शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती शिवाजी महाराजांची विचारधारा म्हणजे संविधान; राहुल गांधींचा भाजपावर घणाघात
2
१० रुपयांचं चॉकलेट, देवाचं दर्शन अन्...; अमेठी हत्याकांडात खळबळजनक खुलासा
3
"पाहिजे तेवढ्या फिती कापा, दीड महिन्याने..."; PM मोदींच्या दौऱ्यावरुन उद्धव ठाकरेंचा घणाघात
4
Bihar Politics : नितीश कुमार यांना भारतरत्न देण्याची मागणी; JDU कडून पोस्टरबाजी; भाजपचाही पाठिंबा
5
अरे देवा! मालगाडीचे २ डबे घसरले; बादल्या, कॅन घेऊन डिझेल लुटण्यासाठी लोकांची झुंबड
6
मैत्रीचा इतिहास: पाकिस्तान कदापी अण्वस्त्रधारी बनू शकला नसता; भारतावर आरोप झाला, इस्रायलने थेट अंगावर घेतला
7
राहुल गांधी कोल्हापूरात पोहचताच उचगावातील कौलारू घरात गेले, तिथे कोणाला भेटले? 
8
IPO च्या तयारीत असलेल्या NSE ला सेबीकडून दिलासा; SEBIच्या इतिहासातील मोठ्या सेटलमेंटसाठी मंजुरी
9
NIA: महाराष्ट्रासह पाच राज्यांमध्ये एनआयएच्या धाडी; जालना, छत्रपती संभाजीनगरमधून तिघांना घेतलं ताब्यात
10
बायकोसाठी गाव सोडणार नाही तर बदलणार! आदिनाथ कोठारेच्या 'पाणी'चा हृदयस्पर्शी ट्रेलर रिलीज
11
करुन दाखवलं! दहावी, बारावी नापास पण वयाच्या २२ व्या वर्षी मिळवलं यश, झाली IAS
12
Kolkata Doctor Case : "२४ तासांत मागण्या पूर्ण न झाल्यास आमरण उपोषण करू", डॉक्टरांचा ममता सरकारला अल्टिमेटम
13
Navratri Puja Vidhi 2024: इच्छित मनोकामनापूर्ती करणारे 'काम्य व्रत' ललिता पंचमीला कसे करायचे? वाचा!
14
'आनंद आहेच पण आता...'; मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिल्यावर 'हास्यजत्रा'चे दिग्दर्शक सचिन गोस्वामींची मार्मिक पोस्ट
15
माजी खासदाराची शरद पवारांच्या राष्ट्रवादीत घरवापसी; अवघ्या २ वर्षात परतले माघारी
16
१० मिनिटांत घरी पोहोचणार गरमागरम जेवण, Swiggy नं सुरू केली नवी सेवा; मुंबई-पुण्यासह 'या' ठिकाणी घेता येणार लाभ
17
Navratri Special : "शेतकरी नवरा नको गं बाई" हा दृष्टिकोन बदलण्याची गरज, अभिनेत्री असलेली मृण्मयी शेतीकडे का वळली?
18
Bigg Boss 18 ची उत्सुकता शिगेला! सलमानने डॅशिंग एन्ट्री घेऊन दाखवला अनोखा अंदाज, बघा व्हिडीओ
19
अहमदनगर शहराचे नाव 'अहिल्यानगर'; जिल्ह्याचे नाव राहणार तेच; सरकारी आदेश जारी
20
Jio Financial ला SEBI नं दिली गूड न्यूज, आता शेअरवर नजर; काय परिणाम होणार?

Guru Purnima 2022: गुरुपौर्णिमेनिमित्त जाणून घ्या व्यासपीठ कशाला म्हणतात ? वाचा महत्त्व आणि नियम!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2022 12:39 PM

Guru Purnima 2022: कार्यक्रमाच्या वेळी व्यासपीठाचा उल्लेख वारंवार होतो, त्या व्यासपीठाचे महत्त्व जाणून घेऊ.

आषाढी एकादशीनंतर चार दिवसांनी येणारा सण म्हणजे गुरुपौर्णिमा. बालपणापासून आपण हा सण साजरा करत आलो आहोत. यंदा १३ जुलै रोजी गुरुपौर्णिमा आहे. तिलाच व्यास पौर्णिमा असेही म्हणतात

या दिवशी महर्षी व्यासांनी पुन्हा पृथ्वीवर जन्म घेतला, अशी आपली श्रद्धा आहे. त्यामुळे संन्यासी मंडळी या दिवशी व्यासांची पूजा करतात. त्यासाठी स्नानदी नित्यकर्मानंतर संकल्पपूर्वक एक सुती धूतवस्त्र अंथरतात. त्याच्यावर गंधाने पूर्वेकडून पश्चिमेकडे आणि उत्तरेकडून दक्षिणेकडे अशा बारा रेषा काढतात. हेच व्यासपीठ! त्यावर ब्रह्मा, विष्णू, वसिष्ठ, पराशर, शक्ती, व्यास, शुक्रदेव, गौडपाद, गोविंदस्वामी आणि शंकराचार्य यांना आवाहन केले जाते. त्यानंतर त्यांची विधीवत कृतज्ञतापूर्वक पूजा करतात. दक्षिणे. कडील शंकरपीठांमध्ये या दिवशी महोत्सवच असतो. 

ही विधीवत पद्धत आज अनेकांना माहित नसली, तरीदेखील कलासादरीकरणाला वाव देणाऱ्या व्यासांना स्मरून सादरीकरण मंचाला व्यासपीठ हे नाव दिले गेले. आजही कलाकार, वक्ते, व्याख्याते, कीर्तनकार, प्रवचनकार, त्या व्यासपीठाला वंदन करून मगच सादरीकरणाला सुरुवात करतात.

व्यास हे अखिल जगाचे गुरु आहेत. आपल्या संस्कृतीची मूळ संकल्पना ही व्यासांचीच आहे. त्यांनीच तिची जोपासना केली. व्यास आपले धर्म अध्यात्म वाङमय अशा सर्व विषयातील गुरु आहेत. त्यामुळे संस्कृती व्यासांचे असे कृतज्ञतापूर्वक स्मरण करते. याच दिवशी आपल्या मातापित्यांची आणि गुरुंची पूजा करण्याची प्रथा ओ. निष्ठावान शिष्य आणि आदर्श गुरु यांचे परस्परांशी असलेले नाते अन्य मंडळींना कळणारे नसते. शिष्याला आपला गुरु हा देवाहूनही श्रेष्ठ असतो. तर शिष्याला भवसागरातं पैलपार नेण्याची शक्ती केवळ गुरुंपाशीच असते. 

आजच्या काळात आदर्श गुरु आणि आदर्श शिष्य मिळणे कठीण आहे. गुरुंकडे ज्ञान असले तरी शिष्याकडे शिकण्याची ओढ नसते  किंवा शिष्याची शिकायची तयारी असली, तरी त्याला योग्य गुरुंची साथ लाभत नाही. आजचे गुरु शिष्य व्यवहारी जगात अडकले आहेत. परंतु ज्ञानाची, अध्यात्माची, परमेश्वर प्राप्तीची तळमळ फारच कमी गुरुशिष्यांमध्ये आढळते.

तरीही अजूनही काही गुरुशिष्यांची जोडी अशी आहे, ज्यांनी अजूनपर्यंत या नात्याचे पावित्र्य जपत गुरुशिष्य परंपरा अबाधित ठेवली आहे. व्यासपीठाचा मान राखला आहे. या निमित्ताने आपणही आपल्या आयुष्याला वळण देणाऱ्या गुरुंचा मान राखुया. त्यांना गुरुदक्षिण देऊया आणि दत्त गुरुंचे दर्शन घेऊन गुरुपौर्णिमा साजरी करूया. 

 

टॅग्स :Guru Purnimaगुरु पौर्णिमा