शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडच्या बस्तरमध्ये भीषण चकमक; सुरक्षा दलांनी 30 नक्षलवाद्यांचा केला खात्मा
2
आता अहमदनगर नव्हे तर 'अहिल्यानगर'! नामांतराच्या प्रस्तावाला केंद्राची मंजुरी
3
इस्रायलनं नकाशात भारतासोबत असं काय केलं की लोक भडकले? ताबडतोब घेण्यात आली अ‍ॅक्शन
4
शिक्षकाचं संपूर्ण कुटुंब संपवणारा आरोपी अखेर अटकेत, समोर आली धक्कादायक माहिती
5
INDW vs NZW: भारतीय महिला संघाचा पहिला सामना; New Zealand Women सेट करणार टार्गेट
6
PAK vs ENG : आपल्याच देशात पाकिस्तानची 'कसोटी'! पण पहिल्या सामन्यापूर्वी मिळाला सुखद धक्का
7
“राज्यातील राजकारणाला जनता कंटाळली, एक सुसंस्कृत पर्याय म्हणून तिसरी आघाडी”: संभाजीराजे
8
दहशतवाद्यांचा कर्दनकाळ माजी IPS अधिकारी आता BCCI मध्ये काम करणार; मोठी जबाबदारी मिळाली!
9
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पाकिस्तानला जाणार; SCO शिखर परिषदेत सहभागी होणार
10
काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा आजचा कोल्हापूर दौरा रद्द, कारण..
11
२२ वर्षांनी घेतला वडिलांच्या हत्येचा बदला, मुलाने खुन्याला त्याच स्टाईलनं संपवलं   
12
TRAI कडून पुन्हा कारवाई, १८ लाखांहून अधिक मोबाईल नंबर्स ब्लॉक; तुम्हीही करत आहात ही चूक?
13
कॅनडातील भीषण वास्तव; वेटरच्या नोकरीसाठी सुशिक्षित भारतीयांनी लावल्या रांगा...
14
इस्रायलची मोठी कारवाई; हिजबुल्लाह प्रमुख हाशिम सफीद्दीनचा खात्मा, आता फक्त एकच जिवंत...
15
पाकिस्तानी हिंदू विद्वानानं झाकीर नाईकला आरसा दाखवला; कट्टरपंथी मानसिकतेवर बोचरा प्रश्न विचारला अन्...
16
हर्षवर्धन पाटील शरद पवार गटात प्रवेश करणार; अशोक चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
17
Women’s T20 World Cup : कोडं सुटलं; पण Harmanpreet Kaur समोर उभं राहिलं मोठं चॅलेंज
18
मच्छिमार महामंडळासाठी ५० कोटी मंजूर, राज्य सरकारचे मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय, वाचा...
19
इराणमध्ये मोसादची भीती! अयातुल्ला खामेनेईंचा आता कोणावरही विश्वास नाही, स्वतःच्या सैन्याची सुरू केली चौकशी 
20
गरब्याची रंगत वाढणार! मुंबईत नवरात्रीचे शेवटचे तीन दिवस लाऊडस्पीकरला रात्री १२ वाजेपर्यंत परवानगी

भक्ताने सुरू केला ज्ञानेश्वर माउलींचा पालखी सोहळा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2021 10:48 AM

कसल्याही परिस्थितीमध्ये माउलींच्या पादुका पंढरपूरला न्यायच्याच असा निश्चय करून त्यांनी वर्षभर जुळवाजुळव केली.

विविध  संतांच्या पालख्या या  त्यांच्या वंशजांनी सुरू ठेवल्या परंतु लहान वयातच समाधी घेतलेल्या संत ज्ञानेश्वर माउलींचा पालखी सोहळा गुरू हैबतबाबा आरफळकर या  भक्ताने सुरू केला. नारायण महाराजानंतर त्यांच्या वंशजामध्ये भाऊबंदकी वाढली आणि १८३१ साली फक्त तुकाराम महाराजांच्याच पादुका पंढरपूरला नेल्या गेल्या. १८३१ माउलींच्या पादुका पंढरपूरला न गेल्याने माउलीभक्त असलेले गुरू हैबतबाबा यांना अतीव दु:ख झाले. सातारा जिल्ह्यातील आरफळ गावचे हैबतबाबा हे ग्वाल्हेरच्या शिंदे सरकाराच्याकडे सरदार होते. पुढील वर्षी कसल्याही परिस्थितीमध्ये माउलींच्या पादुका पंढरपूरला न्यायच्याच असा निश्चय करून त्यांनी वर्षभर जुळवाजुळव केली. शिंदे सरकारांनी त्यासाठी मदत केली. अंकलीचे शितोळे सरकार यांनी घोडे व तंबूची सोय केली. खंडोजीबाबा भापकर आणि सुभानजी शेडगे यांच्यासह हैबतबाबांनी १८३२ साली ज्येष्ठ वद्य अष्टमीला संत ज्ञानेश्वर माउलींच्या पादुका डोक्यावर घेऊन पंढरीची वारी सुरू केली. 

पाचशेवर दिंड्या

गुरु हैबतबाबांनी आळंदीकर आणि मल्लप्पा वासकर यांच्यासह पहिली दिंडी निर्माण केली. त्यानंतर दुसरी दिंडी खंडुजीबाबांची तर तिसरी दिंडी सुभानजी शेडगे यांची असा क्रम लावला. कालांतराने पादुका रथामधून नेल्या जाऊ लागल्या. ‘ज्ञानियाचा राजा ’ दिमाखात पंढरपूरला जाऊ लागला. त्यासाठी चौरीवाले, अबदागिरी, भालदार, चोपदार, सनई, चौघडा, शिंगवाले, भोई असे विविध मानकरीसुध्दा तयार झाले. सध्या रथापुढे २७ दिंड्या असतात. तर रथामागे ३०० दिंड्या चालतात. याशिवाय तात्पुरत्या नोंदीच्या मिळून सुमारे ५००च्या वर दिंडयापर्यंत हा सोहळा वाढला आहे. या सोहळ्यात अश्वाची तीन उभी रिंगणे व चार गोल रिंगणे होतात. आजही हैबतबाबांचे वंशज हा सोहळा चालवतात. शितोळे सरकरांचे घोडे, तंबू व नैवेद्य हा मान कायम आहे. १७ दिवसात सुमारे २७५ किमीचे अंतर पार करत पालखी पंढरपूरला पोहोचते.

रिंगणामागची कल्पना

धावणे हा अश्वांचा स्थायीभाव आहे. दररोज चालणाऱ्या अश्वांना कुठेतरी धावण्यासाठी जागा आणि उसंत मिळावी या उद्देशाने त्यांच्यासाठीच या खेळाचे आयोजन करण्यात आले आहे.

(संकलन : बाळासाहेब बोचरे)

टॅग्स :sant dnyaneshwarसंत ज्ञानेश्वरsant dnyaneshwar palkhiसंत ज्ञानेश्वर पालखीAshadhi Ekadashiआषाढी एकादशी