शहरं
Join us  
Trending Stories
1
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
2
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
3
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
4
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
5
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
6
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
7
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
8
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
9
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
10
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
11
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
12
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
13
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
14
‘जे. जे.’ नर्सिंग होमला येणार कॉर्पोरेट लूक; खासगी रुग्णालयाप्रमाणे रचना, रुग्णांसाठी अत्याधुनिक सुविधा
15
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
16
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
17
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
18
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
19
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
20
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई

यशाची वाट धुंडाळत बसू नका, नवीन पायवाट शोधून मार्गक्रमण सुरू करा; थांबला तो संपला!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2021 4:43 PM

आपण स्वतःला ओळखायला कमी पडतो. दुसरे आपल्याला मार्ग दाखवतील याची वाट पाहत बसतो. परंतु ज्याला यशस्वी व्हायचे असते, तो आपली पायवाट स्वतः बनवतो!

एक तरुण मुलगा यशस्वी होण्याचा कानमंत्र शोधत सगळीकडे भटकत असे. त्याला कोणीतरी सांगितले. आपल्या गावापासून जवळच लांबच लांब पर्वतरांगा आहेत, त्याच्या पर्वतांच्या कुशीत एक साधू राहतात. एकदा तू त्यांच्याकडे जा, ते तुला नक्की कानमंत्र देतील. 

तरुण मुलगा सुखावला. एक दिवस घरी काहीच न सांगता तो पर्वतरांगांच्या दिशेने निघाला. वाटेत घोर अरण्य होते. परंतु तिथे पोहोचण्याचा ध्यास मनात होता. त्याने वाटेत आलेल्या सर्व अडचणींवर मात करत त्या साधूंचे निवास स्थान शोधून काढले. 

मजल दरमजल करत, ठेचकाळत, अडचणींवर मात करत तो तिथे पोहोचला. तिथे एक छोटेसे झोपडीवजा घर होते. त्याने दार ठोठावले. दार कोणीच उघडले नाही. एवढ्या दूर येऊन हाती निराशा येईल का, हा विचार करत असताना त्याने परत दार ठोठावले. काही वेळाने एक साधू दार उघडून बाहेर आले. तरुण मुलाने आपला परिचय दिला आणि त्यांना आपण का भेटायला आलो, त्याचे प्रयोजन सांगितले. 

साधू हसले. त्यांनी तरुणाला आत घेतले. बसायला आसन दिले. प्यायला पाणी दिले आणि मग विचारले, तू माझ्याकडे यशाचा कानमंत्र घ्यायला आलास? तो तर तुझ्याच जवळ आहे. 

तरुण चक्रावला. त्याने गडबडून साधुंकडे पाहिले, तर साधू त्याला घेऊन घराबाहेर आले आणि त्यांनी त्या उंच पर्वतरांगांवरून विहंगम दृश्य तरुणाला दाखवले. वाटेतल्या दऱ्या, खोरे दाखवले. त्याकडे बोट दाखवून साधू म्हणाले, 'मला भेटण्यासाठी तू इथवर आलास, तेही असंख्य अडचणींवर मात करून! कारण मला भेटायचं हे ध्येय तू ठरवून घेतलं होतं. म्हणून वाटेत शेकडो अडचणी येऊनही तू माघारी फिरला नाहीस. कानमंत्र याहून वेगळा काय असतो? तुला ज्या क्षेत्रात नाव कमवायचे आहे, ते क्षेत्र सुद्धा माझ्या घरासारखे पर्वतरांगांच्या शिखरावर असेल. तुला तिथवर न अडखळता प्रवास करायचा आहे. ते एकदा का जमले, की तुला यशस्वी होण्यापासून कोणीच अडवू शकणार नाही, हाच कानमंत्र लक्षात ठेव आणि यशस्वी हो!

तरुणाचे डोळे उघडले. तुज आहे तुजपाशी म्हणतात ते हेच! आपण स्वतःला ओळखायला कमी पडतो. दुसरे आपल्याला मार्ग दाखवतील याची वाट पाहत बसतो. परंतु ज्याला यशस्वी व्हायचे असते, तो आपली पायवाट स्वतः बनवतो! जो खरे परिश्रम घेतो, त्याला खुद्द भगवंत कानमंत्र देतो!