शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राची इच्छा पूर्ण झाली! सूरज चव्हाण 'बिग बॉस मराठी'चा महाविजेता; अभिजीत सावंतचं स्वप्न भंगलं
2
IND vs BAN : फक्त ७१ चेंडूत खेळ खल्लास! Hardik Pandya चा स्वॅग; सिक्सर मारत फिनिश केली मॅच
3
उद्धव ठाकरे यांची मुलावर टीका; एकनाथ शिंदे भडकले, म्हणाले…
4
बारामतीच्या लेकाने बिग बॉस जिंकले! सूरज चव्हाणसाठी अजित पवारांच्या पत्नीची पोस्ट, म्हणाल्या- "पहिल्या दिवसापासून..."
5
Abhishek Sharma २०० + स्ट्राइक रेटनं कुटत होता धावा, पण 'गडबड घोटाळा' झाला (VIDEO) 
6
Bigg Boss 18 : "मी डाकूंच्या खानदानातून आहे, त्यामुळे...", गुणरत्न सदावर्तेंची 'बिग बॉस'च्या घरात एन्ट्री, सलमानलाही हसू आवरेना
7
बेरोजगारी दूर झाली तर आरक्षणाचा एकही प्रश्न उभा राहणार नाही; पृथ्वीराज चव्हाण यांचे मत
8
Bigg Boss 18: ९० च्या दशकातील हिरोईन शिल्पा शिरोडकरची एन्ट्री, सलमान म्हणतो, 'इथे कुठे आली तू...?'
9
Bigg Boss Marathi Season 5: रनर अप ठरल्यानंतर अभिजीत सावंतची पोस्ट, म्हणाला...
10
प्रयागराजमधील महाकुंभदरम्यान मांस आणि मद्यविक्रीवर बंदी, मुख्यमंत्री योगींचा मोठा निर्णय
11
"8 ऑक्टोबरनंतर बिहारमध्ये राजकीय भूकंप"! NDA संदर्भात आरजेडी नेत्याची मोठी भविष्यवाणी 
12
३ वर्षांनी कमबॅक! आधी Varun Chakravarthy च्या नावे लाजिरवाणा विक्रम; मग सोडली छाप
13
INDW vs PAKW : पाक विरुद्ध विजयी जल्लोष! हरमनप्रीत ब्रिगेडनं पुन्हा मारलं मैदान
14
भारतीय महिलांनी पाकिस्तानला दिला 'जोर का झटका'; क्रिकेटच्या देवाने केलं 'नारीशक्ती'चे कौतुक
15
रामराजेंनी घेतली शरद पवारांची भेट?; रणजीतसिंह निंबाळकरांचा खळबळजनक दावा
16
नवा फास्टर किंग Mayank Yadav ची दाबात एन्ट्री; असा पराक्रम करणारा तिसरा गोलंदाज
17
बंगालमध्ये पुन्हा बलात्कार अन् हत्या; आरोपीला 3 महिन्यांत फाशीची शिक्षा, ममतांचा अल्टिमेटम
18
9 चिमुकल्यांची शिकार करणाऱ्या लांडग्यांची दहशत संपली; शेवटचा लांडका मृतावस्थेत आढळला
19
हरियाणात कसं स्थापन होणार भाजप सरकार? नायब सैनी यांनी सांगितला पुढचा प्लॅन, म्हणाले...
20
पाकिस्तानात काहीही होऊ शकतं... आता थेट मुख्यमंत्रीच झाले बेपत्ता, नक्की प्रकरण काय?

आर्थिक, वैवाहिक अडचणींतून मार्ग काढण्यासाठी तुळशीपूजेत समाविष्ट करा 'या' गोष्टी!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 02, 2022 12:18 PM

तुळशीची आपण माता म्हणून पुजतो. या पूजेत पुढील गोष्टी समाविष्ट केल्यास सर्वार्थाने लाभ होतो. कसा ते पाहू!

हिंदू धर्मात तुळशीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. त्याचे आयुर्वेदिक फायदेही आपणास माहित आहे. शिवाय तुळशीला धार्मिकदृष्ट्या मातेसमान मानले जाते. ज्या घरात तुळशीची नित्यनेमाने पूजा होते, त्या घरातून दु:खं, दारिद्रय कायमचे निघून जाते. यासाठी तुळशी पूजेत काही गोष्टी समाविष्ट करा.

तुळशी ही भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे. तुळशीचा विवाह शाळीग्राम याच्याशी झाला होता. शाळीग्राम हे भगवान विष्णूंचे रूप होते. त्यामुळे भगवान विष्णूंना प्रसन्न करायचे असेल, तर तुळशी अर्पण केली पाहिजे. 

तुळशीचे पावित्र्य एवढे आहे, की कितीही पंचपकवान्नाची थाळी असली, तरीदेखील तुळशी दलाशिवाय तो नैवेद्य अपूर्ण समजला जातो. तुळशीच्या छोट्याशा पानाने नैवेद्याला पूर्णत्त्व येते आणि त्या भोजनात प्रसादत्त्व उतरते. तीर्थात देखील तुळशीचे पान घालून मगच ते तीर्थ प्राशन केले जाते. रोज सकाळी तुळशीची दोन पाने चावून खाल्यास सर्व प्रकारच्या रोगांना कायमचे दूर ठेवता येते, असा तुळशीचा महिमा आहे.

तुळशीमुळे वातावरण शुद्ध होते. म्हणून तुळशीच्या आसपासच्या परिसरात देवीदेवतांचा वास असतो असे मानतात. कारण ते वातावरण देवीदेवतांनाही आकर्षित करते. म्हणून तो परिसर कायम स्वच्छ आणि पवित्र ठेवावा. 

तुळशी जेवढी पवित्र तेवढीच तिची डहाळी, फांद्या, मंजिरी आणि मातीदेखील पवित्र मानली जाते. कारण त्या मातीत तुळशीची मूळं रुजलेली असतात. म्हणून कोणत्याही शुभ कार्याच्या वेळी तुळशीच्या कुंडीतील माती कपाळी लावावी.

तुळशीच्या रोपात अकारण वाढलेले तण उपटून फेकून न देता, ते गवत एका कागदाच्या पुडीत बांधून आपल्या तिजोरीत ठेवावेत. तुळशीच्या सान्निध्यात आल्याने त्या अकारण वाढलेल्या गवतालाही लक्ष्मीचा वरदहस्त प्राप्त होतो आणि ते गवत आपल्या मिळकतीबरोबर ठेवल्याने धनवृद्धी होते.

तुळशीजवळ रोज सायंकाळी दिवा लावावा आणि दिव्याच्या खाली, मंगल कलशाखाली ठेवतो, तशीच धान्याची छोटीशी राशी रचावी. त्यावर दिवा ठेवावा. ते दृष्य पाहून माता लक्ष्मी प्रसन्न होते. दिव्याच्या स्वच्छ प्रकाशात ते धान्य छोट्या जीव जंतूंना मिळते आणि सत्कर्म घडते. 

तुळशीची मंजिरी कृष्णाला प्रिय असते. म्हणून रोजच्या देवपूजेत तुळशी दलाबरोबर मंजिरी असल्यास कृष्णाचा आशीर्वाद प्राप्त होतो. तुळशी ही संजीवनी आहे. तिचे पावित्र्य कायम राखावे. तुळशी माळा धारण करणाऱ्यांनी मद्यपान तसेच मांसाहार यांचे सेवन करू नये. हे नियम पाळले असता, तुळशी मातेचा, लक्ष्मी मातेचा आणि भगवान विष्णूंचा वरदहस्त लाभून दु:खं-दैन्य दूर होते. तसेच वैवाहिक अडचणीदेखील दूर होतात.