शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेची १५ उमेदवारांची पाचवी यादी जाहीर; सोलापूर, कोल्हापूर, बीडमध्ये कोणाला संधी?
2
नवाब मलिक मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघात लढणार; भाजपा काय भूमिका घेणार?
3
कोरेगावची जागा राष्ट्रवादीला दिली, सातारा मतदारसंघातून ठाकरे गट लढणार; संजय राऊतांची माहिती
4
अपक्ष आमदार किशोर जोरगेवार भाजपात प्रवेश करणार; सुधीर मुनगंटीवारांची नाराजी दूर?
5
गौतम गुरुजींचं नशीब फुटकं! आधी खेळाडू अन् आता कोचिंगमध्ये टीम इंडियावर आली 'गंभीर' वेळ
6
Harun Khan: ठाकरेंनी उतरवला अल्पसंख्याक उमेदवार, कोण आहेत हारुन खान?
7
Sanjay Singh : "भाजपाने केला केजरीवालांना मारण्याचा प्रयत्न, द्वेषाच्या राजकारणाने..."; आप नेत्याचा गंभीर आरोप
8
'बटेंगे तो कटेंगे': भाजपच्या भूमिकेवर RSS चं पहिल्यांदाच भाष्य; होसबळे म्हणाले...
9
नेत्रदिपक कामगिरी! CA चं शिक्षण घेतल्यानंतर 'तो' शेतीकडे वळला; आता ५५ लाखांचा टर्नओव्हर
10
बंडोबा झाले थंड! उल्हासनगरमध्ये आयलानी व कलानी लढतीकडे सगळ्यांचे लक्ष का?
11
"आम्हाला टोलमाफीचे गाजर नको", सुमीत राघवनचा संताप, शिंदे-फडणवीसांना टॅग करत म्हणाला...
12
नेटकऱ्यांनी रोहित-विराटला दाखवला 'आरसा'; सचिनच्या चाळीशीतील 'त्या' व्हिडिओचाही दिला दाखला
13
मोठी बातमी: भाजपची दुसरी उमेदवार यादी जाहीर; जतमधून पडळकर, खडकवासल्यातून पुन्हा तापकीर!
14
मुंबईत उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का; २ नेते पक्ष सोडणार, अपक्ष लढण्याची तयारी
15
पोटनिवडणुकीत पराभव तरी भाजपने दिली पुन्हा संधी! हेमंत रासनेंनी कसं जुळवलं गणित?
16
शरद पवार गटाच्या २२ उमेदवारांची यादी जाहीर; बीडमधून संदीप क्षीरसागरांना पुन्हा संधी
17
मुंबईतल्या ३ जागांवर ठाकरे गटाचे उमेदवार जाहीर; मुस्लीम चेहरा उतरवला रिंगणात
18
भयंकर! "सर, आमचा जीव वाचवा..."; गुंडांच्या भीतीने शिक्षकांनी अधिकाऱ्यांसमोर जोडले हात
19
IND vs NZ : "...म्हणूनच आमचा पराभव झाला, मी दुखावलोय", कर्णधार रोहित शर्माची प्रामाणिक कबुली
20
दिग्गजांना आस्मान दाखवण्यासाठी पवारांचा डाव: बीडमध्ये पुन्हा क्षीरसागरच; भुजबळ, झिरवळांविरोधात कोणाला संधी?

Deep Amavasya 2022: दीप अमावस्येला गरजू व्यक्तीला मदत पुरवून तिचे आयुष्य उजळून टाकता आले तर...?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2022 11:18 AM

Aashadh Amavasya 2022: हिंदू संस्कृती स्वार्थाकडून परमार्थाकडे नेणारी आहे. दीप अमावस्येचा असाही पर्याय आपल्याला निवडता येईल, नाही का?

स्वदेस चित्रपटातली ती आजी आठवते? जिच्या घरात पहिल्यांदा बल्ब लागल्यावर आपल्या बोळक्या तोंडाने ती आनंदून म्हणते, `बिजली...बिजली!' ही केवळ चित्रपटातील नाही, तर आजही अनेक खेडेगावत ही परिस्थिती आहे. एवढेच काय, तर अलीकडेच आलेल्या पूरग्रस्त परिस्थितीमुळे अनेकांचे संसार वाहून गेले आहे. जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशा स्थितीत आपण आपल्या परीने शक्य ती मदत करून त्यांच्या आयुष्यात सकारात्मकतेची, विश्वासाची आणि आशेची ज्योत प्रज्वलित करू शकतो. तसे केल्याने दीप अमावस्येचा मूळ हेतू म्हणजे अंधार नष्ट करणे, मग तो आपल्या आयुष्यातला असो नाहीतर दुसऱ्यांच्या आयुष्यातला, तो निश्चित साध्य होऊ शकेल.

सध्याच्या जगगात ट्यूबलाइट्स, बल्ब, सौरदिवे ही दिव्यांची आधुनिक रूपे आहेत. म्हणून असे दिवे एखाद्या संस्थेला, शाळांना, आश्रमांना द्यावेत. तशी आवश्यकता नसेल तर तेथील लाईट बिलाची रक्कम यथाशक्त अदा करावी. एखादा लामणदिवा, समई विकत घेऊन मंदिरात दान करावी आणि देवासमोर प्रज्वलित करावी.

आज आपल्या देशात शेकडो देवळे अशी आहेत की अनास्थेमुळे तिथे देवांची नित्यपूजा होत नाही. देवासमोर एखादा दिवासुद्धा कोणी लावत नाहीत. अशा आडगावच्या, आडवाटेच्या देवळात या दिवसाचे निमित्त साधून समविचारी मंडळींना सोबत घेऊन देवळाची स्वच्छता करावी. मूर्तीची पूजा करून दिवाबत्ती करावी. तुम्हाला तिथे रोज जाणे शक्य नसेल, तर तेथील गरजू स्थानिकाला या कामासाठी नेमून वर्षभराची दिवाबत्तीची सोय लावून द्यावी. त्यामुळे मंदिराचे पावित्र्य अबाधित राहील व गरजू व्यक्तीला आर्थिक मदत मिळेल.

याचप्रमाणे कोणाच्या आयुष्यात ज्ञानाचा दिवा लावावा अशी इच्छा असेल, तर एखाद्या गरजू मुला-मुलीचा शैक्षणिक खर्च उचलावा. ती ज्ञानज्योत मुलांच्या मनात आयुष्यभर तेवत राहील व आपल्याला मदत मिळाली तशी भविष्यात कोणाला मदत करण्याची प्रेरणा त्यांना मिळू शकेल. शेवटी या उत्सवाचा सारांश काय, तर `ज्योत से ज्योत लगाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो!'