शहरं
Join us  
Trending Stories
1
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
2
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
3
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
4
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
5
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
6
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
7
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
8
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
9
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
10
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
11
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
12
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
13
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
14
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
15
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
16
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
17
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
18
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
19
‘कोस्टल’वरून ४० लाख वाहनांची वर्दळ; वाहतूक नियोजनाला आणखी गती मिळाली
20
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल

Hanuman Jayanti 2023: हनुमंताला श्रीरामांचा अखंड सहवास कसा मिळाला, भक्त-भगवंताच्या नात्याची गोड गोष्ट!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2023 7:00 AM

Hanuman Jayanti 2023: श्रीरामांवर हनुमंताचे आणि हनुमंतावर श्रीरामांचे अगाध प्रेम होते याचा दाखला देणारा छोटासा पण मजेशीर प्रसंग वाचा...

नुुकत्याच स्नान करून आलेल्या सीतामाई कुंकू लावीत होत्या आणि कौतुकाने मान वळवून हनुमंत तेथे निरीक्षण करीत होता. मधल्या बोटावर सिंदुर घेऊन सीतामाईने तो स्वत:च्या भांगात भरला, तेव्हा हनुमंताने विचारले, `सीतामाई, भांगात सिंदुर कशासाठी भरता?'त्यावर सीतामाईने उत्तर दिले, `अरे, प्रभू रामरायाचे आयुष्य वाढावे म्हणून!'हे ऐकल्याबरोबर हनुमंत ताडकन उठला आणि बाहेर गेला. थोड्यावेळाने परत आला, तेव्हा त्याला पाहून सीतामाईला हसू आवरेना. त्यांनी त्याला विचारले, हे काय केलंस?हनुमंताने गंभीर स्वरात उत्तर दिले, `माझ्या प्रभूंसाठी हे करावयास नको का?'

त्याचे भोळे प्रेम पाहून सीतामाईचा उर भरून आला. परंतु हनुमंताची काळजीही वाटली. त्यामुळे त्या म्हणाल्या, `अंगाची आग होऊ नये आणि शेंदूर जाऊ नये म्हणून त्यावर तेल लाव.'हनुमंताने आज्ञाधारकपणे सीतामाईला विचारले, `म्हणजे आता माझा रामराय अमर होईल ना?'

नंतर रामराज्याचा विषय काढत तो म्हणाला, `सीतामाई तुम्ही काम वाटून दिले, पण मला काहीच काम दिले नाही, असे का?'सीतामाई म्हणाल्या, `तुला काय काम द्यावे मलाच सुचत नाही. तुच विचार करून सांग.'

हनुमंत थोडा विचार करून म्हणाला, `सीतामाई, राज्याभिषेक हे श्रमाचे दिवस, प्रभूंना झोप येऊन चालणार नाही. मी चुटक्या वाजवत राहीन!'

रामरायाचा अखंड सहवास मिळावा म्हणून हनुमंताने हे काम शोधून काढले हे सीतामाईच्या लक्षात आले. त्याच्या भक्तीची प्रशंसा करत सीतामाईने होकार दिला आणि हनुमंताला त्या मंगलक्षणी छोट्याशा कामातून रामरायाचा अखंड सहवास मिळाला. 

टॅग्स :Hanuman Jayantiहनुमान जयंतीramayanरामायण