शहरं
Join us  
Trending Stories
1
आता सर्व पवार कुटुंब तुम्हाला भेटायला लागले, ओळख दाखवायला लागले; बारामतीकरांसमोर अजितदादांची तुफान फटकेबाजी
2
इंदापुरात बंड अटळ?; पाटलांच्या प्रवेशानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांची मोठी घोषणा
3
सहानुभूतीवर नाही, मविआचं जागावाटप मेरिटवरच होणार; नाना पटोलेंची रोखठोक भूमिका
4
ऑटोचा धक्का लागल्यावरून वाद अन् नंतर तुफान दगडफेक; अकोल्यात नेमकं काय घडलं?
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थनार्थ इलॉन मस्क मैदानात उतरले; त्यांचा काय फायदा होणार? पाहा...
6
PDP सोबत युती करणार का? निवडणूक निकालापूर्वी फारुक अब्दुल्लांचे सूचक वक्तव्य; म्हणाले...
7
"रामराजेंनी मला फोन केला, उद्या त्यांच्याशी..."; अजित पवारांनी सोडलं मौन
8
अमेरिकेने शेख हसिनांचं सरकार कसं उलथवलं? गोपनीय रिपोर्टमधून धक्कादायक गौप्यस्फोट
9
'डॉली चायवाला' विसरा; आता आली 'मॉडेल चायवाली', सोशल मीडियावर घातलाय धुमाकूळ
10
पाक बॅटरला खुन्नस देणं पडलं महागात; Arundhati Reddy वर झाली 'ही' कारवाई
11
"महाराष्ट्रात 'खोके आणि धोके' सरकार"; प्रियंका गांधींचं टीकास्त्र, व्हिडीओ केला शेअर
12
आमचं ‘जीना यहां, मरना यहां’, पण हर्षवर्धन पाटलांंचं तसं नाही, चंद्रकांत पाटील यांची खोचक टीका
13
₹15 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड...! लागलं 20% चं अप्पर सर्किट, जबरदस्त आहे कारण
14
"महत्वाच्या टप्प्यावर पोहोचले युद्ध!", इकडे झेलेंस्कींनी घोषणा केली; तिकडे युक्रेननं रशियाचा तेल डेपो उडवला!
15
इस्रायलवर दुहेरी वार! हिज्बुल्ला अन् हमासने एकत्रितपणे केला मिसाईल हल्ला; अनेक जण जखमी
16
मुंबई लुटतच नाहीत तर फुकटात द्यायचं काम होतंय; आदित्य ठाकरेंचा CM शिंदेंवर गंभीर आरोप
17
माओवाद्यांची पुरवठा साखळी तोडण्यात महाराष्ट्राला मोठे यश; मुख्यमंत्री शिंदेंचा दावा
18
धक्कादायक! हिमाचल प्रदेशमध्ये चीनने पाठवले ड्रोन, भारताच्या हद्दीत हेरगिरीचा प्रयत्न?    
19
रिओ ऑलिम्पिकचे पदक थोडक्यात हुकलेली जिम्नॅस्ट दीपा कर्माकरची ३१व्या वर्षी निवृत्तीची घोषणा
20
वैद्यकीय क्षेत्रातील 'नोबेल' जाहीर! अमेरिकन शास्त्रज्ञ व्हिक्टर अम्ब्रोस, गॅरी रुवकुन यांची निवड

दत्तभक्त व राष्ट्रभक्त वासुदेव बळवंत फडके : दत्त सहस्रनामाचा जप केल्याशिवाय पाण्याचा थेंबही घेत नसत!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2022 12:13 PM

योगायोग : आज आद्य क्रांतिकारक व गुरुभक्त वासुदेव बळवंत फडके यांची पुण्यतिथी आणि गुरुप्रतिपदा!

समाजकार्य, राष्ट्रकार्य, धर्मकार्य हाती घेत असताना आध्यात्मिक बैठकही तितक्याच ताकदीची असावी लागते, हे ज्यांनी सिद्ध केले, ते आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांची आज जयंती आहे. त्यांना सशस्त्र क्रांतीचे जनकही म्हटले जाते. त्यांच्या घरात ना क्रांतीचे वारे होते, ना देशभक्तीचे बाळकडू. तरीदेखील केवळ आपल्या मातृभूमीची ब्रिटीशांच्या तावडीतून सुटका व्हावी, म्हणून सर्वसामान्य घरातला एक तरुण सोन्यासारखी नोकरी झुगारून स्वातंत्र्ययज्ञात आपल्या प्राणांची आहुती देतो, त्या बलिदानाचे मोल राखणे आपले कर्तव्य आहे.

वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म पनवेल जवळील शिरढोण येथे ४ नोव्हेंबर १८४५ रोजी झाला. कल्याण येथे प्राथमिक शिक्षण संपवून ते इंग्रजी शिक्षण घेण्यासाठी मुंबईत आले. गिरगावातील फणसवाडी येथील जगन्नाथाचे चाळीत वास्तव्य करून त्यांनी काही काळ इंग्रजी अभ्यास केला व पुढील शिक्षणासाठी ते  पुण्यास रवाना झाले. शिक्षणानंतर त्यांनी पुण्याच्या सैनिकी लेखानियंत्रक (कंट्रोलर ऑफ मिलिटरी अकाऊंटस) कार्यालयात सेवा केली. 

त्यांना त्यांच्या आजारी आईला भेटण्यास रजा मिळाली नाही. आईचे निधन झाले व शेवटी भेटही घेता आली नाही. या घटनेने आयुष्याला वेगळीच कलाटणी मिळाली. त्यांनी आपल्या मातेची आणि भारतमातेची तिच्या लेकरांपासून ताटातूट करणाऱ्या इंग्रज सरकाराचा नायनाट करायचा असा पण केला. त्यावेळेस त्यांच्या वडिलांनी त्यांना समर्थांच्या ओव्यांची आठवण करून दिली. 

सकल सुखाचा केला त्याग, करूनी साधिजे तो योग,राज्य साधनेची लगबग, कैसी केली।त्याहुनी करावे विशेष, तरीच म्हणावे पुरुष,या उपरी आता विशेष, काय लिहावे?

हे समर्थ वचन ध्यानी ठेवून वासुदेवाने घरदार सोडले. त्याच वेळी हिंदुस्थानात भीषण दुष्काळ पडला. इंग्रज सरकारच्या हलगर्जी  कारभाराचे मुळे हजारो नागरिक मृत्युमुखी पडले. त्यामुळे इंग्रज राजवटी बाबत प्रचंड संताप त्यांचे मनात उफाळून आला व त्याचा प्रतिशोध घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला. भारतमातेला पारतंत्र्यातून मुक्त करण्यासाठी त्यांनी सशस्त्र बंड करण्याचे ठरवले. संघटना केल्या. रामोशी, भिल्ल, मांग, कोळी, आगरी, ब्राह्मण अशा सर्व समाजातील देशभक्त संघटित केले आणि त्यांना शस्त्रवापराचे प्रशिक्षण दिले. राष्ट्रीय शिक्षण, स्वदेशी माल, शस्त्र प्रशिक्षण यांना प्राधान्य दिले. त्यांनी सुरू केलेल्या लाठीवर्गात खुद्द लोकमान्य टिळकांनीदेखील प्रशिक्षण घेतले होते. इंग्रजांशी हातमिळवणी केलेल्या गद्दार धनाढ्यांना लुटून त्यांनी धन-संपत्ती गोळा केली आणि राष्ट्रकार्यार्थ तिचा योग्य विनिमय केला. प्रत्येक क्रांतीकारकाला सैनिकांप्रमाणे रोजगार दिला आणि मजबूत शस्त्रसाठा तयार केला. परिणामी त्यांना शिक्षा होऊन त्यांना एडन येथे धाडले गेले. व तेथेच त्यांना १७ फेब्रुवारी १८८३ ला मृत्यू आला. 

पुण्याच्या फायनान्स ऑफिसात नोकरी करीत असताना त्यांच्या मनातील वैराग्यवृत्ती उसळून वर आली. मंत्रतंत्र, सत्पुरुषांच्या गाठीभेटी यांत त्यांना गोडी वाटे. अक्कलकोटच्या स्वामी समर्थांनाही ते भेटले होते. वासुदेव बळवंतांचे आराध्य दैवत श्रीदत्त हेच होते. श्रीपादवल्लभ नामक ध्यानाचे एक चित्र त्यांनी एका चित्रकाराकडून मुद्दाम काढून घेतले होते. त्याची नित्य ते पूजा करीत. रोज ते श्रीगुरुचरित्राच्या पोथीचा अध्याय वाचीत. दत्तांच्या आराधनेचा व उपासनेचा एक ग्रंथ ‘दत्त महात्म्य’ नावाचा प्रसिद्ध करण्याचा त्यांना मानस होता. गंगाधरशास्त्री दातार यांच्याकडून ‘दत्तलहरी’ या स्तोत्राचे भाषांतर करवून वासुदेव बळवंतांनी प्रसिद्ध केले होते. दिवसाच्या सुरुवातीला नित्य दत्त सहस्रनामाचा जप केल्याशिवाय त्यांनी कधी पाण्याचा थेंबही घेतला नाही. दत्तपादुकांची प्रतिकृती छोट्याशा डबीतून ते सदैव आपल्या जवळ बाळगत असत. 

राजद्रोहाखाली यांना हद्दपारीची शिक्षा झाली. एडन येथेच जन्मठेप भोगीत असताना त्यांचे निधन झाले. ‘दधिची ऋषींनी धर्मकार्यासाठी आपल्या अस्थी देवांना दिल्या, तर हिंदवासियांनो, मी आपला प्राण तुमच्यासाठी का देऊ नये?’ अशी त्यांची वृत्ती होती. असे हे थोर क्रांतीकारक भारतमातेच्या लढ्यासाठी दत्तरूप होऊन उभे राहिले मात्र त्यांची किंमत न कळलेल्या आपल्याच बंडखोरांमुळे भारतमातेला स्वातंत्र्यासाठी आणखी अनेक वर्षे झुरावे लागले.