शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

देवाचा हिशोब पक्का असतो, त्यातून कोणाचीही सुटका नाही; आता हीच गोष्ट पहा ना....

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2021 16:33 IST

कर्म करताना कायम भान ठेवा, देव सगळ्या कर्मांचा हिशोब ठेवतो आणि गुण-दोष, सत्कर्म, कुकर्म या सगळ्यांचा हिशोब व्याजासकट परत करतो. 

एक फकीर आपल्या स्वानंदात मदमस्त होत राम नाम घेत एका गावातून दुसऱ्या गावी जात होता . पावसाचे दिवस असल्याने वातावरण प्रसन्न आणि थंडगार होते. फकीर गाणी गात एका हलवायाच्या दुकानासमोरून जात होता.

त्यावेळेस दुकानातून गरमागरम जिलबी आणि खमंग समोशांचा वास येत होता. फकीराची भूक चाळवली. तो क्षणभर तिथे घुटमळला पण जास्त वेळ थांबला नाही. हलवायाने ही बाब हेरली आणि पाठमोऱ्या फकीराला बोलावून एक प्लेट जिलेबी आणि एक प्लेट समोसा खाऊ घातला. तृप्तीचा ढेकर आणि पोटभर आशीर्वाद देऊन फकीर पुन्हा आनंदात रामनाम घेत पुढे निघाला.

रसनातृप्ती केल्याबद्दल त्याने मनोमन देवाचे आणि हलवायलाचे पुन्हा आभार मानले. आनंदाच्या भरात त्याने रस्त्याच्या मध्ये साचलेल्या डबक्यात लहान मुलांसारखी उडी मारली. त्याला गंमत वाटली. पण पुढच्याच क्षणी एका माणसाने त्याची गचांडी आवळली आणि म्हणाला, `काही अक्कल आहे का? तू उडवलेल्या चिखलामुळे माझ्या बायकोची नवी कोरी साडी खराब झाली.' असे म्हणत त्याने फकिराच्या सणकन मुस्कटात लगावली. 

काही क्षणांपूर्वी आनंदात असलेला फकीर डबडबलेल्या डोळ्यांनी आकाशाकडे बघत म्हणाला, `देवा, तुझी लिला न्यारी. कधी गरमागरम जिलबी, समोसे खाऊ घालतोस, तर कधी सणसणीत चपराख!' चिखलाने माखलेला फकीर स्वत:वर हसत हसत उठला. 

त्याला मारून पुढे गेलेला बाईकस्वार काही अंतरावर बाईकवरून घसरून पडला. डोके दगडावर आपटले, रक्त येउ लागले. लोक गोळा झाले. त्याची बायको उठून उभी राहिली आणि नवऱ्याला सावरू लागली. जमा झालेल्या गर्दीला म्हणाली, `त्या फकिराने शाप दिला म्हणून हा अपघात घडला असणार!'

लोकांना हातसफाईला निमित्त मिळाले. गर्दी फकीराच्या दिशेने धावली. ती त्याला मारणार, तेवढ्यात फकीर लोकांना उद्देशून म्हणाला, `मला जरूर मारा, पण माझा अपराध काय ते तरी आधी सांगा!' गर्दीने दूर बोट दाखवत त्या दाम्पत्याला शाप दिल्याचे म्हटले. 

त्यावर हसून फकीर म्हणाला, `माझ्या शापाने काय होणारे? हा तर देवाचा हिशोब होता, त्याने तो पूर्ण केला. त्या माणसाला त्याच्या प्रियजनाला झालेला त्रास बघवला नाही म्हणून त्याने मला मारले, तसे देवाला त्याच्या प्रियजनाला झालेला त्रास बघवला नाही, म्हणून त्याला शिक्षा दिली. हिशोब पूर्ण झाला!'

म्हणून लोकहो, कर्म करताना कायम भान ठेवा, देव सगळ्या कर्मांचा हिशोब ठेवतो आणि गुण-दोष, सत्कर्म, कुकर्म या सगळ्यांचा हिशोब व्याजासकट परत करतो.