शहरं
Join us  
Trending Stories
1
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
2
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
3
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
4
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
5
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण
6
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
7
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?
8
जिंकलंस मित्रा! वकील बनून लढला स्वत:च्या किडनॅपिंगची केस, १७ वर्षांनंतर ८ गुन्हेगारांना शिक्षा
9
ENG vs AUS : WHAT A BALL! स्टीव्ह स्मिथ 'क्लिन बोल्ड', ऑस्ट्रेलियन दिग्गजाचाही विश्वास बसेना
10
"म्यानमारमधून ९०० कुकी अतिरेकी मणिपूरमध्ये घुसले", सुरक्षा सल्लागारांनी दिला दुजोरा, चिंता वाढली
11
58 कर्मचाऱ्यांशी शारीरिक संबंध अन्...! कोण आहे चीनची ही 'सुंदर गव्हर्नर'? ठोठावण्यात आली 13 वर्षांची शिक्षा
12
“ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र मविआत नाही”; संजय राऊत स्पष्टच बोलले
13
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
14
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
15
भारतात WANTED असलेला फरार इस्लामिक धर्मगुरू झाकिर नाईक पाकिस्तानात 'पाहुणा'
16
IND vs BAN, 1st Test Day 3 Stumps : वेळेआधी थांबला खेळ; ढगाळ वातावरणातही चित्र एकदम स्पष्ट
17
बाबो! इन्स्टावर सूत जुळलं, एकमेकांवर प्रेम जडलं; पंक्चरवाल्यासाठी नवऱ्याला सोडलं अन्...
18
लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा लावला; मुलीने रंगेहाथ पकडला, विद्यार्थ्याला अटक, अनेक व्हिडीओ सापडले
19
ऐश्वर्या-करीश्मादेखील वाचवू शकले नाहीत सुपरस्टारच्या मुलाचं करिअर, आता इंडस्ट्रीतून आहे गायब
20
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर

बालपणापासून चांगली संगत सोबत लाभली तर आपल्या आयुष्याचे सोने कसे होते, जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2022 12:50 PM

'ढवळ्याशेजारी बांधला पोवळा, वाण नाही पण गुण लागला' अशी म्हण आहे, त्यामागचा मतितार्थही जाणून घ्या!

'ढवळ्याशेजारी बांधला पोवळा, वाण नाही पण गुण लागला' अशी म्हण आहे, त्यामागचा मतितार्थही जाणून घ्या!

बालपणी झालेले संस्कार आपण सहसा विसरत नाही. रोजच्या कामाच्या गडबडीत उजळणी होत नाही ही बाब वेगळी, परंतु काही प्रसंगामुळे श्लोक, परवचा, सुभाषिते, हरिपाठ यांचा आठव होतो. कारण बापूनी या गोष्टी आपल्या बुद्धीवरच नाही तर मनावरही कोरल्या जातात. तशीच एक प्रार्थना जी आपण शाळेत आणि घरी आजीकडून शिकलो, ती म्हणजे -

सुसंगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडोकलंक मतीचा झडो विषय सर्वथा नावडोसदन्घ्री कमळी दडो मुरडीता हटाने अडोवियोग घडता रडो मन भव्त्चरीत्री जडो

ही मोरोपंतांची केकावली आहे. त्याची आणखीही कडवी आहेत. काही जणांना ती पाठ असतात, तर काही जणांना पहिला श्लोक स्मरणात राहतो. श्लोकाच्या पहिल्या ओळीत केवढी महत्त्वपूर्ण सूचना केली आहे. सुसंगती सदा घडो... आजच्या काळात चांगली सोबत मिळणे अतिशय कठीण! खुषमस्करी करणारे लोक  अवती भोवती असून उपयोगाचे नाही. चांगल्या बाबतीत कौतुक करणारे आणि चुकल्यास कान धरणारी ज्येष्ठ, श्रेष्ठ मंडळी आपल्या बरोबर असतील तर आणि तरच विकास होऊ शकेल. या श्लोकाच्या पहिल्या ओळीइतकाच पूर्ण श्लोकाचा आशय सुद्धा महत्त्वाचा. तो लक्षात ठेवला तर कितीही अडचणी आल्या तरी आपले पाऊल वाकडे पडणार नाही, याची गॅरेंटी! 

श्लोकाचा अर्थ आहे, मला सज्जनांचा सहवास घडो, अनुभवी लोकांचे शब्द कानी पडो, सज्जनांच्या मदतीने बुद्धी निष्कलंक होवो. प्रपंचाची ओढ कमी होऊन संत सहवास घडो. त्यांनी दूर लोटले, तरी हट्टाने त्यांचेच सान्निध्य मिळो. त्यासाठी दुःखं कष्ट झाले तरी चालतील, त्याचा शेवट ईशसेवेत रुजू होण्यातच असेल. 

मराठी साहित्य एवढे समृद्ध आहे ना, की इथे सारस्वतांचा सुकाळ आहे. माउलींच्या ओव्या, तुकोबांची अभंगवाणी, समर्थांचे समास, कबीरांचे दोहे, मोरोपंतांच्या केकावल्या, आर्या आणि बरेच काही. हा समृद्ध वारसा आपल्याला मिळाला आणि आपल्या पूर्वजांनी तो जतन केला. आपल्याला तो वृद्धिंन्गत करायचा आहे. केवळ पोपटपंची करून नाही, तर त्याचे मर्म जीवनात उतरवून!