शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

हे अनमोल रत्न तुम्हाला मिळाले, तर तुमचे आयुष्य पूर्णपणे बदलून जाईल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2021 15:15 IST

देवाने रिकाम्या हाताने कोणालाही पाठवलेले नाही. प्रत्येकाकडे काही ना काही गुण आहेत, जे एकमेवाद्वितीय आहेत. त्यांची प्रतिकृती बनू शकते, परंतु मूळ गुण बदलत नाही.

एक मनुष्य देवपूजा करत होता. परंतु पूजेत त्याचे मन लागत नव्हते. आपल्या नशिबाला, देवाला, दैवाला तो दोष देत होता. अचानक देव प्रगट झाले आणि त्याच्या खांद्यावर त्यांनी हात ठेवला. तो मनुष्य घाबरला. देव म्हणाले, 'घाबरू नकोस, मी कोणी बहुरंगी नाही, तर तर ज्याची तू पूजा करत होतास तोच मी देव आहे. तुझ्या समस्या सोडवायला आलोय.'

मनुष्य म्हणाला, 'देवा तुम्ही यायचे कष्ट कशाला घेतलेत, मलाच तुमच्याजवळ बोलावून घेतले असते. तसेही इथे माझे काही काम नाही की जगण्याला उद्दिष्ट नाही. जगून काय करू, मला तुमच्या बरोबर घेऊन चला.'देव म्हणाले, 'ठीक आहे नेतो. त्याआधी माझे एक काम कर. हे लाल रत्न घे आणि त्याचा बाजारभाव काढून आण, पण अट एवढीच आहे, की हे रत्न विकायचे नाहीस. संध्याकाळी परत घेऊन यायचे.' 

देवाची आज्ञा मानून मनुष्य ते रत्न घेऊन निघाला. बाजारात त्याने एका फळ विक्रेत्याला रत्न दाखवले, 'तो म्हणाला मला हे रत्न विकत घ्यायला आवडेल. त्या मोबदल्यात दहा डझन आंबे घेऊन जा.'नंतर तो मनुष्य एका सोनाराकडे गेला. रत्न पाहून सोनाराचे डोळे चमकले. तो म्हणाला, 'पन्नास लाखात सौदा करूया. आताच्या आता तुला चेक देतो, तू हे रत्न दे.' मनुष्य काहीच बोलला नाही पाहून सोनार म्हणाला, 'एक कोटी देतो, मग तर झालं? दे ते रत्न मला!'मनुष्य म्हणाला, 'माफ करा, मला हे रत्न विकण्याची अनुमती नाही, मी फक्त बाजारभाव काढायला आलो होतो.' हे ऐकून सोनाराने त्याला हाकलून लावले. 

तो मनुष्य लाल रत्न घेऊन हिऱ्यांच्या व्यापाऱ्याकडे आला आणि रत्नाची किंमत विचारू लागला. हिऱ्यांचा व्यापारी डोळे विस्फारून म्हणाला,'एवढं अनमोल रत्न तुम्हाला कुठे मिळालं? माझी सगळी मालमत्ता विकली तरी हे रत्न मी विकत घेऊ शकणार नाही. मीच काय तर जगातली कोणतीही व्यक्ती ते विकत घेऊ शकणार नाही.'

हे ऐकल्यावर मनुष्य लगबगीने घरी आला आणि त्याने देवाच्या पायाला मिठी मारत म्हटलं, देवा या रत्नाला एवढी किंमत आहे, यातली थोडी किंमत जरी माझ्या जीवाला असती तर किती बरं झालं असतं?'देव म्हणाले, 'अरे वेड्या हेच समजवायला मी तुला हे रत्न दाखवलं. तूच काय, तर प्रत्येक जण अनमोल रत्न आहे. त्याची पारख करणारा खरा गुणग्राही हवा. कुठेही जाऊन त्याची किंमत होणार नाही. त्याच्यासाठी अनुकूल जागा शोध आणि मग स्वतःची किंमत जाणून घे!'

तात्पर्य : देवाने रिकाम्या हाताने कोणालाही पाठवलेले नाही. प्रत्येकाकडे काही ना काही गुण आहेत, जे एकमेवाद्वितीय आहेत. त्यांची प्रतिकृती बनू शकते, परंतु मूळ गुण बदलत नाही. म्हणून स्वतःला त्या लाल रत्नासारखे घडवा. जेणेकरून उचित गुणग्राही, रत्नपारखी व्यक्ती आली, की या अनमोल रत्नाला झळाळी मिळायला वेळ लागणार नाही.