शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसची १६ जणांची तिसरी उमेदवार यादी जाहीर; मुंबईतील २ मतदारसंघाचा समावेश
2
पुण्यात भाजपाला बसणार मोठा फटका?; कसबा पेठ उमेदवार निवडीवरून पसरली नाराजी
3
दहिसर मतदारसंघात ठाकरेंचा ट्विस्ट; आधी तेजस्वी घोसाळकरांना उमेदवारी, पण आता...
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: तिकिट कापल्याने भाजपा आमदाराला अश्रू अनावर
5
शिंदेंच्या शिवसेनेत गेलेल्या बच्चू कडूंच्या आमदाराचा महायुतीत पत्ता कट
6
NCP नेते बाबा सिद्दीकी हत्याकांडात नवा खुलासा; हत्येआधी शूटरच्या संपर्कात अन्...
7
मनसेची १५ उमेदवारांची पाचवी यादी जाहीर; सोलापूर, कोल्हापूर, बीडमध्ये कोणाला संधी?
8
नवाब मलिक मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघात लढणार; भाजपा काय भूमिका घेणार?
9
कोरेगावची जागा राष्ट्रवादीला दिली, सातारा मतदारसंघातून ठाकरे गट लढणार; संजय राऊतांची माहिती
10
अपक्ष आमदार किशोर जोरगेवार भाजपात प्रवेश करणार; सुधीर मुनगंटीवारांची नाराजी दूर?
11
गौतम गुरुजींचं नशीब फुटकं! आधी खेळाडू अन् आता कोचिंगमध्ये टीम इंडियावर आली 'गंभीर' वेळ
12
Harun Khan: ठाकरेंनी उतरवला अल्पसंख्याक उमेदवार, कोण आहेत हारुन खान?
13
Sanjay Singh : "भाजपाने केला केजरीवालांना मारण्याचा प्रयत्न, द्वेषाच्या राजकारणाने..."; आप नेत्याचा गंभीर आरोप
14
'बटेंगे तो कटेंगे': भाजपच्या भूमिकेवर RSS चं पहिल्यांदाच भाष्य; होसबळे म्हणाले...
15
नेत्रदिपक कामगिरी! CA चं शिक्षण घेतल्यानंतर 'तो' शेतीकडे वळला; आता ५५ लाखांचा टर्नओव्हर
16
बंडोबा झाले थंड! उल्हासनगरमध्ये आयलानी व कलानी लढतीकडे सगळ्यांचे लक्ष का?
17
"आम्हाला टोलमाफीचे गाजर नको", सुमीत राघवनचा संताप, शिंदे-फडणवीसांना टॅग करत म्हणाला...
18
नेटकऱ्यांनी रोहित-विराटला दाखवला 'आरसा'; सचिनच्या चाळीशीतील 'त्या' व्हिडिओचाही दिला दाखला
19
मोठी बातमी: भाजपची दुसरी उमेदवार यादी जाहीर; जतमधून पडळकर, खडकवासल्यातून पुन्हा तापकीर!
20
पोटनिवडणुकीत पराभव तरी भाजपने दिली पुन्हा संधी! हेमंत रासनेंनी कसं जुळवलं गणित?

रोज नामस्मरण करताय? मग 'हे' नियमी अवश्य पाळा!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2022 6:21 PM

नामस्मरण हे निष्काम भावनेने म्हणजे कोणतीही अपेक्षा न ठेवता होणे आवश्यक आहे. त्यासाठी पुढील नियमांचे पालन करावे.

दगडावर एकाचवेळी खूप पाणी टाकले तर दगड ओला होईल आणि काही वेळानंतर पूर्वीसारखा कोरडा होईल. पण त्यावर सतत एकाच बिंदूवर थेंबाथेंबाने पाणी पडत राहिल्यास त्या दगडाला छिद्र होऊन तो भंग पावतो. त्याचप्रमाणे नामस्मरणाच्या थेंबाने जीवनातील दु:खाचा दगड फुटून जातो. 

संत शिरोमणी तुकाराम महाराज सांगतात, भगवंत प्राप्तीच्या सर्व प्रकारांपेक्षा सोपा प्रकार आहे, तो म्हणजे नामस्मरणाचा! `नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची' या अभंगात तर ते म्हणतात, नामस्मरणाने सकल पापांचा नाश होतो, सकल दु:खाचा विसर पडतो. ते घेण्यासाठी फार कष्ट लागत नाही. वनात जावे लागत नाही. व्यावहारिक कामे करता करताही मुखाने अखंड नामस्मरण करता येते. नामस्मरण कोणाचे करावे असा ठराविक नियमही नाही. आवडी अनंत आळवावा, म्हणजे ज्या देवतेची उपासना करता, त्याचे मनोभावे नाम घ्या. नामस्मरण हे निष्काम भावनेने म्हणजे कोणतीही अपेक्षा न ठेवता होणे आवश्यक आहे. त्यासाठी पुढील नियमांचे पालन करावे.

  • स्वार्थबुद्धीचा त्याग करावा.
  • यम नियमांचे पालन करावे.
  • परान्न घेऊ नये.
  • परनिंदा करून नये.
  • दयाबुद्धी ठेवावी. 
  • कौटुंबिक जीवनातील जबाबदाऱ्या काळजीपूर्वक पार पाडाव्यात.
  • कितीही त्रास झाला तरी शांत राहावे.
  • मांसभक्षण, मदिरापान, व्यसन इ. निषिद्ध कर्म करू नयेत. 
  • जप सद्गुरू करून घेत आहेत, ही भावना ठेवावी.
  • शिव आणि नारायण यांच्यात भेद करू नये. सर्व देवांमध्ये परमतत्त्व पाहावे.
  • मासिक पाळीच्या काळात जपाची माळ न घेता केवळ मुखाने नामस्मरण करावे. 
  • रोज शिवकवच, पंचमुखी हनुमान कवचाचे किंवा कोणत्याही एका स्तोत्राचे नित्यनेमाने पठण करावे.
  • परस्त्रीला मातेसमान मानावे.
  • दुसऱ्याच्या धनाची अभिलाषा ठेवू नये.
  • संशय, विकल्प आले, तरी नामस्मरण सोडू नये.