शहरं
Join us  
Trending Stories
1
हरयाणात BJP, जम्मू-काश्मिरात इंडिया; महाराष्ट्रात काय होणार? महायुती-मविआत कोणाचा दबाव वाढेल?
2
हरयाणात घडले तेच महाराष्ट्रातही घडणार; भाजपच्या जल्लोष सभेत देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास
3
अखेर ठरले... अजित पवार बारामतीतूनच लढणार; प्रफुल्ल पटेल यांनी जाहीर केली उमेदवारी
4
जम्मू-काश्मीरमध्ये 'इंडिया', ओमर अब्दुल्ला होणार मुख्यमंत्री; आपनेही खाते उघडले
5
हरयाणात भाजपची हॅट्ट्रिक; काँग्रेसच्या पाच जागा वाढल्या, पण बहुमताची हुलकावणी
6
मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करा; उद्धव ठाकरे यांचे काँग्रेस, शरद पवार गटाला आवाहन
7
ओमर हेच मुख्यमंत्री, वाटेकरी कुणीच नाही; फारूख अब्दुल्लांनी केले जाहीर, काँग्रेसचे ६ विजयी
8
०.८५ टक्के कमी मते अन् गमावल्या ११ जागा; भाजप-काँग्रेसच्या मतांची टक्केवारी जवळपास सारखीच
9
जम्मू-काश्मीर विधानसभा निकालात ‘इंडिया’ने मारली बाजी, तरी भाजप ठरला बाजीगर
10
हरयाणामध्ये भाजप जिंकण्यामागचे गणित काय? काँग्रेसच्या हातात असलेला विजय हिसकावला
11
मागासवर्गीय मतदारांनी काँग्रेसकडे फिरविली पाठ; हरयाणात जाट-बिगर जाट मतांचे ध्रुवीकरण
12
काँग्रेसच्या मनोबलावर परिणाम होणार नाही; हरयाणा निकालावर रमेश चेन्नीथलांचे मत
13
बहिणीच्या दसरा मेळाव्याला भाऊ उपस्थित राहणार का? पंकजा, धनंजय मुंडे महायुतीत असल्याने चर्चा
14
मविआकडून लाडकी बहीण योजनेच्या कालावधीबाबत शंका; देवेंद्र फडणवीस ठामपणे म्हणाले...
15
भारतविरोधी षड्यंत्रात काँग्रेस सामील; समाजाला कमकुवत करण्याचा प्रयत्न, PM मोदींचा घणाघात
16
भक्तांसाठी आनंदाची बातमी: निमगाव खंडोबा क्षेत्र विकासासाठी २४ एकर जमीन; शासन निर्णय जारी 
17
"सकाळी नऊ वाजताचा भोंगा, रात्रीच तयारी करून बसला होता"; फडणवीसांनी राऊतांना डिवचलं
18
धक्कादायक! प्रेमाच्या त्रिकोणातून तरुणीने केली तरुणीची हत्या
19
"खोट्याच्या कडू घोटावर विकासाची गॅरंटी भारी पडली’’, हरयाणातील विजयानंतर मोदींचा टोला 
20
वडील-काकाची दहशतवाद्यांनी केलेली हत्या; मुस्लिमबहुल मतदारसंघातून शगुन परिहार विजयी

अपार मेहनत घेऊनही तुम्हाला वाटते की अपयश आले? पण ती तर यशाची सुरुवात असते!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 08, 2021 8:00 AM

प्रयत्न करणे हे आपल्या हाती आहे, त्या प्रयत्नाचे फळ काय द्यायचे, ते देव बघून घेईल. निराश होऊ नका.

आजचा जमाना इन्स्टंट फूड चा आहे. सगळे काही आपल्याला दोन मिनिटात हवे असते. अगदी यश सुद्धा! परंतु कोणतीही चांगली गोष्ट मिळवायची तर त्यात सातत्य, मेहनत, चिकाटी, प्रयत्न यांचे खतपाणी घालावे लागते, तरच यशाचा अंकुर फुटतो आणि भविष्यात त्याचा वटवृक्ष होतो. आज बी पेरले तर उद्या झाड उगवेल ही अपेक्षा करणे चुकीचे ठरेल. याचाच अर्थ लागवड वाया गेली का? तर नाही, हा काळ बीज रुजण्याचा, अंकुर फुटण्याचा आणि त्याच्या वाढीचा असतो. त्याचप्रमाणे तुमचे प्रयत्न कधीच वाया जात नाहीत, फक्त ते योग्य दिशेने असावे लागतात. याबाबत प्रख्यात व्याखाते गौर गोपालदास प्रभू छानशी गोष्ट सांगतात... 

एका तरुणाला आयुष्यात अचाट काहीतरी साध्य करायचे असते. पण नेमके काय हेच माहीत नसते. एक दिवस तो विचारात बुडालेला असताना त्याला कुठूनतरी अदृश्य आवाज येतो, 'तुला अचाट कामगिरी करायची आहे ना, मग तुझ्या गावाजवळ असलेला भला मोठा डोंगर सहा महिने सातत्याने हलव आणि मग परिणाम बघ!'

आपल्याला नक्कीच देवाने हा आदेश दिला असावा, अशा विचाराने त्या तरुणाने दुसऱ्या दिवशी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत डोंगर हलवण्यास सुरुवात केली. देवाने सांगितल्या प्रमाणे तो एकही दिवस आळस न करता सलग सहा महिने डोंगर हलवण्याचा प्रयत्न करत राहिला. परंतु डोंगर तसूभरसुद्धा जागेवरून हलला नाही. हे पाहून निराश होऊन त्याने उद्यापासून हे काम बंद करायचे असे ठरवून टाकले. त्या दिवशी त्या तरुणाला पुन्हा तोच आवाज आला. 'निराश का होतोस?'

तरुण म्हणाला, 'निराश होऊ नको तर काय करू? मला अचाट कामगिरी करायची होती. सहा महिने मेहेनत घेऊनही काहीच फरक पडला नाही.'देवाने म्हटले, 'फरक नाही पडला असे का म्हणतोस? आरशासमोर उभा राहा, तुझा शर्ट काढ आणि रोज मेहनत घेतल्यामुळे केवढे पोलादी शरीर तयार झाले आहे बघ. भविष्यात यश मिळाले तर ते पचवण्यासाठी ताकद हवी. ती ताकद तुझ्यात निर्माण झाली आहे. आता याहून अचाट कामगिरी करण्यासाठी सिद्ध हो!'

प्रयत्न करणे हे आपल्या हाती आहे, त्या प्रयत्नाचे फळ काय द्यायचे, ते देव बघून घेईल. निराश होऊ नका. यश मिळाले, तरी ते पचवता आले पाहिजे, यासाठीच अपयशाला यशाची पहिली पायरी म्हटले आहे. ज्याअर्थी तुम्हाला वारंवार अपयश येत आहे, त्याअर्थी तुम्ही यशाच्या दिशेने वाटचाल करत आहात, हे लक्षात ठेवा आणि प्रयत्न सोडू नका. काय सांगावं, तुमच्या अपार कष्टांनी अपयशाचा डोंगर हलेलही!