शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रकाश आंबेडकरांनी विधानसभेसाठी दहा उमेदवारांची केली घोषणा; दुसऱ्या यादीत कोणाची नावे?
2
सुप्रिया सुळेंच्या कारमधून चेहरा लपवून जाणारा 'तो' नेता अजित पवार गटाचा?; नाव समोर
3
हरयाणा निकालानंतर मविआत भूकंप?; संजय राऊत- नाना पटोले यांच्यात शाब्दिक 'वॉर'
4
काँग्रेस दिल्लीत एकटी पडणार, आप 'हात' सोडणार; विधानसभा निवडणुकीबद्दल मोठं विधान
5
Kolkata Doctor Case : फक्त २९ मिनिटं... आरोपीच्या जीन्स, शूजवर ट्रेनी डॉक्टरचं रक्त; CBI च्या आरोपपत्रात मोठा खुलासा
6
कॉलर पडकली अन् थप्पड लगावली, पोलिसांसमोरच भाजपा आमदाराला मारहाण, कारण काय?
7
PAK vs ENG : एकच नंबर! जो रुट इंग्लंडचा नवा 'हिरो', कसोटी क्रिकेटमध्ये केली ऐतिहासिक कामगिरी
8
अजित पवारांच्या मनात नेमकं काय?; भरसभेत रोहित पवारांचं कौतुक केल्यानं संभ्रम
9
Bigg Boss 18 : सलमान खान टीव्हीचा सर्वात महागडा होस्ट? फीस जाणून थक्क व्हाल!
10
हरयाणात मोठा विजय मिळवूनही भाजपला कसा बसला धक्का? विधानसभा अध्यक्षांसह १० पैकी ८ मंत्र्यांचा पराभव
11
Mumbai Best Bus Accident: "तुमच्या मुलाला बसने उडवलंय", एक फोन अन् बाप धावला, पण...; वांद्र्यातील धक्कादायक घटना!
12
नवव्या वर्षी वडिलांच छत्र हरपलं! कुस्ती, वाद, प्रसिद्धी अन् आमदार; वाचा विनेश फोगाटचा प्रवास
13
Video - 'वडापाव गर्ल'नंतर आता 'मॉडेल चहावाली' झाली फेमस; डॉली चहावाल्याला देतेय टक्कर
14
मिशन विधानसभा! सोलापूर जिल्ह्यासाठी शरद पवारांकडून ६१ नेत्यांच्या मुलाखती; दोन चेहऱ्यांनी लक्ष वेधलं
15
"या अनपेक्षित निकालाने..."; हरयाणातल्या पराभवानंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया
16
"मी तिला मारलं नसतं तर तिने मला..."; महालक्ष्मीचे ५० तुकडे करणाऱ्याच्या नोटमध्ये धक्कादायक दावा
17
शरद पवारांचा हरियाणात एकमेव उमेदवार; 'तुतारी' चिन्हावर किती मतं मिळवली?
18
'या' दिवशी गुंतवणूकीसाठी खुला होणार देशातील सर्वात मोठा IPO; प्राईस बँड किती? ग्रे मार्केट प्रीमिअम देतोय टेन्शन
19
खळबळजनक! IPS अधिकाऱ्याचं लोकेशन ट्रॅक करणाऱ्या ७ पोलिसांचं निलंबन, काय आहे प्रकार?
20
ठाकरेंचं सरकार मीच पाडलं! 'बिग बॉस'च्या घरात सदावर्तेंचा गौप्यस्फोट, म्हणाले- "सहा महिने एसटी आंदोलन..."

आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर रोज सकाळी उठल्यावर आणि झोपताना फक्त 'हे' सुविचार वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2022 3:08 PM

हे सुविचार भिंतीवर मोठ्या अक्षरात चिकटवा आणि स्वतःसकट मुलांना मोठी स्वप्नं 'बघायला' आणि 'जगायला' शिकवा!

आजच्या तरुणांचे प्रेरणास्थान, व्याख्याता संदीप महेश्वरी यांनी एका व्हिडीओमध्ये २५ सुविचार सांगितले आहेत. ते सांगतात, हे सुविचार रोज सकाळी आणि उठल्यावर व झोपताना वाचा आणि त्यावर कृती सुरू करा, तुमचे आयुष्य अंतर्बाह्य बदलून जाईल असे तो म्हणतो. सुविचार लिहिण्याची आणि वाचण्याची सवय आपल्याला बालपणापासून आहे, पण ते अमलात आणण्याची हीच योग्य वेळ आहे. सुविचाराचे पालन आपण व्यक्तिगत जीवनात न केल्याची मोठी किंमत चुकवत आहोत. निदान पुढच्या पिढीकडे योग्य आदर्श राहावा आणि त्यांनी आयुष्याचे सोने करावे असे वाटत असेल, तर पुढील सुविचार रोज त्यांच्याकडून श्लोक, पाढे म्हणवून घेता तसे म्हणवून घ्या. नक्की बदल घडेल. 

  • कामात एवढी गोपनीयता ठेवा, की जेव्हा यश मिळेल ते जगाला ओरडून सांगावे लागणार नाही, ते आपोआप सर्वांना कळेल!
  • ज्यांच्यामध्ये एकट्यांने चालण्याची क्षमता असते, एक दिवस जग त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालू लागते. 
  • यशस्वी लोक आपल्या निर्णयाने जग बदलतात, तर अपयशी लोक जगाच्या भीतीने आपले निर्णय बदलतात. 
  • ज्यांच्याकडून कोणालाच यशाची अपेक्षा नसते, असेच लोक अनपेक्षितपणे यशाच्या शिखरापर्यंत पोहोचून दाखवतात. 
  • यश आणि अपयश आपल्या मानण्यावर आहे. अपयश पत्करले तर तुम्ही हरता आणि यश मिळवायचे ठरवले तर तुम्ही जिंकता!
  • जोपर्यंत तुम्ही स्वतःचे अपयश स्वीकारत नाही तोवर कोणीही तुम्हाला अपयशी ठरवू शकत नाही. 
  • तुम्ही जर सूर्यासारखे यशाने तळपत राहू इच्छित असाल तर आधी सूर्यासारखे जळायलाही शिका. 
  • स्वप्नं साकार करण्यासाठी शहाणपण नाही तर झपाटलेपण आवश्यक आहे. 
  • कोणतेही लक्ष्य निश्चयापेक्षा मोठे नाही. कोणतीही लढाई न लढताच सोडू नका. 
  • बाहेरच्या स्पर्धेला नाही तर मनुष्य स्वतःशी असलेल्या स्पर्धेला जास्त घाबरतो. 
  • पानगळती झाल्याशिवाय जशी नवपल्लवी येत नाही, तशी अपयश आणि संघर्षाशिवाय संधी येत नाही. 
  • वेळ कितीही वाईट असू द्या, पण एक ना एक दिवस आपलीही वेळ येतेच!
  • अपयशाचा, कडेलोटाचा क्षण सावरता आला, तर तुम्हाला जगात कोणीही तोडू शकत नाही एवढे तुम्ही कणखर बनता. 
  • इच्छेने काहीच बदलत नाही, मात्र निश्चयाने सर्व काही बदलू शकता. 
  • जेवढा मार्ग दिसतोय तेवढा प्रवास सुरू ठेवा, तिथे पोहोचल्यावर पुढचाही मार्ग आपोआप दिसू लागेल. 
  • प्रत्येक छोटा बदल मोठ्या बदलाची सुरुवात असते. 
  • बदल घडवण्याची सुरुवात तेव्हाच यशस्वी होते, जेव्हा तुम्ही दुसऱ्यांना सोडून स्वतःमध्ये बदल घडवू लागता. 
  • सुविचार वाचून बदल घडत नसतात, सुविचार अनुसरले, आचरणात आणले की बदल घडू लागतात. 
  • आयुष्यात पश्चात्ताप करणे सोडून द्या आणि असे ध्येय गाठा जिथे पाहून तुम्हाला सोडून दिलेल्यांना पश्चात्ताप होईल. 
  • जो चुकला नाही तो काहीच शिकला नाही. 
  • चुका होणे वाईट नाही, पण वारंवार एकच चूक करत राहणे वाईट आहे. 
  • सुंदर दिसणे महत्त्वाचे नाही, सुंदर बनणे महत्त्वाचे आहे. 
  • मान आणि कौतुक मागून मिळवण्याच्या गोष्टी नाहीत, त्या कमवण्याच्या गोष्टी आहेत. 
  • स्वप्नं ती नाहीत जी आपण झोपेत पाहतो, स्वप्नं ती आहेत जी आपली झोप उडवतात. 
  • आयुष्य समजून घ्यायचे असेल तर आयुष्यात मागे वळून बघा आणि आयुष्य जगायला शिकायचे असेल तर पुढे बघा.