शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
2
पाकिस्तानी फवाद खानचा 'लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही; राज ठाकरेंचा इशारा
3
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
4
पु्ण्याकडे येत होती ट्रेन, अचानक आला मोठा आवाज आणि रुळांवरून घसरलं इंजिन
5
IND vs BAN 4th Day Live : बांगलादेशने लय पकडली पण अश्विन-जडेजाने डोकेदुखी वाढवली; भारताची विजयाकडे वाटचाल
6
मोठा अनर्थ टळला! रेल्वे ट्रॅकवर गॅस सिलिंडर; लोको पायलटच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला 
7
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
8
चीन समर्थक दिशानायके यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपती निवडणुकीत घेतली विजयी आघाडी   
9
ENG vs AUS : इंग्लंडचे पुनरागमन पण मिचेल स्टार्क भिडला! यजमानांचा पुन्हा पराभव; ऑस्ट्रेलियाची गाडी सुस्साट
10
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
11
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
12
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
13
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
14
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
15
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
16
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
17
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
18
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
19
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
20
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका

Dasnavami 2023: मृत्यूची भीती प्रत्येकालाच वाटते, ती दूर व्हावी म्हणून समर्थ रामदास स्वामी यांनी केलेलं विवेचन जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2023 2:56 PM

Dasnavami 2023: १५ फेब्रुवारी रोजी माघ वद्य नवमी, तीच समर्थांची पुण्यतिथी, त्यानिमित्ताने समर्थांनी मृत्यूसंदर्भात भाकीत करून जाणून घेऊ आणि निर्भय बनू!

माघ वद्य नवमी, समर्थ रामदासांनी इहलोकीचा प्रवास संपवला तो दिवस. त्यांच्या जाण्याने त्यांचे सगळे शिष्य व्यथित झाले होते. त्यावेळी समर्थांनी त्या सर्व शिष्यांचा निरोप घेत त्यांना एका श्लोकांची आठवण करून दिली-

मरे एक त्याचा दुजा शोक वाहेआकस्मात तोही पुढे जात आहेपुरे ना जनीं लोभ रे क्षोभ त्यातेंम्हणोनी जनीं मागुता जन्म घेते ||१६||

कोणी मरण पावला तर दुसरा त्याच्याबद्दल शोक करतो पण पुढे कधीतरी त्या शोक करणाऱ्यालाही मरणे आहेच. म्हणून माणसांची माया लावून घेतलेली नसावी कारण मायेपोटी मनस्ताप होतो आणि पुन्हा जन्म घ्यावा लागतो.

समर्थांनी या उदाहरणातून जणू काही आपल्या मनातील मृत्यूची भीती काढून टाकली आहे आणि त्या परिस्थितीकडे तटस्थपणे बघायला शिकवले आहे. मृत्यू, एक अटळ घटना. जी प्रत्येकाच्या आयुष्यात घडणारच आहे, तरी आपण ती स्वीकारत नाही. उलट मरणाच्या भीतीने बऱ्याचदा जगणं सोडून देतो. याउलट जे लोक प्रत्येक दिवस शेवटचा असं समजून जगतात, ते आयुष्याचा भरभरून आनंद घेतात.

अर्थात, हे तत्वज्ञान वाचायला सोपं आणि जगायला कठीण आहे. नीट विचार केला, तर आपल्या लक्षात येईल, की आपण स्वतःच्या मृत्यूला जितके घाबरत नाही, तितके आपल्या आप्त जनांच्या मृत्यूला घाबरतो. त्यांच्या नंतर आपलं काय, हा विचार जास्त क्लेशदायक असतो. पण दुःखाचा आवेग ओसरला, की आयुष्य पूर्व पदावर येतं आणि पुढे मागे आपणही या प्रवासाचे प्रवासी होतो.

आपला मृत्यू आपण स्वीकारला नाही, तरी तो येणारच आहे, कधी ते माहीत नाही, पण येणार हे नक्की! ज्योतिष असो वा विज्ञान मृत्यूची पूर्वकल्पना देऊ शकत नाही. अशात आपल्या हाती राहतं, ते जीवनाचा भरभरून आस्वाद घेणं. दुःखं, संकटं येतच राहणार, वाईट घटना घडतच राहणार, पण खरा कस तेव्हा लागतो, जेव्हा आपण सहजतेने त्यांचा स्वीकार करतो. नव्हे, तो करावाच लागतो.

प्रत्येक कलाकार कार्यक्रमाआधी आपले सादरीकरण कसे होईल याचा पूर्व विचार करतो आणि त्यादृष्टीने तयारी करतो. तशी तयारी या शेवटच्या कार्यक्रमाची आपण केली पाहिजे. शेवटचा शो हिट झाला पाहिजे, असं वाटत असेल, तर संपूर्ण आयुष्य त्यासाठी वेचावं लागतं. 

अंत्य यात्रेत किती गर्दी होती, यावरून गेलेल्या व्यक्तीची लोकप्रियता कळते. आता आपल्या वेळी किती डोकी जमतील, याचा हिशोब आपण करायला हवा. जसा कठीण पेपर गेल्यावर किमान पास होण्यापूरते मार्क आपल्याला मिळतील की नाही, याचा आपण हिशोब करतो, अगदी तसा! म्हणजे उर्वरित पेपरवर चांगला जोर मारता येतो. 

आपल्या पश्चात कोणी चांगलं बोललं नाही, तरी चालेल, पण कोणी वाईट बोलता कामा नये, यासाठी आपली वागणूक आतापासून सुधारायला हवी. अशा वेळी बाबांचा मंत्र आठवतो, कोणी मित्र नसलं तरी चालेल, पण एकही शत्रू नको! मनुष्य चांगल्या चारित्र्याचे सर्टिफिकेट लोकांकडून मिळावे, यासाठीच आयुष्यभर खस्ता खात असतो.

 

आपण जे कमावतो, त्यापैकी आपल्या सोबत काहीच येणार नाही. हे सत्य स्वीकारून उर्वरित आयुष्यात लोकांसाठी किती आणि स्वतः साठी किती जगायचं, याचं गुणोत्तर ठरवायला हवं. आपल्या पश्चात आपण लोकांकडे फक्त चांगल्या आठवणींचा ठेवा देऊन जाऊ शकतो. बाकी गोष्टी चेक इन होताना यमराज काढून घेतात. त्यामुळे अपेक्षांचं लगेज वेळीच कमी केलेलं बरं!

लिहिण्यासारखं काहीतरी करून जा किंवा जाण्यापूर्वी काहीतरी लिहून जा, असं कोणीतरी म्हटलेलं आहे. यापैकी आपली कॅटेगरी लक्षात ठेवून कामाला लागायला हवं. 

आपल्या मरणाने कोणाच्या डोळ्यात आपसूक पाणी आलं, तर ती आपली खरी कमाई. ते वैभव बघायला आपले डोळे उघडे नसतील, पण जमलेले लोक आपली श्रीमंती बघून नक्कीच हेवा करतील. प्रत्येकाला जायचं तर आहेच, मग मरेपर्यंत दिलखुलास जगा आणि जगू द्या!