शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआकडून लाडकी बहीण योजनेच्या कालावधीबाबत शंका; देवेंद्र फडणवीस ठामपणे म्हणाले...
2
भारतविरोधी षड्यंत्रात काँग्रेस सामील; समाजाला कमकुवत करण्याचा प्रयत्न, PM मोदींचा घणाघात
3
भक्तांसाठी आनंदाची बातमी: निमगाव खंडोबा क्षेत्र विकासासाठी २४ एकर जमीन; शासन निर्णय जारी 
4
"सकाळी नऊ वाजताचा भोंगा, रात्रीच तयारी करून बसला होता"; फडणवीसांनी राऊतांना डिवचलं
5
धक्कादायक! प्रेमाच्या त्रिकोणातून तरुणीने केली तरुणीची हत्या
6
"खोट्याच्या कडू घोटावर विकासाची गॅरंटी भारी पडली’’, हरयाणातील विजयानंतर मोदींचा टोला 
7
वडील-काकाची दहशतवाद्यांनी केलेली हत्या; मुस्लिमबहुल मतदारसंघातून शगुन परिहार विजयी
8
"हरयाणात भाजपा EVMमध्ये छेडछाड करून जिंकला, हा निकाल मान्य नाही’’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
9
हरयाणात झाली रोमांचक लढत, अवघ्या ३२ मतांनी फैसला, अखेरीस जिंकलं कोण? पाहा 
10
"...यामुळेच हा ऐतिहासिक विजय झाला"; हरयाणाच्या निकालावर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया
11
Haryana Assembly Election Results 2024 : दिल्लीच्या जवळपास कमळाची कमाल, आम आदमी पार्टी बेहाल; डिपॉझिटही वाचलं नाही!
12
J&K मध्ये फुटीरतावादाचा सुपडा साफ, एआयपी आणि जमात-ए-इस्लामीला मतदारांनी नाकारले
13
हरयाणा निवडणुकीचे 'मॅन ऑफ मॅच' ठरलेल्या CM नायबसिंग सैनी यांची संपत्ती किती?
14
Ola नंतर Ather नं इलेक्ट्रिक स्कूटरच्या किंमती केल्या कमी, आता स्वस्तात खरेदी करण्याची संधी!
15
जुन्नरमध्ये आयात उमेदवाराच्या हाती तुतारी दिल्यास बंड अटळ?; मविआतील नाराज निष्ठावंतांच्या गोटात हालचालींना वेग
16
गेल्या महिन्यात कोणत्या कंपनीनं सर्वाधिक विकल्या Electric Scooters?
17
"महाराष्ट्रातील जनताही अशा फेक..."; हरयाणातील निकालानंतर CM शिंदेंचा MVA वर 'वार'
18
"आपण तर खरोखरच मोठी 'पनौती' निघालात, हुड्डांनाही..."; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा राहुल गांधींवर निशाणा
19
बुलेट ट्रेन जितकी खास, तितकीच स्टेशनही... वीज बचत अन् प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य!
20
नायब सिंह सैनींनी मारली बाजी; विजयादशमीला घेऊ शकतात मुख्यमंत्रीपदाची शपथ?

मोक्ष हवा असेल तर मांजर पाळू नका; काय आहे यामागील तथ्य? जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2022 4:21 PM

मांजरप्रेमींनो नाराज होऊ नका, साधू महाराजांना नक्की काय सांगायचे आहे ते जाणून घ्या!

शीर्षक वाचून असंख्य मांजर प्रेमी गोंधळले असतील. मोक्षही हवा आणि मांजरही अशी त्यांची द्विधा मनःस्थिती झाली असेल. कोणाही एकाला निवडायचे तर दुसऱ्याचा त्याग करावा लागणार, या विचाराने नाराज होऊ नका. ओशो सांगताहेत या वचनामागील तर्कवाद, तेही एका गोष्टीच्या स्वरूपात... 

एक साधू होते. त्यांच्याकडे शंका निरसन करण्यासाठी अनेक लोक येत असत. त्यातल्याच एकाने दुःखाचे कारण विचारले. त्यावर साधू म्हणाले, 'तुझ्या घरातली मांजर हे तुझ्या दुःखाचे मूळ आहे. तिला सोडून दे!' व्यक्ती गोंधळली. ती म्हणाली, 'पण महाराज, तिची बिचारीची काहीच चूक नाही की तिचा काहीच त्रासही नाही. पण तुम्ही तिलाच सोडून द्यायला सांगत आहात. 

साधू म्हणाले, 'माझ्या गुरुंनी मला सांगितले ते मी तुला सांगितले. मी माझ्या गुरुंना तसे सांगण्यामागचे कारण विचारले नाही, मात्र आता तू विचारलेच आहेस तर सांगतो. मी साधू संन्यासी! एकटा जीव सदाशिव! तरी रोजच्या उदर भरणासाठी मला गावात जाऊन माधुकरी मागावी लागे. मी तसे करायचो. घरी आलो की थोडं धान्य वापरून उरलेलं धान्य सायंकाळ साठी ठेवून द्यायचो. धान्य साठा होऊ लागल्याने माझ्या झोपडीत उंदीर आले. धान्य संपले म्हणून ते माझी लंगोट कुरतडू लागले. त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी गावकऱ्यांनी मला एक मांजर दिले.

मांजर उंदीर खाऊन झाल्यावरही भुकेपोटी गुरकावुन बघू लागले. मांजरीला दूध लागणार म्हणून गावकऱ्यांनी एक गाय भेट दिली. म्हणाले, 'मांजरीला दूध द्या आणि तुम्हीसुद्धा गायीचे दूध पिऊन धष्ट पुष्ट व्हा!' म्हणून मी गाय पाळली. पण आता गायीलाही वेळच्या वेळी चारा पाणी देण्याची सोय करावी लागली. मग गावकरी म्हणाले, तुम्हाला एक सेविका देतो ती घराची स्वच्छता करेल आणि पाळीव प्राण्याची देखभाल करून तुम्हाला जेवूसुद्धा घालेल. सेविका तिथे राहू लागली. ती हळू हळू आमच्या संसाराची स्वप्नं पाहू लागली. पण मी बैरागी. तिला सन्मानपूर्वक निरोप देण्याआधी मी पहिले काम काही केले असेल, तर ते म्हणजे मांजर सोडून दिले. त्या पाठोपाठ असलेले व्याप संपले आणि माझी सुटका अर्थात मला भवतापातून मोक्ष मिळाला. 

तात्पर्य हेच, की आपल्या प्रगतीच्या आड येणाऱ्या गोष्टींना ओशो मांजर संबोधतात. दुःखाचे मूळ नष्ट करा अर्थात मोहाच्या गोष्टी बाजूला सारा तर आणि तरच तुमची प्रगती होऊ शकेल असे ओशो सुचवतात.