शहरं
Join us  
Trending Stories
1
जिंकलस भावा! टीम इंडिया अडचणीत असताना मुंबईकर Sarfaraz Khan नं ठोकली सेंच्युरी
2
मविआत 'वाद' वाटप, चर्चा खोळंबली; राऊत-पटोले यांच्यात शाब्दिक वॉर, थेट दिल्ली दरबारी पोहोचली तक्रार!
3
बंगालच्या उपसागरात 'दाना' चक्रीवादळ, देशाच्या या भागात निर्माण होणार पूरस्थिती 
4
मुंबईत ठाकरे गटच मोठा भाऊ; समाजवादी पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी एक जागा देणार
5
जगातील टॉप ५० कंपन्यांमध्ये भारतातील एकही नाही, कुठपर्यंत झाली Relianceची घसरण?
6
सलमान खानमुळे बाबा सिद्दीकींची हत्या झाली? सलीम खान म्हणाले, "त्याचा काही संबंध..."
7
दोन मुलांच्या मृतदेहांसह कुटुंब करत होतं धार्मिक विधी, शेजाऱ्यांनी बोलावले पोलीस, त्यानंतर...
8
आजचे राशीभविष्य - १९ ऑक्टोबर २०२४, कौटुंबिक व व्यावसायिक वातावरण आपणास अनुकूल राहील
9
सलमानने कधी झुरळही मारलेलं नाही! बिश्नोईच्या धमकीनंतर सलीम खान यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले- "त्याचं प्राण्यांवर प्रेम..."
10
₹१०००, २०००, ३००० किंवा ५००० टाकल्यास तुमच्या मुलीला किती रक्कम मिळेल; पाहा कॅलक्युलेशन
11
प्रसूतीसाठी डॉक्टर वेळेत न आल्याने मातेच्या पोटातच दगावले बाळ; २४ तास महिलेची तडफड, शस्त्रक्रियेनंतर मातेची सुटका
12
पक्षबदलाची ऑक्टोबर हीट! भाजपचे राजन तेली, सुरेश बनकर, अजित पवार गटाचे दीपक आबा साळुंखे उद्धवसेनेत
13
राज्यातील तब्बल ९ खासगी वैद्यकीय महाविद्यालये रडारवर; दोन अधिकाऱ्यांची समिती नियुक्त; 8 दिवसांत अहवाल देण्याचे निर्देश
14
छोट्या घटक पक्षांना हव्यात अधिक जागा; मविआ जागावाटपाचा विषय लांबला 
15
बालविवाह प्रथा संपुष्टात आणण्यास प्रत्येक जिल्ह्यात खास अधिकारी नेमा - सुप्रीम कोर्ट 
16
युद्धाचा भडका; सोन्याचा भाव ७७ हजार ९०० रुपयांवर, जीएसटीसह किती रुपये मोजावे लागणार? जाणून घ्या
17
सिद्दिकी हत्याकांड प्रकरण, पाच जणांना अटक
18
"लिस्ट द्या, मतदारांना आणण्यासाठी फोनपे, जे काय लागेल...", शिंदेंच्या आमदाराची निवडणूक आयोगाकडे तक्रार
19
बाबा सिद्दिकी हत्याप्रकरणात डोंबिवली कनेक्शन समोर; शुटर्सपर्यंत पोहचवले शस्त्र
20
CSMT कडे जाणाऱ्या लोकलचा डब्बा घसरला; कल्याण रेल्वे स्थानकातील घटना

'युद्धात तुलाच विजय मिळेल या संभ्रमात राहू नकोस' अशा शब्दात श्रीकृष्णाने केली होती अर्जुनाची कानउघडणी!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 02, 2023 11:00 AM

निकालाची भीती आणि त्यातही अपयशाची भीती प्रत्येकालाच वाटते, ही अवस्था अर्जुनाची तर आपली काय कथा; वाचा त्यावर हे उत्तर!

कुरुक्षेत्रावर आपल्या विरुद्ध आपलेच लोक लढताना पाहून गर्भगळीत झालेला अर्जुन श्रीकृष्णाला म्हणाला, 'कृष्णा या युद्धात माझा पराभव झाला तर मी काय करू? जिंकलो तरी आपल्याच लोकांना हरवल्याचं दुःख कसे सहन करू? त्यापेक्षा आताच युद्धातून माघार घेतली तर पुढचे सगळे प्रश्नच संपून जातील असे वाटत नाही का?

अर्जुनाच्या भ्याड प्रश्नावर श्रीकृष्ण रागावले आणि म्हणाले, 'हे वेळीच ठरवायला हवे होते, कुरुक्षेत्रावर येऊन हा निर्णय घेण्याची ही वेळ नाही. युद्ध जाहीर होण्याआधी हा निर्णय उचित ठरला असता, मात्र युद्ध भूमीवर येऊन पाठ फिरवणे तुला शोभणार नाही. आता युद्ध करणे हेच तुला प्राप्त आहे. संकटाला पाठ दाखवली म्हणून संकट पाठ सोडत नसतात. त्या संकटांचा धिटाईने सामना करावा लागतो. तुला तुझे कर्म करायचे आहे. फळ काय मिळेल हे तुझ्या हातात नाही. आणि या युद्धात तुलाच विजय मिळेल या संभ्रमात राहू नकोस! याक्षणाला तुझ्या तुलनेत कौरवांचा आत्मविश्वास प्रबळ आहे आणि तू संभ्रमित अवस्थेत आहेस. त्यामुळे या युद्धात तुझा पराभवच काय तर मृत्यूही होऊ शकतो. पण त्या विचाराने तू युद्ध सोडू नकोस, कारण... 

हतो वा प्राप्स्यसि स्वर्गं जित्वा वा भोक्ष्यसे महीम्।तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयः।।

अर्थात, युद्धात मारला गेलास तर स्वर्गप्राप्ती होईल, जिंकलास तर पृथ्वीवर राज्य करशील. त्यामुळे तू आता फक्त तुझं कर्म प्रामाणिकपणे कर. 

श्रीकृष्णाचा हा उपदेश केवळ अर्जुनासाठी नसून पराभवाची भीती वाटणाऱ्या प्रत्येक मनुष्याला आहे. त्यामुळे हरण्याच्या भीतीने लढणे सोडू नका. हरलात तर अनुभव मिळेल, जिंकलात तर यश मिळेल!

टॅग्स :Mahabharatमहाभारत