शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींच्या अपमानाची आठवण, भाजपानं सुनावलं; जे.पी नड्डांचं खरगेंना खरमरीत पत्र
2
मुख्यमंत्रिपदासाठी महायुतीत तीन नावे; भाजपाकडून कोणाचे नाव?
3
...तर मला फासावर लटकवा, जयच्या मृत्यूचं राजकारण करू नका; अमोल मिटकरींचं मोठं विधान
4
‘महाविकास’च्या जागावाटप चर्चेला सुरुवात; चर्चा सलग तीन दिवस सुरू राहणार
5
IND vs BAN : हिटमॅन Rohit Sharma चा पुन्हा फ्लॉप शो!  
6
NPS Vatsalya: दर महिन्याला ₹१००० गुंतवा, मुलांच्या रिटायरमेंटला मिळतील ₹३.८ कोटी; दीड लाखांचं पेन्शनही
7
धक्कादायक! उलट्या दिशेने धावली कोलकात्याहून अमृतसरला जाणारी ट्रेन, ड्रायव्हरला समजल्यावर...  
8
'बिग बॉस मराठी'साठी तरूण होस्ट हवा होता! केदार शिंदेंचं वक्तव्य चर्चेत, म्हणाले- "महेशदादाला..."
9
देशात कसं लागू होणार 'एक देश, एक निवडणूक'; कॅबिनेट मंजुरीनंतर आता पुढे काय? जाणून घ्या
10
यंदाच्या निवडणुकीतून राज्यात किती जणींना मिळणार आमदार होण्याची संधी? २०१९ मध्ये २४ महिलांना मिळाली आमदारकी
11
मुंबईतील 'या' म्हाडा वसाहतीच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; निविदा प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश
12
स्मिता पाटीलच्या लेकाचं करिअर वाचवण्यासाठी सलमान आला धावून, प्रतिक बब्बर म्हणाला- "त्याने मला सिकंदर सिनेमात..."
13
अरेच्चा! पॅरिस विमानतळावरच सुरु झाली हास्यजत्रेची रिहर्सल, टीमचा आता अमेरिका दौरा
14
‘वर्क वेल’ बनली जिल्हा बँकांची ‘लाडकी कंपनी’ सहकारातील भरतीचा घोळ; बँक म्हणते, ‘निविदा भरा’
15
बिहारमधील नवादा येथे गावगुंडांचा धुमाकूळ, गोळीबारानंतर दलितांची ८० घरं जाळली, मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात
16
मनसे कार्यकर्ता जय मालोकर मृत्यू प्रकरणी वेगळं वळण; हृदयविकारानं मृत्यू नाही, तर...
17
तुम्ही Tupperware नाव ऐकलंच असेल! ₹५८६० कोटींचं कर्ज; कंपनी झाली दिवाळखोर, कारण काय?
18
किरण रावनं टाकलं आमिर खानच्या पावलांवर पाऊल, 'लापता लेडीज' आता या देशात वाजणार डंका
19
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जागतिक कृषी पुरस्काराने गौरव; शेतकऱ्यांबद्दल काय म्हणाले?
20
US Fedral Reserve नं कमी केले व्याजदर, शेअर बाजारात दिसू शकते तेजी; आणखी काय परिणाम होणार

आपल्या प्रगतीचा मार्ग आपणच अडवू नका; सांगताहेत गौर गोपाल दास!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2023 7:00 AM

अनामिक भीती मनात असल्यावर आपण प्रगतीच्या दिशेने पावलं टाकताना कचरतो, पण कधी कधी त्याक्षणी दाखवलेला धीर आयुष्याला नवी दिशा देतो!

प्रख्यात व्याख्याते गौर गोपाल दास प्रभू यांनी आपल्या एका व्याख्यानात सांगितले- आपली प्रगती कधी थांबते माहितीये? जेव्हा आपण चार गोष्टींचा अकारण विचार करतो. ते चार प्रश्न म्हणजे- मी अपयशी झालो तर? मी काही गमावून बसलो तर? माझा निर्णय चुकला तर? लोक काय म्हणतील? जेव्हा आपण या चारही प्रश्नांवर मात करायला शिकू, तेव्हा आपण प्रगतीच्या दिशेने पाऊल टाकलेले असेल. यासाठी मी तुम्हाला माझे उदाहरण देतो.

एकदा मला माझ्या एका पायलट मित्राने त्याच्या खाजगी विमानातून सफर घडवायची असे ठरवले. विमानात याआधी देखील मी अनेकदा बसलो होतो, तरीदेखील तो विमान चालवत असताना त्याच्या बाजूला बसून सफर करणे हा माझ्यासाठी नवीन अनुभव होता. ज्या दिवशी आम्हाला सफारीवर जायचे होते, त्याच्या आदल्या दिवशी मी अकारण बेचैन होतो. जणू काही विमान मलाच उडवायचे होते! दुसऱ्या दिवशी त्याच अस्वस्थतेत विमानात बसलो. मात्र, माझ्या मनातले भाव मी चेहऱ्यावर येऊ दिले नाही, अन्यथा माझ्या मित्राचा हिरमोड झाला असता. तो आनंदात होता. आम्ही दोघे उडालो. काही क्षणात माझी भीती पळाली. जवळपास वीस मीनिटे आकाशात सैर करून जमिनीवर लँडींग करताना मला पुन्हा त्याच अस्वस्थतेने ग्रासले. मात्र माझ्या मित्राने अगदी शांतपणे लँडिंग केले आणि आमचा प्रवास पूर्ण झाला. माझी अस्वस्थता पूर्ण दूर झाली होती. 

असाच आणखी एक अनुभव होता स्काय डायव्हिंगचा! आकाशात उंचावर पोहोचल्यावर विमानातून उडी मारायची, अशा वेळी नेमके आपले पॅराशूट उघडले नाही तर? माझ्या प्रशिक्षकाकडून काही चूक झाली तर? माझा अपघात होऊन मी मेलो तर? जमिनीवर सुरक्षित उतरण्याऐवजी कुठे आदळलो तर? अशा सगळ्या नकारात्मक विचारांनी डोक्यात गर्दी केली. शेवटी एका क्षणी मीच मला समजावले, 'आपल्याबरोबर असणाऱ्या प्रशिक्षकाने आजवर हजारो लोकांना हा आनंददायी अनुभव दिलेला आहे. तो माझ्या सोबत असणार आहे. माझ्या पाठीला पॅराशूट असणार आहे. हा अनुभव सुखद व्हावा यासाठी एक यंत्रणा सुसज्ज असणार आहे. एवढे सगळे असूनही जर मी घाबरत राहिलो, तर मी एक सुंदर अनुभव घेण्यापासून स्वत:ला दूर ठेवण्याची चूक करणार आहे.' 

असा सारासार विचार केल्यानंतर दुसऱ्या दिवशी मी स्काय डायव्हिंग केले आणि यशस्वीपणे विमानातून बाहेर झेप घेतली. माझ्या प्रशिक्षकाने मला व्यवस्थित सांभाळले. पॅराशूट वेळेत उघडले आणि आम्ही सुखरूप जमिनीवर आलो. माझ्या मनातले चारही प्रश्न मिटले. याचाच अर्थ मी अकारण काळजी करत होतो.

मित्रांनो, विचारपूर्वक निर्णय घ्या, पण निर्णय घेताना अति विचार किंवा नकारात्मक विचारांनी स्वत:ची प्रगती थांबवू नका. 

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी