शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
5
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
6
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
7
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
8
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
9
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
10
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
11
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
12
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
13
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
14
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
15
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
16
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
17
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
18
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
19
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे
20
डिंपल यादव यांच्याबद्दल वादग्रस्त विधान; मौलाना साजिद रशीदींना न्यूज चॅनेलच्या स्टुडिओमध्ये मारहाण

Guru Purnima 2023: शिष्यानी गुरुंना 'ही' भेट दिली असता ते खुश होतात; सांगताहेत सद्गुरु!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2023 16:07 IST

Guru Purnima 2023: गुरुपौर्णिमेची भेट म्हणून गुरु शिष्याने परस्परांना कोणती भेट दिली पाहिजे याबद्दल सद्गुरु यांनी खुलासा केला आहे. 

गुरुपौर्णिमेच्या दिवशी विद्यार्थ्यांनी गुरूंच्या ऋणनिर्देशनार्थ काही भेटवस्तू देण्याचा प्रघात पूर्वापार आहे. आजही शाळेत जाणारी लहान मुलेसुद्धा शिक्षकांसाठी आठवणीने एखादे फुल, भेटपत्र, मिठाई अशा गोष्टी घेऊन जातात. पालक त्यासाठी प्रोत्साहन देतात. कारण जे शिक्षक आपले भवितव्य घडवतात, त्यांच्याप्रती आपल्या पाल्याने कृतज्ञता बाळगावी असा त्यामागचा हेतू असतो. मात्र अशी ऐहिक सुखांशी संबंधित गोष्टी दिल्याने गुरु प्रसन्न होतात का? तसे होणार असतील तर ते शिष्याच्या दृष्टीने योग्य ठरेल का? गुरूंना नेमके काय दिले तर ते खुश होतील याबद्दल सद्गुरुंचे म्हणणे काय आहे ते जाणून घेउ. 

सद्गुरू म्हणतात, 'गुरु शिष्याला घडवत असतात, ती एका रात्रीत घडणारी गोष्ट नाही. त्यामागे गुरूंची शिकवण्याची आणि विद्यार्थ्यांची शिकण्याची तपश्चर्या असते. ज्याप्रमाणे तुम्ही ऑक्टोबर नोव्हेम्बरमध्ये आंब्याचे झाड पाहिले तर त्याला आंबा लागलेला दिसत नाही, मात्र तेच झाड जानेवारी-फेब्रुवारी मध्ये बघाल तर त्या झाडाला फुलं अर्थात मोहोर आलेला असतो. त्या झाडाची फांदी, मूळ, फुल गोङ लागत नाहीतर, मात्र मार्चपासून मे पर्यंत तेच झाड कैऱ्यांनी लगडलेले दिसते आणि त्या कैऱ्या काहीकाळाने मधुर रस देणारे आंबे बनून तयार होतात. या तयारीच्या खुणा आधी दिसत नाहीत मात्र झाडात दिसत नसलेला गोडवा फळात उतरतो. तीच प्रक्रिया गुरु शिष्यांच्या बाबतीत घडत असते. गुरु आपल्या शिष्याला घडवत असतात. तो यशस्वी होईपर्यंत लागणारा काळ हा गुरूंसाठी तपश्चर्येचा काळ असतो. शिष्य यशस्वी झाल्यावर गुरूंना ते फळ मिळते. मग त्याची परतफेड कशी करावी?

गुरूंच्या ऋणातून कोणताही शिष्य उतराई होऊ शकत नाही आणि त्याने होऊही नये असे सद्गुरू सांगतात.  ते म्हणतात शिष्यांनी गुरूंना काही देण्यापेक्षा त्यांच्याकडून कायम घेत राहावे. सर्वात मुख्य गोष्ट म्हणजे गुरूंकडून जे घेतलेले आहे ते वापरून फेकून देऊ नये किंवा विसरून जाऊ नये. गुरूंकडून घेतलेले ज्ञान पुढे हस्तान्तरीत करावे मात्र ते वाया जाऊ देऊ नये. गुरूंना शिष्याकडून मिळालेली ही भेटच सर्वात जास्त प्रिय ठरू शकते. म्हणून गुरूंनी कायम देत (ज्ञान) राहावे आणि शिष्यांनी कायम गुरूंकडून ज्ञान घेत राहावे असे सद्गुरू सांगतात. 

टॅग्स :Guru Purnimaगुरु पौर्णिमा