शहरं
Join us  
Trending Stories
1
Ratan Tata Passed Away: भारताच्या उद्योगविश्वातील रत्न निखळलं! 'पद्मविभूषण' रतन टाटा कालवश, देशाची मोठी हानी
2
Ratan Tata Passed Away : “मोठं स्वप्न पाहणं अन् दुसऱ्यासाठी दायित्वाची भावना...” PM मोदींनी या शब्दांत वाहिली टाटांना श्रद्धांजली
3
Ratan Tata News Live: ज्ञानी-दानी अन् स्वाभिमानी 'भारत रतन'; देश गहिवरला, मान्यवरांची रतन टाटांना श्रद्धांजली
4
भारताच्या 'रत्ना'ची कहाणी, टाटामध्ये असिस्टंट म्हणून सुरू केलेला प्रवास; नंतर कंपनीला बनवला आंतरराष्ट्रीय ब्रँड
5
Ratan Tata Death: गडकरींची टाटांना आदरांजली: देशाने संवेदनशील उद्योजक-समाजसेवक गमावल्याची व्यक्त केली भावना
6
Ratan Tata News : रतन टाटांना मिळालं अपार प्रेम, ३८०० कोटींच्या मालकानं कशी बनवली कोट्यवधी लोकांच्या मनात जागा
7
Ratan Tata: एका कुटुंबाचा उद्योग ते 'देशाचा विश्वास'! रतन टाटांनी असं उभारलं 'जगात भारी' व्यवसाय साम्राज्य
8
नाशिकच्या नेहरु वनोद्यानाने रतन टाटा यांना घातली होती भुरळ; राज ठाकरे यांना म्हणाले होते, हा तर इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट...!
9
Ratan Tata News: ७९ व्या वाढदिवशी टाटा पोहोचले होते संघ मुख्यालयात; नेमकं काय घडलं होतं?
10
महाराष्ट्राच्या फायद्यासाठी हरयाणाची पुनरावृत्ती करा; अजित पवार यांचं राज्यातील जनतेला आवाहन
11
OBC यादीत महाराष्ट्रातील काही जातींचा समावेश होणार; राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाची केंद्र सरकारला शिफारस
12
IND vs BAN : विक्रमी विजयासह टीम इंडियाच्या नावे झाली आणखी एक मालिका
13
महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये हरियाणाच्या निकालाची पुनरावृत्ती होणार; चंद्राबाबू नायडूंचे भाकित
14
Nitish Reddy अन् Rinku Singh ची दमदार फिफ्टी, टीम इंडियाच्या नावे झाले २ मोठे विक्रम
15
पराभव जिव्हारी, निवडणूक आयोगाच्या भेटीनंतर काँग्रेस नेते म्हणाले- 'EVM शी छेडछाड...'
16
लेडी सिंघम..!! काजोलच्या हॉट अन् डॅशिंग लूकवर चाहत्यांच्या खिळल्या नजरा, पाहा Photos
17
महाराष्ट्र जिंकणं काँग्रेससाठी सोपं नाही, हरयाणाच्या निकालामधून शिकावे लागतील हे धडे
18
‘वंचित’चा सातारा जिल्ह्यातील पहिला उमेदवार जाहीर; माणमध्ये इम्तियाज नदाफ 
19
"इतिहास माझ्या कारकीर्दीचं मूल्यमापन कसं करेल?"; CJI चंद्रचूड नक्की काय म्हणाले?
20
Shafali Verma चा मोठा पराक्रम; श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात गाठला मैलाचा पल्ला

तुमचे मूल दक्षिणेकडे तोंड करून जेवत असेल तर 'ही' काळजी अवश्य घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2023 2:56 PM

दक्षिण दिशा ही अनेक कारणांनी त्याज्य मानली जाते, म्हणून लहान मुलांच्या बाबतीत विशेष काळजी घेतली पाहिजे. 

>> सागर सुहास दाबके

लहान मुलांच्या बाबतीत पाहिले तर एक गोष्ट लक्षात येते की मुलं जेवायला, अभ्यासाला जेव्हा बसतात तेव्हा न ठरवता, सहजच, दक्षिणेकडे तोंड करून बसतात. जी गोष्ट सहज घडते, शक्यतो तीच घातक असते. उपयुक्त, विधायक आणि अपेक्षित गोष्टी 'सहज' घडत नाहीत, त्यासाठी प्रयत्न करावे लागतात, कष्ट घ्यावे लागतात. 

लहान मुले सहज भावाने दक्षिणेकडे तोंड करून बसतात, अभ्यास करतात, जेवतात ,पण त्याचा दुष्परिणाम देखील होतो,, पचन नीट होत नाही, लक्षात राहत नाही. उत्तम प्रकारे अन्नसेवन करून पचन व्हायला हवे असेल , वाचलेले-अभ्यासलेले लक्षात राहायला हवे असेल , चित्तवृत्ति- मनोधारणा स्थिर आणि लयबद्ध व्हायला हवी असेल तर उत्तम प्राधान्याने उत्तरेकडे आणि मध्यम प्राधान्याने पूर्व अथवा इशान्येकडे तोंड करून बसावे, जेवावे, वाचन करावे, अभ्यास करावा,, लिखाण करावे,, जप करावा, कोडे सोडवावे, इत्यादी. 

पाश्चात्य संस्कृतीत सुद्धा प्राधान्य क्रम असाच आहे, आधी उत्तर, मग पूर्व  मग पश्चिम आणि सर्वात शेवटी दक्षिण. म्हणजे , first North, second East, third West and fourth South. आद्याक्षरं बघितली तर N, E, W, S . म्हणजे NEWS . म्हणजे वार्ताहर वार्तांकन करताना आधी उत्तरेची बातमी सांगतो , मग पूर्वेची , मग पश्चिमेची आणि शेवट दक्षिणेची, असा संकेत असल्याने बातम्यांना NEWS म्हणतात. 

-ही एक अनुभूत गोष्ट आहे. रुबिक क्यूब सोडवण्याची टेक्निक ज्यांना समजली आहे त्यांच्यासाठी कदाचित दिशांचे प्राधान्य हे गौण असेल पण जो नवप्रवृत्त आहे अशा एकाने हा स्वानुभव सांगितला,, कि उत्तरेकडे तोंड करून बसलं तर पटापट puzzle सुटते आणि दक्षिणेकडे तोंड करून बसलं तर डोकंच काम करेना होतं. 

आपल्या धर्मशास्त्रात सर्व गोष्टी उदक्संस्थ अथवा प्राक्संस्थ म्हणजे दक्षिणेकडून उत्तरेकडे जाणाऱ्या अथवा पश्चिमेकडून पूर्वेकडे जाणाऱ्या असाव्यात असे सांगितले आहे. चित्राहुती घालताना सुद्धा पश्चिमेकडून पूर्वेकडे अथवा दक्षिणेकडून उत्तरेकडे घालाव्यात. वाढप करताना दक्षिणेकडून उत्तरेकडे पश्चिमेकडून पूर्वेकडे वाढत जावे. अन्न प्रोक्षण करताना देखील हाच नियम ।

सृष्टीनियमांशी ऐक्य साधून आपले जीवन अधिक सुखकर बनवण्याचा प्रयत्न आपल्या पूर्वसुरींनी केला आहे. आपल्याला काहीच कष्ट करायचे नाहीयेत, केवळ त्यांनी सांगितलेलं आचरायचं आहे. 

टॅग्स :Healthआरोग्य