शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राची इच्छा पूर्ण झाली! सूरज चव्हाण 'बिग बॉस मराठी'चा महाविजेता; अभिजीत सावंतचं स्वप्न भंगलं
2
उद्धव ठाकरे यांची मुलावर टीका; एकनाथ शिंदे भडकले, म्हणाले…
3
"8 ऑक्टोबरनंतर बिहारमध्ये राजकीय भूकंप"! NDA संदर्भात आरजेडी नेत्याची मोठी भविष्यवाणी 
4
INDW vs PAKW : पाक विरुद्ध विजयी जल्लोष! हरमनप्रीत ब्रिगेडनं पुन्हा मारलं मैदान
5
Bigg Boss Marathi Season 5: टॉप ३ च्या शर्यतीतून 'हा' सदस्य बाहेर, कुटुंबाच्या उपस्थितीत झालं एलिमिनेशन
6
भारतीय महिलांनी पाकिस्तानला दिला 'जोर का झटका'; क्रिकेटच्या देवाने केलं 'नारीशक्ती'चे कौतुक
7
रामराजेंनी घेतली शरद पवारांची भेट?; रणजीतसिंह निंबाळकरांचा खळबळजनक दावा
8
नवा फास्टर किंग Mayank Yadav ची दाबात एन्ट्री; असा पराक्रम करणारा तिसरा गोलंदाज
9
बंगालमध्ये पुन्हा बलात्कार अन् हत्या; आरोपीला 3 महिन्यांत फाशीची शिक्षा, ममतांचा अल्टिमेटम
10
9 चिमुकल्यांची शिकार करणाऱ्या लांडग्यांची दहशत संपली; शेवटचा लांडका मृतावस्थेत आढळला
11
हरियाणात कसं स्थापन होणार भाजप सरकार? नायब सैनी यांनी सांगितला पुढचा प्लॅन, म्हणाले...
12
पाकिस्तानात काहीही होऊ शकतं... आता थेट मुख्यमंत्रीच झाले बेपत्ता, नक्की प्रकरण काय?
13
Bigg Boss Marathi Season 5: रितेश देशमुखला मिळाल्या भाईजानकडून शुभेच्छा, म्हणाला, "सगळ्यांना वेड लावलं..."
14
कुणासोबत डिनर करायला आवडेल किम जोंग की जॉर्ज सोरोस? जयशंकर यांचं उत्तर ऐकून टाळ्यांचा कडकडाट; बघा Video
15
IND vs PAK मॅचमध्ये Arundhati Reddy चा तोरा; ज्यानं प्रसादच्या अविस्मरणीय सीनला उजाळा (VIDEO)
16
Bigg Boss Marathi Season 5: दोन आठवडे 'भाऊचा धक्का' का झाला नाही? रितेशने प्रेक्षकांची माफी मागत सांगितलं कारण
17
अजित पवारांची आघाडी; जनसन्मान यात्रेत विधानसभेसाठी आणखी एका उमेदवाराच्या नावाची घोषणा
18
कोकण हार्टेड गर्ल घराबाहेर! अंकिताच्या चाहत्यांना मोठा धक्का, म्हणाली- "मी १०० टक्के दिले, पण..."
19
INDW vs PAKW : रिचा घोषनं घेतला सुपर कॅच; पाक कॅप्टनचा खेळ खल्लास! (VIDEO)
20
"उत्तर गाझा खाली करा", IDF ची वॉर्निंग! इस्रायलकडून लेबनॉनमध्ये मृत्यूचं तांडव, हिजबुल्लाहचा पलटवार

तणावमुक्त आयुष्य जगायचे असेल, तर हा 'खात्रीशीर' उपाय नक्की करून पहा!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2021 10:25 AM

यापुढे जेव्हा जेव्हा मनावर ताण येईल, तेव्हा तेव्हा स्वतःला समजवा, मी माझ्याकडून पूर्ण प्रयत्न केले आहेत बाकी गोष्टी ज्या माझ्या आवाक्यात नाहीत त्या मी देवावर सोपवून दिल्या आहेत. क्षणार्धात ताण नाहीसा होतो की नाही बघा.

जवळपास १०० कोटी रुपयांची उलाढाल असणारा एक व्यावसायिक रोज रात्री झोपेच्या गोळ्या घेऊन झोपतो, याउलट दिवसाला शंभर रुपये कमावणारा कामगार पाठ टेकवताच झोपी जातो. वास्तविक हेचित्र उलट असायला हवे ना? परंतु तसे होत नाही. कारण १०० कोटी कमावणारा २०० कोटींपर्यंत व्यवसाय कसा नेता येईल या विवंचनेत असतो, तर १०० रुपये कमावणारा आजचा दिवस भागला या समाधानात झोपतो. तात्पर्य, जो समाधानी असतो, तो तणावमुक्त असतो.

बालपणापासून आपल्यावर समाधानी राहण्याचा संस्कारच झालेला नाही. दुसऱ्याला कणभर जास्त गेलेले आपल्याला पचत नाही, रुचत नाही. परंतु त्याच्या आणि आपल्या वाट्यात फक्त कणभराचा फरक आहे, हे मन स्वीकारत नाही. हीच सवय मनाला जडते आणि कणभराने वाढलेल्या अपेक्षा मणभर कधी होत जातात, हे आपल्याही लक्षात येत नाही. 

आपण सगळेच जण काही ना काही कारणांनी सतत दुःखी असतो. कारण आपण सगळेच आपल्या मनावर अदृश्य स्वरूपात असलेले अपेक्षांचे ओझे वाहत असतो. या ओझ्याखाली दबून जीवाची घुसमट होतेय, परंतु ते ओझे उतरवून खाली ठेवण्याची आपल्याला शुद्धच राहिलेली नाही. अपेक्षा न संपणाऱ्या आहेत, परंतु आपल्याला समाधानी राहायला शिकायचे आहे. ते कसे राहायचे ते पाहू!

आपल्या आवाक्यात शंभर गोष्टी असतील, परंतु हजार गोष्टी आपल्या आवाक्याबाहेरच्या आहेत, हे आपण मान्य करत नाही. यासाठी आपण आपल्या कामाप्रती शंभर टक्के द्यावेत बाकी भार देवावर सोपवावा. दिवसभर अथक परिश्रम करावेत, परंतु या परिश्रमाचे फळ काय मिळेल हे आपल्या हाती नाही, म्हणून तो भार देवावर टाकावा. 

रात्री झोपण्यापूर्वी दिवसभराचे कर्म देवाच्या पायी अर्पण करून त्या कर्माचे फळ 'तुला उचित वाटेल ते दे', असे म्हणून आपण निश्चिन्त मनाने झोपी जावे. सगळा तणाव क्षणार्धात नष्ट होईल. कोणीतरी आपली काळजी घेणारं आहे, ही भावनादेखील अत्यन्त दिलासादायक असते. अंधारात एकट्याला चालताना भीती वाटेल, पण कोणाची सोबत असेल तर धीर वाटतो. त्याचप्रमाणे भविष्यात काय दडले आहे, हे आपल्याला दिसत नाही. पुढे चाचपडत जाताना भगवंत आपल्या सोबत आहे, ही भावना मनाला नक्कीच उभारी देते. म्हणून हा प्रवास न थांबता करायचा असेल, तर त्याला सोबती बनवा आणि काही भार स्वतः वर घेऊन तर काही भार देवावर सोपवून निश्चिन्त व्हा. 

यापुढे जेव्हा जेव्हा मनावर ताण येईल, तेव्हा तेव्हा स्वतःला समजवा, मी माझ्याकडून पूर्ण प्रयत्न केले आहेत बाकी गोष्टी ज्या माझ्या आवाक्यात नाहीत त्या मी देवावर सोपवून दिल्या आहेत. क्षणार्धात ताण नाहीसा होतो की नाही बघा. चिंता करून चिंता दूर होत नाहीत, मग विश्वास ठेवून चिंता दूर करण्याचा प्रयत्न करूया. बरोबर ना?