शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मनसेची सातवी यादी जाहीर; इंदापूर, पारनेरमध्ये उमेदवार दिले
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : माढ्यात शरद पवारांचा मोठा ट्विस्ट; राष्ट्रवादी काँग्रेसकडून अभिजीत पाटलांना दिला एबी फॉर्म
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : कोल्हापूरात काँग्रेसने उमेदवार बदलला,उत्तर विधानसभेत मधुरिमाराजे छत्रपतींना उमेदवारी; लाटकर समर्थकांत नाराजी
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : काँग्रेसची पाचवी यादी जाहीर; कोल्हापूर उत्तरमध्ये मोठा बदल,अकोला, कुलाबामध्ये उमेदवार जाहीर
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिंदे गटाची तिसरी यादी जाहीर, कन्नडमधून संजना जाधव, बार्शीमध्ये राजेंद्र राऊत यांना उमेदवारी जाहीर
6
भाजपानं 'या' ४ जागा मित्रपक्षांना सोडल्या; महादेव जानकर पुन्हा महायुतीत? 
7
'व्होट जिहादमुळे लोकसभेला नुकसान, पण आता विधानसभेला नाही', देवेंद्र फडणवीस स्पष्ट बोलले
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "आईनं असं काही भाष्य केलेलं नाही, ते असं का बोलले..."; अजितदादांना श्रीनिवास पवारांचं प्रत्युत्तर
9
वरवंड परिसरामध्ये दोन एसटी बसचा अपघात भीषण; दोन जण ठार : तीनजण गंभीर जखमी
10
"माझ्या प्रामाणिकपणाचं असं फळ मिळालं..?"; आमदार श्रीनिवास वनगा धाय मोकलून रडले
11
उमेदवाराच्या माघारीने उद्धवसेनेवर नामुष्की; 'औरंगाबाद मध्य'साठी तत्काळ दुसरा उमेदवार घोषित
12
Shrinivas Vanga News उमेदवारी न मिळाल्याने शिंदे गटाचा आमदार आत्महत्या करण्याच्या विचारात; कुटुंबाचा दावा
13
Zeeshan Siddique : बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर सलमानला लागली नाही झोप, झिशान म्हणतात, "रोज रात्री मला फोन..."
14
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी वंचितचा उमेदवार ठरला; पुन्हा त्याच चेहऱ्याला संधी
15
आई सांगत होती, माझ्या दादाविरोधात फॉर्म भरू नका, पण तरीही...; बारामतीत अजितदादांना अश्रू अनावर!
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सांगलीत महायुतीला धक्का! भाजपा उमेदवाराविरोधात भरला अपक्ष अर्ज,माघार घेणार नसल्याचेही केले जाहीर
17
बोरिवलीच्या उमेदवारीवरून भाजपात नाराजी; माजी खासदार गोपाळ शेट्टी स्पष्टच बोलले
18
Priyanka Gandhi : "जेव्हा मदर तेरेसा माझ्या घरी आल्या..."; प्रियंका गांधींनी सांगितला 'तो' हृदयस्पर्शी क्षण
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून चौथी यादी जाहीर; काटोल विधानसभेतून सलील देशमुखांना उमेदवारी
20
शरद पवार गटात बंडखोरी; धनंजय मुंडेंविरोधात 'हा' नेता अपक्ष निवडणूक लढवणार

पूजेच्या वेळी शंखनाद करणे लाभदायकच; मात्र शंखनादाच्या वेळी टाळा 'या' चुका!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2022 3:32 PM

भगवान विष्णूला शंखोदक अर्पण करणे शुभ मानले जाते. परंतु भगवान शिव आणि सूर्यदेवाला कधीही शंखोदक अर्पण करू नाहीत. जाणून घ्या अधिक माहिती ...

सनातन धर्मात शंखाला खूप महत्त्व आहे. नियमितपणे शंखनाद केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होण्यासोबतच घरातील संकटांपासून मुक्ती मिळते. भगवंताचे अधिष्ठान राहते. म्हणून आपण पूजेच्या वेळी शंखनाद करतो तसेच शंखोदक घेतो आणि देवघरात शंख ठेवून त्याची पूजाही करतो. मात्र शंखनादाबरोबर शंखाशी संबंधित काही चुकीच्या गोष्टी टाळायला हव्यात. त्या गोष्टींबद्दल सविस्तर जाणून घेऊ. 

शंखाचे महत्त्व

शास्त्रानुसार चौदा रत्नांपैकी एक मानल्या जाणाऱ्या शंखाची उत्पत्ती समुद्रमंथनाच्या वेळी झाली. म्हणूनच शंख देवी लक्ष्मीचा भाऊ मानला जातो. म्हणूनच भगवान विष्णूशीदेखील त्याचा संबंध आहे. 

धार्मिक मान्यतेनुसार, शंख हे भगवान विष्णूच्या शस्त्रांपैकी एक मानले जाते. भगवान विष्णूंच्या हातात चक्र, गदा, कमळाचे फूल आणि शंख आहे. म्हणूनच असे म्हटले जाते की ज्या घरात शंख वाजविला ​​जातो, त्याच्या ध्यानाने भगवान विष्णू आकर्षित होतात आणि घरात सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होते.

शंख वाजवण्यापूर्वी हे नियम जाणून घ्या

>>देवघरात शंख ठेवल्यास एक नाही तर दोन शंख आणावेत. एक शंख वाजवण्यासाठी आणि दुसरा अभिषेकासाठी!

>>जो शंख तुम्ही शंखनादासाठी घेता, तो शंख देवघरात पूजेसाठी वापरू नये, कारण तो शंख ओठाचा स्पर्श झाल्याने उष्टा होतो. 

>>त्याचबरोबर पूजेसाठी वापरत असलेला शंख शंखनादासाठीही वापरू नका. यासाठीच २ स्वतंत्र शंख आणावेत असे सुरुवातीला म्हटले आहे. 

>>देवघरात एका वेळेस एकच शंख पूजेसाठी ठेवावा. दुसरा शंख देवघरातल्या सामानाजवळ किंवा कलशाजवळ ठेवावा. 

>>शंख नाद करण्याचा शंख पांढर्‍या कपड्यात गुंडाळून देवघराजवळ ठेवावा. म्हणजे त्याचे पावित्र्य राखले जाते आणि एकावेळी एकच शंख पुजला जातो. 

>>भगवान विष्णूला शंखोदक अर्पण करणे शुभ मानले जाते. परंतु भगवान शिव आणि सूर्यदेवाला कधीही शंखोदक अर्पण करू नाहीत 

>>शंख फुंकण्यापूर्वी एकदा गंगेच्या पाण्याने धुवावे. जर गंगाजल नसेल तर तुम्ही साधे पाणी देखील वापरू शकता.

>>पूजेसाठी नेहमी शंखात पाणी ठेवावे. रोज पूजा केल्यानंतर हे पाणी घरभर शिंपडावे. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा वाढते आणि सुख-शांती राहते.

>>तुमचा शंख कधीच कोणाला वापरायला देऊ नका किंवा इतरांचा तुम्ही वापरू नका. 

>>शंखनादाची वेळ सकाळच्या पूजेसाठी उत्तम असते. याव्यतिरिक्त सायंकाळी, रात्री शंखनाद करू नये.