शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
VIDEO: क्रिकेट मॅचमध्ये तुफान राडा! खेळाडूंमध्ये हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी झाली तुडवातुडवी
3
"हिंदूंसोबत विश्वासघात, देव..."; तिरुपतीच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी प्रकरणावरून भाजपची प्रतिक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदर्भातील स्वागतासाठी भाजपाची जय्यत तयारी, तर काँग्रेसचे १० सवाल
5
सातारा: अल्पवयीन मुलाचा ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; घराच्या टेरेसवर घडला किळसवाणा प्रकार
6
हातात खराटा अन् स्वच्छतेचा मंत्र... नागपुरात रेल्वे व्यवस्थापकांनी केली स्थानकावर साफसफाई
7
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
8
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
9
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
10
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
11
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
12
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
13
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
14
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
15
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
16
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
17
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
18
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
20
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश

Ganesh Festival 2022 : गणेशमूर्तीचा अवयव दुखावल्यास अपशकुन मानावा का? त्याविषयी शास्त्रसंकेत काय आहेत, जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2022 10:39 AM

Ganesh Festival 2022 : गणेश मूर्तीची आपण काळजी घेतोच, पण यदाकदाचित काही विपरीत घडले तर काय करायचे तेही जाणून घ्या.

गणेश मूर्ती ही बाळाला हाताळतो तेवढ्याच काळजीने हाताळणे अभिप्रेत असते. परंतु कधी कधी अनावधानाने पूजा करते वेळी, हार घालते वेळी किंवा विसर्जनाच्या वेळी मूर्ती जागची हलवताना मूर्तीला धक्का लागतो आणि चुकून एखादा अवयव दुखावतो. अशावेळी घाबरून जाऊ नका. अशा प्रसंगाचा दूरदृष्टीने विचार आपल्या पूर्वजांनी केला आहे आणि त्यावर उपायही सुचवला आहे. त्याबद्दल सविस्तर वाचा. 

गणेशमूर्तीच्या एखाद्या अवयवास इजा झाल्यास त्या घरात फार मोठे घबराटीचे वातावरण निर्माण होते. पण वास्तवदृष्टीने इजा झाल्यास त्या घरात फार मोठे घबराटीचे वातावरण निर्माण होते. पण वास्तवदृष्टीने विचार केला असता या अवास्तव भयाचे निरसन होते. त्यानुसार प्राणप्रतिष्ठा करण्यापूर्वी किंवा व्रतसमाप्तीदिनी मूर्तीवर विसर्जनाच्या अक्षता वाहिल्यानंतर त्या मूर्तीचा अवयव दुखावल्यास या अवस्थांमध्ये देवत्व नसल्यामुळे यासंदर्भात विचार करण्याचे काहीच कारण नाही. याबाबत 'शास्त्र काय सांगते' या ग्रंथात दिलेली माहिती सविस्तर जाणून घेऊया. 

प्राणप्रतिष्ठेपूर्वी मूर्तीचा अवयव दुखावल्यास ती मूर्ती बाजूला ठेवून दुसरी मूर्ती पूजावी व दोन्ही मूर्तींचे नंतर एकदमच विसर्जन करावे. गणपती विसर्जनासाठी नेताना मूर्तीचा अवयव दुखावल्यास मनात कोणताही किंतू न आणता नेहमीप्रमाणे त्या मूर्तीचे विसर्जन करावे. 

प्राणप्रतिष्ठा झाल्यावर महानैवेद्यातील महारतीनंतर गणेशमूर्तीस इजा पोचल्यास दोष येत नाही. कारण शास्त्रानुसार पार्थिवपूजेत मूर्तीमधील देवत्व त्यादिवशी आरतीपर्यंतच असते. त्यामुळे अशा प्रसंगी आरतीनंतर मूर्तीवर विसर्जनाच्या अक्षता वाहून तिचे विसर्जन करावे. त्यावेली मन:शांतीसाठी देवासमोर तुपाचे निरांजन लावून 'ऊँ गं गणपतये नम:' या मंत्राचा यथासांख्य जप करावा. 

गणेश मूर्ती विसर्जनाच्या वेळी नाजूक मूर्तीला धक्का लागून ती दुखावल्यास मनात शंका कुशंका आणू नका, धर्मशास्त्राने सांगितलेले उपाय करा!

परंतु गणेशचतुर्थीदिवशी प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर पूजा करताना अकल्पित कारणाने मूर्तीचा अवयव दुखावल्यास वा मूर्ती पूर्णतया भंग पाल्यास करताना अकल्पित कारणाने मूर्तीचा अवयव दुखावल्यास या मूर्ती पूर्णतया भंग पावल्यास दुसरी मूर्ती पुजावी. 

मात्र अशा प्रसंगी कोणत्याही परिस्थितीत घाबरून, धीर सोडून सैरभैर होऊ नये. कारण त्यामुळे विवेकबुद्धी क्षीण होऊन मानसिक दुर्बलता येऊ शकते. अशावेळी `ऊँ गं गणपतये नम:' या मंत्राचा सहस्त्र जप करावा. तसेच 'विघ्न येऊ देऊ नकोस' अशी विघ्नहर्त्या गणेशाला प्रार्थना करावी म्हणजे मनातील सर्व शंका कुशंका दूर होतात. 

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सवGanesh Festival Ritualsगणेशोत्सव विधीGanesh Visarjanगणेश विसर्जन