शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआकडून लाडकी बहीण योजनेच्या कालावधीबाबत शंका; देवेंद्र फडणवीस ठामपणे म्हणाले...
2
भारतविरोधी षड्यंत्रात काँग्रेस सामील; समाजाला कमकुवत करण्याचा प्रयत्न, PM मोदींचा घणाघात
3
भक्तांसाठी आनंदाची बातमी: निमगाव खंडोबा क्षेत्र विकासासाठी २४ एकर जमीन; शासन निर्णय जारी 
4
"सकाळी नऊ वाजताचा भोंगा, रात्रीच तयारी करून बसला होता"; फडणवीसांनी राऊतांना डिवचलं
5
धक्कादायक! प्रेमाच्या त्रिकोणातून तरुणीने केली तरुणीची हत्या
6
"खोट्याच्या कडू घोटावर विकासाची गॅरंटी भारी पडली’’, हरयाणातील विजयानंतर मोदींचा टोला 
7
वडील-काकाची दहशतवाद्यांनी केलेली हत्या; मुस्लिमबहुल मतदारसंघातून शगुन परिहार विजयी
8
"हरयाणात भाजपा EVMमध्ये छेडछाड करून जिंकला, हा निकाल मान्य नाही’’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
9
हरयाणात झाली रोमांचक लढत, अवघ्या ३२ मतांनी फैसला, अखेरीस जिंकलं कोण? पाहा 
10
"...यामुळेच हा ऐतिहासिक विजय झाला"; हरयाणाच्या निकालावर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया
11
Haryana Assembly Election Results 2024 : दिल्लीच्या जवळपास कमळाची कमाल, आम आदमी पार्टी बेहाल; डिपॉझिटही वाचलं नाही!
12
J&K मध्ये फुटीरतावादाचा सुपडा साफ, एआयपी आणि जमात-ए-इस्लामीला मतदारांनी नाकारले
13
हरयाणा निवडणुकीचे 'मॅन ऑफ मॅच' ठरलेल्या CM नायबसिंग सैनी यांची संपत्ती किती?
14
Ola नंतर Ather नं इलेक्ट्रिक स्कूटरच्या किंमती केल्या कमी, आता स्वस्तात खरेदी करण्याची संधी!
15
जुन्नरमध्ये आयात उमेदवाराच्या हाती तुतारी दिल्यास बंड अटळ?; मविआतील नाराज निष्ठावंतांच्या गोटात हालचालींना वेग
16
गेल्या महिन्यात कोणत्या कंपनीनं सर्वाधिक विकल्या Electric Scooters?
17
"महाराष्ट्रातील जनताही अशा फेक..."; हरयाणातील निकालानंतर CM शिंदेंचा MVA वर 'वार'
18
"आपण तर खरोखरच मोठी 'पनौती' निघालात, हुड्डांनाही..."; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा राहुल गांधींवर निशाणा
19
बुलेट ट्रेन जितकी खास, तितकीच स्टेशनही... वीज बचत अन् प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य!
20
नायब सिंह सैनींनी मारली बाजी; विजयादशमीला घेऊ शकतात मुख्यमंत्रीपदाची शपथ?

मनाचा गोंधळ दूर करण्यासाठी आतला आवाज ऐका म्हणतात, पण ऐकायचा कसा? सांगताहेत संदीप माहेश्वरी!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 08, 2022 2:50 PM

एखादा निर्णय घेताना घरातले ज्येष्ठ सांगतात, तुझा आतला आवाज ऐक; पण आतला आवाज ऐकण्यासाठी लागते एक साधना, त्याबद्दल जाणून घेऊ. 

आपल्या अवती भोवती एवढे आवाज असतात की बाजूला बसलेला माणूस काय बोलतो हे ऐकू येत नाही तर आतला आवाज कुठून ऐकू येणार? परंतु याच गदारोळामुळे आपण सतत गोंधळलेल्या अवस्थेत असतो. प्रश्नांची उत्तरे बाहेर शोधत राहतो. पण मोटिव्हेशनल स्पीकर संदीप माहेश्वरी सांगतो, तुम्हाला हवी असलेल्या प्रश्नांची अचूक उत्तरे तुमच्याच जवळ आहेत, पण ती ऐकण्यासाठी तुमचे कान सावध नाहीत. त्यासाठी सात दिवस दिलेला सराव करा, तुम्हाला तुमचा शोध लागेल. 

आपल्या सगळ्यांना वाईट सवय किंवा खोड असते, ती म्हणजे रिकामे वाटू लागले की वेळ काढण्यासाठी मोबाईल हातात घ्या नाहीतर टीव्ही बघणे. अशा वेळी आपण बाहेर जाणे, निसर्गात फिरणे, लोकांशी बोलणे या गोष्टी करायच्या सोडून आपल्याच चौकटीत राहणे पसंत करतो. त्यामुळे एकलकोंडेपणा जास्त वाढतो. त्याऐवजी जेव्हा काहीच सुचत नाही तेव्हा शांत बसायला शिका. आपल्या डोक्यात काय सुरू आहे ते तटस्थपणे बघायला शिका. काहीही न करता शांत बसण्याची सवय नसल्याने सुरुवातीला ते अवघड वाटेल, शांत बसण्याचा कंटाळाही येईल, मात्र ते करत राहा. सरावाने तो कंटाळा निघून जाईल. 

संदीप हे स्वानुभवाच्या आधारावर सांगताना म्हणतो, 'मी वर्षातून दोनदा तरी बाहेरगावी एकटा जातो व जाताना मोबाईल नेणे टाळतो. त्यामुळे मला माझ्या सान्निध्यात पूर्ण वेळ मिळतो. पूर्णवेळ स्वतःच्या सोबत राहणे कंटाळवाणे वाटले तरी तो अनुभव नावीन्य पूर्ण असतो. एका लिमिटनंतर तुमच्या डोक्यातले विषय संपून जातात आणि मनाच्या खोलवर रुतलेले विषय मान वर काढतात. त्यावर मनातल्या मनातही व्यक्त होणे टाळा. त्यामुळे तुमचे मन तुमच्याशी बोलू लागेल. तुम्हाला नेमके काय अपेक्षित आहे, तुमच्या मर्यादा किती व कोणत्या यांची जाणीव करून देईल. तुमची उत्तरे तुम्हाला अवश्य सापडतील. 

या सरावासाठी सलग तीन दिवस, दहा दिवस मोबाईल किंवा अन्य संपर्क साधनांपासून दूर राहिले पाहिजे. तसे केले, तरच तुम्हाला स्वतःची नव्याने ओळख होईल. बाहेरचे आवाज शांत झाले की आतला आवाज ऐकू येईल आणि तो कधीच चुकीचा मार्ग दाखवणार नाही. यासाठी खूप अवघड गोष्ट म्हणजे एखाद्या मुद्द्याशी थांबणे, चिंतन करणे, स्वतःला वेळ देणे. म्हणतात ना, 'तुज आहे तुजपाशी परी तू जागा चुकलासी'

ध्यानधारणा ही त्याची प्राथमिक पातळी आहे. रोज स्वतःसाठी दहा मिनिटे काढा. विचार मनात आले तरी येऊ द्या. शांत राहिल्याने तुमचा मेंदू अधिक कार्यक्षम होईल, जशी आपली संगणक व्यवस्था असते. तिच्यावर बटनं दाबून मारा केला तर ती आणखी कोलमंडते, याउलट वेळ दिला तर यंत्रणा शांत होते आणि आपोआप कार्यन्वित होते. 

तीच शांतता मेंदूलाही आवश्यक असते. त्याला शांत होऊ द्या, तुम्हाला तुमचा आतला आवाज नक्की सापडेल!