी 'बाजी; 'आमदार निधी' १५ कोटी मिळणार, मुख्यमंत्र्यांची माहिती
6
मंत्रिमंडळाची आज शेवटची बैठक संपन्न; पुढील ३-४ दिवसांत राज्यात आचारसंहिता लागू?
7
महिला आमदाराच्या पतीला केलं 'इमोशनल ब्लॅकमेलिंग', २५ हजारांची झाली फसवणूक
8
PAK vs ENG : ५५६ धावा तरी सामन्याचा 'रुट' बदलला; इंग्लंडने पाकिस्तानची 'घरच्यांसमोर' लाज काढली
9
"या नेत्यांमुळे काँग्रेस हरयाणात हरली’’, पराभवाचं खापर फोडत संतप्त राहुल गांधींनी मांडलं परखड मत 
10
सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत...TATA च्या उत्पादनाशिवाय तुमचे पानही हलत नाही
11
उद्धव ठाकरेंसोबतच्या बैठकीत काय चर्चा झाली?; रविकांत तुपकरांनी सांगितली रणनीती
12
Harry Brook भारी खेळला; पण Virender Sehwag च्या वर्ल्ड रेकॉर्डला धक्का नाही लागला
13
'फुलवंती' मध्ये हास्यजत्रेची फौज, कलाकारांनी किती मानधन घेतलं? प्राजक्ता माळी म्हणाली...
14
कमाल! २ वेळा अपयश आलं, निराश झाली पण हरली नाही...; IPS अधिकारी होण्याचं स्वप्न केलं पूर्ण
15
Video: चेंडू हवेत जाताच हार्दिक पांड्या तुफान धावत सुटला, एका हाताने टिपला भन्नाट कॅच
16
सणासुदीच्या काळात मोदी सरकारची राज्यांना मोठी भेट, 1.78 लाख कोटी रुपये जारी...
17
"रतन टाटांसारख्या व्यक्तीला खरं तर हयात असतानाच 'भारतरत्न'ने सन्मानित करायला हवं होतं"
18
"या पराभवाला खूप गंभीरपणे..."; हरयाणा विधानसभा निकालावर अशोक गेहलोत यांचं मोठं विधान
19
२० वर्षांपासून असलेल्या नोकराने घात केला; भाजपा मंत्र्याच्या ५० लाखांच्या दागिन्यांवर डल्ला मारला
20
आळंदीची लेक ते महाराष्ट्राची लोकप्रिय गायिका; जीवनातील अध्यात्माचं महत्त्व, महिला सुरक्षेवरही कार्तिकी स्पष्टच बोलली..

Dasbodh Jayanti 2022: समर्थ रामदास स्वामींनी ३०० वर्षांपूर्वी रचलेल्या दासबोधाची आजही अवीट गोडी; पाहा, जन्मकथा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2022 2:50 PM

Dasbodh Jayanti 2022: समर्थ रामदास स्वामींनी १७ व्या शतकात रचलेल्या दासबोधाची आजही अनेक ठिकाणी पारायणे केली जातात.

जे जे आपणासि ठावे। ते ते इतरांसि शिकवावे। शहाणे करून सोडावे सकळ जन।।, अशी शिकवण देणाऱ्या समर्थ रामदास स्वामी (Samartha Ramdas Swami) यांनी अनेकविध श्लोक, स्तोत्रे, ग्रंथ यांच्या माध्यमातून परमार्थ, स्वधर्मनिष्ठा, राष्ट्रप्रेम यांची शिकवण पक्की करणाऱ्या ज्ञानाचा प्रसार करत महाराष्ट्रात प्रबोधन व संघटन केले. रामाची आणि हनुमंताची उपासना करणाऱ्या रामदास स्वामी यांनी सामर्थ्याची उपासना आणि उपासनेचे सामर्थ्य लोकांना पटवून दिले. राजकारण आणि धर्मकारणावर प्रखर भाष्य करणारे समर्थ रामदास हे एकमेव संत होते. समर्थ रामदासांच्या रचनांमधील सर्वांत महत्त्वाचा ग्रंथ म्हणजे दासबोध. समर्थ रामदास स्वामी यांनी माघ शुद्ध नवमी या दिवशी दासबोध ग्रंथाची रचना केल्याचे सांगितले जाते. यंदा, १० फेब्रुवारी २०२२ रोजी दासबोध जयंती आहे. (Dasbodh Jayanti 2022)

रामदास स्वामी आणि संत तुकाराम समकालीन होते. समर्थ रामदास स्वामी यांनी १७ व्या शतकात रचलेला दासबोध कालातीत असून, आजच्या काळातही तेवढाच परिपूर्ण वाटतो. लग्नाच्या बोहल्यावर सावधान झालेल्या रामदासांनी संसार कसा करावा, संसार कसा असावा, याचे नेमके ज्ञान दिले. दासबोधाच्या माध्यमातून रामदास स्वामींनी नेटका उपदेश समाजाला केला आहे. सूर्यनमस्काराचे महत्त्व सांगत आरोग्याचा गुरुमंत्र देत मनावर ताबा मिळवल्यास अनेक गोष्टी सुलभ होतात, याचे ब्रह्मज्ञान रामदासांनी समाजाला दिले. समर्थ रामदासांनी आपल्या कार्याने महाराष्ट्रधर्म वाढविला. सर्वसामान्य जनतेत भक्तिमार्गातून शक्तीच्या उपासनेचा, संघटित होण्याचा मूलमंत्र दिला. मारुतीच्या उपासनेतून त्या काळातील समाजाला शरीरस्वास्थ्याचा मार्गही दाखविला.

समर्थांनी दासबोध ग्रंथ कुठे रचला?

माघ शुद्ध नवमीला रायगड जिल्ह्यातील तत्कालीन निबीड अरण्यात शिवथरघळ येथे दासबोध ग्रंधाची निर्मिती करण्यात आली, असे सांगितले जाते. रामदास स्वामी यांनी आपले पट्टशिष्य कल्याण स्वामी यांच्याकरवी दासबोध ग्रंथाची निर्मिती केली. दासबोधाला ग्रंथराजाची उपमा दिली जाते. समर्थ रामदास स्वामींचा 'दासबोध' हा ग्रंथ म्हणजे विविध विषयांवरील तत्त्वचिंतनांचे मराठी भाषेतील साहित्याचे अमोल लेणे आहे. 

ग्रंथराज दासबोधाची रचना कशी आहे?

समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेला ग्रंथराज दासबोध एकूण २० दशकांमध्ये विभागलेला आहे. प्रत्येक दशकात १० समास आहेत. समर्थांनी दोन वेळा दासबोधाची निर्मिती केली, असे सांगितले जाते. पहिला दासबोध ग्रंथ २१ समासाचा होता आणि नंतरचा दासबोध २०० समासी असल्याचे म्हटले जाते. जुन्या आणि नंतरच्या दासबोधाचे एकत्रिकरण केले गेले. त्यावर संपादकीय संस्कार करून अनेक प्रकाशकांनी दासबोधांच्या आवृत्त्या प्रकाशित केल्या. दासबोध ग्रंथाची अनेक ठिकाणी आजही पारायणे केली जातात. 

दासबोध ग्रंथाची वैशिष्ट्ये

रामदास स्वामींनी संसारिकांना, साधकांना, निस्पृहांना, विरक्तांना, सर्वसामान्यांना, बालकांना, प्रौढांना, सर्व जाती-पंथ धर्माच्या स्त्री-पुरुषांना आणि मानवी मनाला उपदेश केलेला आहे. गुरु-शिष्य संवाद असे दासबोध ग्रंधाचे स्वरुप असून, हा ग्रंथ कोणता, त्याचे नाव काय, या ग्रंथात प्रामुख्याने काय सांगितलेले आहे, या ग्रंथामुळे काय मिळेल, अशी माहिती देणाऱ्या ओव्या दासबोध ग्रंथाच्या प्रारंभी येतात. मूर्खांची लक्षणे, नवविधा भक्ती म्हणजे काय, खरे ज्ञान कोणते, वैराग्य म्हणजे काय, अध्यात्म म्हणजे काय, या नानाविध गोष्टींचा उहापोह दासबोधात करण्यात आलेला आहे. दासबोधातून रामदासांनी निश्चयात्मक आणि विवेकपूर्ण लिखाण केले आहे. केवळ दशकांच्या नावावरून समर्थांनी मानवी जीवनाचा आणि मानवी मनाचा किती सखोल अभ्यास केला आहे, याची प्रचिती येते. मनाचे श्लोक रचणाऱ्या समर्थ रामदास स्वामींच्या दासबोधाचा उल्लेख केवळ ग्रंथराज असाच करता येईल. 

टॅग्स :spiritualअध्यात्मिक