शहरं
Join us  
Trending Stories
1
वैद्यकीय क्षेत्रातील 'नोबेल' जाहीर! अमेरिकन शास्त्रज्ञ व्हिक्टर अम्ब्रोस, गॅरी रुवकुन यांची निवड
2
Maharashtra Vidhan Sabha: किरीट सोमय्यांवर आता भाजपाने सोपवली नवी जबाबदारी!
3
हर्षवर्धन पाटील यांचा पक्षप्रवेश होताच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, "इंदापूरचे हे महाधनुष्य..."
4
'सुट्टी'वरून राडा! शिक्षिकेची सहकारी शिक्षकाला मारहाण; व्हिडीओ व्हायरल
5
रामराजे निंबाळकरांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली? शरद पवारांचं इंदापुरात मोठं विधान
6
रिल बनवत होता ड्रायव्हर, तेवढ्यात विजेच्या खांबावर आदळली बस, ३ प्रवाशांचा मृत्यू 
7
कोहली, धोनीपेक्षा भारी ठरला हार्दिक पांड्या; सेट केला सिक्सरसह मॅच फिनिश करण्याचा नवा रेकॉर्ड
8
6 दिवसात ₹20 लाख कोटी स्वाहा...! भारत सोडून कोण-कोण जातय चीनला?
9
SBI मध्ये होणार १० हजार पदांसाठी भरती; कधी जारी केली जाणार अधिसूचना?
10
पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचा थरार! Team India देखील जाणार? PCB ने सांगितलं कारण
11
कोलकाता प्रकरणी मोठा खुलासा! "महिला डॉक्टरवर सामुहिक बलात्कार..." CBI'ने चार्जशीट केले दाखल
12
Kapil Honrao : "मी १० वर्ष थिएटर, साडेतीन वर्ष सीरियल करून..."; सूरज जिंकताच अभिनेत्याच्या पोस्टने वेधलं लक्ष
13
"कुठे आहेत ते... त्यांना बोलवा", काँग्रेस आमदार मंचावरूनच सरकारी अधिकाऱ्यांवर संतापले
14
सांगलीत आजी-माजी खासदार समोरासमोर; भरसभेत जुंपली, तणाव वाढला, नेमकं काय घडलं?
15
ही भविष्यवाणी खरी झाल्यास २०२५ पासून होणार मानवाच्या अंताची सुरुवात, नेमकं काय घडणार
16
संजय शिरसाटांचा गौप्यस्फोट; उद्धव ठाकरेंचं सर्व आधीच ठरलं होतं, मग आटापिटा कशाला?
17
Gold Price: सोनं खरेदीच्या विचारात आहात? मग थोडं थांबा, ₹५००० पर्यंत घरण्याची शक्यता, 'या'वेळी येणार करेक्शन
18
पाकिस्तानातील हरवलेले मुख्यमंत्री सापडले! थेट विधासभेत लावली हजेरी, घटनाक्रमही सांगितला
19
अखेर भारत-मालदीवचा वाद मिटला; मुइज्जू यांच्या भेटीनंतर पीएम मोदींचे मोठे वक्तव्य, म्हणाले...
20
बोईंग 737 च्या रडर जॅममुळे DGCA चा ताण वाढला, सर्व विमान कंपन्यांना दिला इशारा

प्रत्येकाच्या आयुष्यात एक तरी खलनायक असतोच; त्याच्याशी हिरो बनून लढा कसा द्यायचा? सांगताहेत गौर गोपाल दास

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2022 11:16 AM

आपण आयुष्याचा सुपर हिरो व्हायचे असेल तर व्हिलनशी लढण्याचे कसब सुद्धा शिकून घेतले पाहिजे, जाणून घ्या कसे!

आपण कितीही चांगले वागलो तरी आपल्याला वाईटात पाहणारी, आपल्या कामाच्या मध्ये येणारी, आपल्याला नावे ठेवणारी माणसे सभोवताली असतात. त्यांच्याकडे आपण दुर्लक्षही करतो. मात्र एखाद व्यक्ती अशीही असते, जिच्याबद्दल मनात तीव्र प्रमाणात द्वेष, संताप, नकारात्मक भावना असते. ती व्यक्ती समोर आली किंवा तिचा नुसता विचार जरी मनाला स्पर्शून गेला तरी आपण अस्वस्थ होतो. अशा खलनायकामुळे आपल्या आयुष्याची वाताहत होऊ न देता त्यांच्याशी संयमाने कसे वागायचे हे सांगताहेत गौर गोपाल दास. 

'विसरा आणि माफ करा' हे सुखी जीवनाचे सूत्र आहे. मात्र ते आचरणात आणणे महाकठीण! कारण, आपल्या बुद्धीला वाईट गोष्टींचे दीर्घकाळ स्मरण राहते. त्यामुळे एखादी गोष्ट तुम्ही विसरू पाहता तेव्हा ती अधिक प्रखरतेने लक्षात राहते. म्हणून ती सोडून द्यायला शिका. उदाहरणार्थ, आपण हातात मोबाईल धरला, तर थोड्या वेळ काही वाटणार नाही, काही वेळाने हाताला मुंग्या येतील, दिवसभर धरून ठेवला तर हात जड होईल, दोन दिवस धरून ठेवला तर हाताला अर्धांग वायूचा झटका येईल. त्यापेक्षा तो थोडा वेळ हातात ठेवला आणि काम झाल्यावर बाजूला ठेवला तर यातना होणार नाही. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे मोबाईल धरून ठेवतात त्रास मोबाईल ला नाही तर तुम्हाला होणार आहे. हीच बाब आयुष्यात आलेल्या त्या नकारात्मक व्यक्तींच्या बाबतीत लक्षात ठेवा. त्यांच्या आठवणी दीर्घकाळ मनात उगाळत बसलात तर त्रास तुम्हाला होईल, त्यांना नाही!

ज्याप्रमाणे मोबाईलमध्ये मेमरी फुल झाली की अनावश्यक गोष्टी आपण एका बटणासरशी डिलीट करतो, तशा आपल्या मनात साचलेल्या आठवणी एका बटणावरती डिलीट होणाऱ्या नाहीत. म्हणून त्या वेळोवेळी काढून टाकाव्या लागतील. जेणेकरून तुम्ही हँग होणार नाही. दुसऱ्यांवर रागावून, चिडून, वाट्टेल तसे बोलून मनस्ताप तुम्हाला होतो हे कायम लक्षात ठेवा, कृती करणाऱ्याला त्याचे सोहेरसुतक नसते. तो वागून मोकळा होतो, पण त्रास आपण काढतो. यासाठी अशा लोकांना माफ करा, दुर्लक्ष करा, अनोळखी व्यक्ती समजून त्यांचे बोलणे मनावर घेऊ नका. असे केल्याने तुमचे आयुष्य सोपे होईल, समाधानी होईल आणि तुम्ही तुमच्या आयुष्याचे हिरो बनू शकाल!