शहरं
Join us  
Trending Stories
1
Haryana, Jammu & Kashmir Assembly Election Results 2024 Live: विजयाचे श्रेय पंतप्रधान मोदींना- हरयाणाचे मुख्यमंत्री सैनी यांची प्रतिक्रिया
2
Uddhav Thackeray : "गद्दारांना ५० खोके आणि बहिणीला फक्त १५०० रुपये; हा महाराष्ट्रधर्म नाही" - उद्धव ठाकरे
3
ढोल वाजवले, फटाके फोडले; लाडू, जिलेबी वाटली, पण… काँग्रेसच्या उत्साही कार्यकर्त्यांवर नामुष्की 
4
"...हाच आजच्या निवडणूक निकालाचा धडा"; अरविंद केजरीवाल निकालावर काय म्हणाले?
5
ओमर अब्दुल्ला होणार जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री; विजयानंतर फारुख अब्दुल्लांची घोषणा
6
'त्या' लोकांना दहशतवाद्यांसारखी वागणूक द्या; तुषार गांधींची उद्धव ठाकरेंकडे मागणी
7
हरयाणात 'मोदी मॅजिक', राहुल गांधींनी जिथे सभा घेतल्या, त्या उमेदवारांचे काय झाले? पाहा...
8
Bharti Airtel करणार Tata Group सोबत मोठी डील, टाटांची 'ही' कंपनी खरेदी करण्याची तयारी
9
Haryana Election Result : "हरयाणात नक्कीच काँग्रेस पक्ष सरकार स्थापन करेल...", विनेश फोगाटचा दावा
10
गाडीसाठी 20, घरासाठी 60 लाख... हरयाणाच्या आमदारांना किती वेतन मिळते? 
11
हरयाणात काँग्रेसला अजुनही होप्स...? 'या' जागा ठरवणार कोणाचे सरकार, मताधिक्य केव्हाही....
12
YouTuber ने ठोकली १.७ कोटींची सुपरकार, गाडी चालवताना करत होता Live स्ट्रीम (Video)
13
"आधी बायकोसाठी बाथरुम बांधणार", 'बिग बॉस मराठी' विजेता सूरज चव्हाणचं वक्तव्य, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
14
मोदी बागेत रणनीती! सुप्रिया सुळेंच्या कारमध्ये चेहरा लपवणारा 'ती' व्यक्ती कोण?
15
Bigg Boss 18 : "तुम्ही माझ्या हृदयात स्थान बनवलं आहे", 'बिग बॉस'च्या घरात सदावर्तेंचं चाललंय तरी काय?
16
Post Office Scheme: दररोज ३३३ रुपये वाचवून करा गुंतवणूक, १० वर्षांनी तयार होईल लाखोंचा फंड
17
Eknath Shinde News : मंत्रिमंडळ बैठकीसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आजचे सर्व कार्यक्रम अचानक रद्द, कारण...
18
अजित पवारांची आमदार संजयमामा शिंदेंनी वाढवली डोकेदुखी, विधानसभा निवडणुकीबद्दल घेतला मोठा निर्णय
19
"ती खूप रडली, खोलीत स्वत:ला..." सलमानसोबतचा सिनेमा बंद झाल्यावर आलियाची झालेली अशी अवस्था
20
Ashok Gehlot : "ही विचारधारेची लढाई, शेवटी काँग्रेस..."; हरयाणा निकालावर अशोक गेहलोत यांचं मोठं विधान

आयुष्याचा कंटाळा आला असेल तर 'कालमापन यंत्र' आजच विकत घेऊन या; कारण... 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2022 1:50 PM

गेलेली वेळ परत येत नाही. म्हणून हिऱ्यापेक्षा अमूल्य काही असेल, तर ती आहे वेळ! आज सकाळी आपण जो सूर्योदय ...

गेलेली वेळ परत येत नाही. म्हणून हिऱ्यापेक्षा अमूल्य काही असेल, तर ती आहे वेळ! आज सकाळी आपण जो सूर्योदय पाहिला, तो तसाच उद्या अनुभवता येईल असे नाही. प्रत्येक दिवस नवीन संधी घेऊन येतो. परंतु, या संधीचे सोने केले नाही, तर वेळ वाया गेला, असे म्हणावे लागेल. यासाठी वेळेच्या नियोजनाला प्राधान्य द्या; सांगत आहेत आध्यात्मिक वक्ते ग्यानवत्सल स्वामी. 

स्वामींनी वेळ व्यवस्थापनाला त्रिसूत्रीत विभागले आहे. ते सांगतात, वाळूचे कालमापनाचे यंत्र डोळ्यासमोर ठेवा. झरझर निसटणारी वाळू म्हणजे आपल्या हातून निसटणारी वेळ आहे. तिचा योग्य विनिमय करायचा असेल तर प्रत्येक दिवसाचा हिशोब ठेवायला शिका. हा हिशोब कसा मांडायचा? तर दिवसातल्या २४ तासांना तीन टप्प्यात विभागून घ्या. 

पहिले आठ तास झोपेचे. ती पूर्ण झाली नाही, तर सगळे गणितच बिघडेल. पुढचे आठ तास आपल्या नियोजित कामाचे. अभ्यास, व्यवसाय, नोकरीचे. शेवटचे आठ तास, जे आपण वाया घालवतो, ते आठ तास आपल्याला कामी लावायचे असतील, तर त्यात आणखी ९ भाग पाडून त्यांना आलटून पालटून प्राधान्य दिले पाहिजे. कसे ते बघा -

पहिला टप्पा :कुटुंब, मित्रपरिवार, नातेसंबंध दुसरा टप्पा : आरोग्य, स्वच्छता, छंदतिसरा टप्पा : आत्मसंवाद, निर्मळ हास्य आणि समाजसेवा

या गोष्टी शेवटच्या आठ तासात आपण केल्या पाहिजेत. जेणेकरून आपल्याला आयुष्यात कंटाळा येणारच नाही. नैराश्य स्पर्श करू शकणार नाही. वेळ वाया जाणार नाही आणि एक चांगले, आनंदी आणि निरोगी आयुष्य जगल्याचे समाधान आपल्याला नक्की मिळेल. 

म्हणून आजपासून आयुष्यात ही त्रिसुत्री वापरायला सुरुवात करा, सकारात्मक बदल आपोआप घडू लागतील.