शहरं
Join us  
Trending Stories
1
Atul Parchure Passed Away: 'वल्ली' अभिनेत्याची अकाली एक्झिट! अतुल परचुरे यांचं निधन, काही वर्षांपूर्वीच कर्करोगावर केलेली मात
2
मोठी बातमी: राज्यपाल नियुक्त १२ जागांपैकी सरकारकडून ७ नावांवर शिक्कामोर्तब; कोणाकोणाला मिळाली संधी?
3
"....तोपर्यंत हे म्हातारं काही थांबत नाही"; शरद पवारांचा निर्धार काय?
4
Pune Crime: पुण्यात तरुणीवर अत्याचार करणाऱ्या दुसऱ्या आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या; यूपीतून अटक!
5
कृष्णा महाराज शास्त्री भगवानगडाचे उत्तराधिकारी होणार; कधी बसणार गादीवर? जाणून घ्या...
6
उद्धव ठाकरेंवर अँजिऑप्लास्टी नाही, केवळ नियमित तपासणी; आदित्य ठाकरेंची माहिती
7
हरयाणा निकालातून घेतला धडा; महाराष्ट्रातील नेत्यांना काँग्रेस हायकमांडचे ३ आदेश
8
'४८ पैकी ३१ जागा जिंकल्यावर यांना लाडकी बहीण आठवली'; शरद पवारांचा महायुती सरकारला खोचक टोला
9
ठाकरेंना धक्का, टोपेंचं वाढलं टेन्शनl; 'शिवबंधन' तोंडत हिकमत उढाण शिंदेंच्या शिवसेनेत!
10
Acidity ने हैराण झालायत? वारंवार पोटात जळजळतं? 'हे' ५ उपाय करा, नक्की वाटेल 'रिलॅक्स'!
11
वक्फ विधेयकावरुन पुन्हा गोंधळ; विरोधी खासदारांनी जेपीसीच्या बैठकीवर बहिष्कार टाकला
12
शिंदे-फडणवीस-अजित पवारांची उद्या महत्त्वपूर्ण पत्रकार परिषद; जागावाटपाच्या फॉर्म्युल्याची घोषणा होणार? 
13
अजित पवारांना धक्का! रामराजेंचे विश्वासू आमदार दीपक चव्हाणांच्या हाती 'तुतारी'
14
आम्ही झेल सोडून चेंडूला विश्रांती देतो; माजी भारतीय खेळाडूचे पाकिस्तानवर शाब्दिक हल्ले, कारण...
15
Bigg Boss 18: गुणरत्न सदावर्ते बिग बॉसच्या घरातून बाहेर, नक्की कारण काय? जाणून घ्या...
16
"हरयाणासारखं महाराष्ट्रात घडणार नाही, कारण शरद पवार..." अमोल कोल्हेंनी महायुतीला डिवचलं
17
Babar Azam, PAK vs ENG Test: बाबर आझम पाकिस्तानी कसोटी संघातून OUT; सईद अन्वर म्हणाला- "बेटा, प्रत्येक क्रिकेटर..."
18
कोण आहे जसीन अख्तर?; बाबा सिद्दीकी हत्याकांडातील चौथा आरोपी; पंजाब, हरियाणात मोठं नेटवर्क
19
Canada vs India, Political Issue: "पुरावे द्या नाहीतर गप्प बसा"; भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने कॅनडाच्या सरकारला खडसावले!
20
IND vs NZ : "मला असा संघ हवाय जो एका दिवसात...", भारताचा 'हेड' गंभीरची 'मन की बात'

साईबाबांचे अवतार म्हणून परिचित असलेले सत्यसाईबाबा यांची पुण्यतिथी; घेऊया कार्याचा आढावा!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2023 7:00 AM

जनसामान्यांसाठी मदत करणारे अध्यात्मिक गुरु अशी ख्याती असलेले सत्यसाईबाबा यांचे आजही जगभरात मोठ्या संख्येने अनुयायी आहेत. 

सत्य साईबाबा हे अर्वाचीन भारतातील आध्यात्मिक गुरू होते. त्यांचे जगभरात पसरलेले भक्त त्यांना ईश्वरी व्यक्तिमत्त्व आणि शिर्डीच्या साईबाबांचा अवतार मानतात. भारतातील राजकीय, आर्थिक आणि इतर अनेक क्षेत्रात त्यांचे अनेक उच्चपदस्थ अनुयायी मोठ्या संख्येने आहेत. त्यांच्या प्रभावाखाली आलेल्या लोकांमध्ये समाजातील मोठमोठ्या हस्तींचा समावेश होता. राजकारणापासून क्रीडा आणि चित्रपट जगतापर्यंत त्यांना गुरू मानले जायचे. यामध्ये माजी पंतप्रधान नरसिंह राव, अटल बिहारी वाजपेयी, मनमोहन सिंग यांच्यापासून ते सचिन तेंडुलकरपर्यंत त्यांना गुरू मानत होते.

समाजसेवी संस्थांच्या माध्यमातून त्यांनी अनेक लोकोपयोगी कामे केली. मोफत किंवा अल्पखर्चात शिक्षण आणि वैद्यकीय सुविधा देत असलेल्या संस्था त्यांच्या प्रेरणेने सुरू झाल्या. २० व्या शतकात आंध्र प्रदेशात भीषण दुष्काळ पडला होता, तेव्हा सत्यसाई बाबांनी ७५० गावांसाठी पाण्याची व्यवस्था केली होती. बाबांनी आध्यात्मिक शिकवणीसोबतच सामाजिक क्षेत्रातही अनेक सेवाकार्य केले. मानवसेवेला त्यांनी सर्वश्रेष्ठ धर्म म्हटले. याची सुरुवात पुट्टापर्थीमध्ये एका लहानशा हॉस्पिटलच्या बांधकामापासून झाली, जी आता २२० पलंगाची सुपर स्पेशालिटी सत्य साई इन्स्टिट्यूट ऑफ हायर मेडिकल सायन्सेस बनली आहे.

आंध्रप्रदेशात पुट्टपर्थी या गावी सत्य साईबाबांचा आश्रम आहे आणि तेच त्यांचे जन्मगावसुद्धा आहे. सत्य साई बाबा यांनी आपल्या हयातीत अनेक चमत्कार केल्याचे म्हंटले जाते. म्हणूनच त्यांनी काही वेळा सुपर ह्युमन म्ह्णून देखील संबोधले जात. लोकांमध्ये फिरताना आपले चमत्कार दाखवत कधी बहुमूल्य हार, अंगठी, दागिने किंवा अंगारा असे सगळे जादुई पद्धतीने प्रस्तुत करणे अनेकदा चर्चच्या आले होते यावरूनच त्यांना टीकेचा देखील सामना करावा लागला होता.

१९४४ मध्ये सत्य साई बाबा यांनी पुट्टपर्थी गावकऱ्यांसाठी एका मंदिराची उभारणी केली होती.आध्यात्मिक बाबींच्या सोबतच सामाजिक कार्यात देखील सत्य साई बाबांचा मोलाचा वाटा होता, मोफत हॉस्पिटल, क्लिनिक, पाणपोई, ऑडिटोरियम, आश्रम, शाळा इत्यादींची बांधणी करून त्यांचा गोरगरिबांना वापर करायला दिल्याने अनेकदा त्यांना देवाचे रूप मानले जायचे.

२०११ साली मार्च मध्ये सत्य साई बाबा यांना श्वसनात त्रास होऊ लागल्यावर पुट्टपर्थी येथील शांतिग्राम श्री सत्य साई सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल मध्ये त्यांना दाखल करण्यात आले होते. यानंतर एकाच महिन्यात त्यांची अवस्था आणखीनच बिकट झाल्याने २४ एप्रिल, २०११ मध्ये वयाच्या ८५ व्या वर्षी त्यांनी देह ठेवला.