शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला मिळाली तिसरी महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
2
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
3
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
4
भारतात WANTED असलेला फरार इस्लामिक धर्मगुरू झाकिर नाईक पाकिस्तानात 'पाहुणा'
5
IND vs BAN, 1st Test Day 3 Stumps : वेळेआधी थांबला खेळ; ढगाळ वातावरणातही चित्र एकदम स्पष्ट
6
तिरुमला तिरुपती लाडू वाद: प्रकाश राज यांचा DCM पवन कल्याण यांना मोलाचा सल्ला; म्हणाले...
7
बाबो! इन्स्टावर सूत जुळलं, एकमेकांवर प्रेम जडलं; पंक्चरवाल्यासाठी नवऱ्याला सोडलं अन्...
8
लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा लावला; मुलीने रंगेहाथ पकडला, विद्यार्थ्याला अटक, अनेक व्हिडीओ सापडले
9
ऐश्वर्या-करीश्मादेखील वाचवू शकले नाहीत सुपरस्टारच्या मुलाचं करिअर, आता इंडस्ट्रीतून आहे गायब
10
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
11
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; विहिरी, शेततळे, वीज जोडणीसाठीच्या अनुदानात वाढ
12
TV वर खूप नाव कमावलं पण मोठ्या पडद्यावर चालली नाही जादू; प्रसिद्ध अभिनेत्याला ओळखलं का?
13
IND vs BAN : डोळ्याची पापणी लवण्याच्या आत खेळ खल्लास! यशस्वीनं घेतलेला भन्नाट कॅच बघाच (VIDEO)
14
"काशीचा प्रसाद मिळाला, तेव्हा माझ्या मनात तिरुपतीचा विचार आला", लाडू वादावर माजी राष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता
15
IND vs BAN : Rishabh Pant चे झंझावाती शतक! गर्लफ्रेंड ईशाने मानले आभार, म्हणाली...
16
"गोली का जवाब गोले से...!"; गृह मंत्री अमित शाह यांची कश्मिरात गर्जना; विरोधकांवरही निशाणा
17
काय सांगता! ६०० ब्राह्मण करतात तिरुपतीचा प्रसाद; १ लाख लाडू रामलला चरणी केले होते अर्पण
18
LLC 2024 : इरफान पठाणची जादू अन् विजयी सलामी; जुन्या आठवणींना उजाळा, भज्जीचा संघ हरला
19
BSNL नं जिओ, एअरटेल, Vi ला दिला 'जोर का झटका'; एकाच महिन्यात वाढले लाखो ग्राहक
20
'खोसला का घोसला'मधील लोकप्रिय अभिनेत्याचा भीषण अपघात, ICU त उपचार सुरु

दुसऱ्यांची प्रगती बघून अस्वस्थ होऊ नका, तुमच्या अपयशाचे कारण कदाचित 'हे' असू शकेल!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2022 4:03 PM

दुसऱ्यांबद्दल असूया, द्वेष, मत्सर वाटणे  स्वभाव आहे, पण त्यावर मात केली तरच आपली यशाची दारं उघडू शकतील!

स्पर्धा निकोप असेल, तर प्रगतीला वाव असतो. परंतु सहसा तसे होत नाही. स्पर्धेतून एकमेकांबद्दल मत्सर वाढतो, द्वेष उत्पन्न होतो आणि दुसऱ्याच्या प्रगतीने आपण अस्वस्थ होतो. हा मनुष्य स्वभाव असला, तरीदेखील त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. दुसऱ्यांच्या प्रगतीबद्दल वाटणारी असूया आपल्या प्रगतीच्या आड येऊन नैराश्याला खतपाणी घालते. त्यावर पर्याय सुचवताना व्याख्याते गौर गोपाल दास प्रभू एक गोष्ट सांगतात. ती वाचल्यावर तुम्हाला बालपणी ऐकलेली गोष्ट आठवेल. ती गोष्ट कोणती हे पुढे कळेलच. आधी प्रभुजींनी सांगितलेली गोष्ट पाहू. 

राहुल आणि जितेन हे दोघेही एकाच विद्यापीठातून एकाच गुणवत्तेने उत्तीर्ण झालेले दोन विद्यार्थी एकाच कंपनीत नोकरीला लागतात. दोघेही एकसारखे मेहनती असूनही वर्षभरातच राहुलला पगारवाढ आणि पदोन्नती मिळते. जितेनला या गोष्टीचा खूप त्रास होतो. तो कुढत राहतो. आणखी मेहनत घेतो. तरीदेखील त्याच्या कामाची दखल घेतली जात नाही. 

एक दिवस जितेन रागारागात राजीनामा देतो. आपल्या मेहनतीची दखल घेतली जात नसल्याचे राजीनाम्यात नमूद करतो. कंपनीचे व्यवस्थापक जितेनच्या याआधीच्या कामाची पाहणी करतात. पण तो नक्की कशात कमी पडतोय, हे पाहण्यासाठी त्याला एक संधी देतात.

जितेनला बोलावून एक काम दिले जाते. आपल्या कंपनीच्या आवारात कोणी टरबूज विक्रेता आहे का? याची पाहणी करण्यास सांगितले जाते. जितेन तपास करून येतो. व्यवस्थापक त्याला टरबुजाची किंमत विचारतो, जितेन पुन्हा जाऊन चौकशी करून येतो. थोड्यावेळाने हेच काम राहुलला दिले जाते. राहुल तपास करून येतो आणि आल्यावर टरबूजवाला कुठे बसतो, तो किती रुपयाला टरबूज देणार आहे, तो टरबूज कुठे पिकवतो, महिन्याला किती उत्पन्न कमवतो, त्याच्याकडून घाऊक भावात खरेदी करायची असल्यास आपल्याला किती नफा होऊ शकेल अशी इथंभूत माहिती आणतो. ते ऐकून जितेन वरमतो. काम सारखेच, परंतु राहुलच्या कामाची पद्धत, त्याची विचार करण्याची पद्धत आणि कामाला दिलेले पूर्णत्त्व यामुळे त्याचे काम आपल्यापेक्षा वरचढ ठरते, हे जितेन च्या लक्षात येते. तो राजीनामा मागे घेतो आणि राहुलच्या हाताखाली राहून काम अधिक चांगल्या रीतीने पूर्ण कसे करता येईल हे शिकून घेतो. 

आता तुम्हालाही बालपणीची अकबर बिरबलाची गोष्ट आठवली ना? बिरबलाच्या जागी बेगम आपल्या भावाचा वशिला लावू पाहते, पण बिरबल म्हणजे आजचा राहुल असतो. जो कामात चोख आणि उजवा असतो. आपल्यालाही अशा राहुलचा, बिरबलाचा आदर्श ठेवायचा आहे. यशाचा मार्ग असाच शोधायचा असतो. त्यामुळे दुसऱ्याच्या यशाने वाईट वाटून न घेता आपण कुठे कमी पडत आहोत, याचा अभ्यास करा आणि आपल्या यशाची वाट तयार करा. तुम्हालाही निश्चितच यश मिळेल!