शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI Repo Rate : ईएमआय कमी होण्यासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार, यावेळीही रेपो दर 'जैसे थे'
2
Ajit Pawar On Sharad Pawar : "मी जी राजकीय भूमिका घेतली ती साहेबांना सांगूनच, आधी हो म्हणाले नंतर..."; अजित पवारांचा गौप्यस्फोट
3
Tejashwi Yadav : "भाजपा आरजेडीला घाबरते, आमचं चारित्र्य खराब करायचंय; ते सत्तेत येऊ शकत नाहीत म्हणून..."
4
Haryana Assembly Election Result 2024 : राम रहिम याचा भाजपासह काँग्रेसलाही फायदा; हरयाणा निकालातील आकडेवारीतून माहिती
5
'भाऊ' Bigg Boss च्या पुढच्या पर्वात दिसणार का? रितेश देशमुख म्हणाला, 'हा निर्णय तर...'
6
धक्कादायक! हिंदू नाव वापरुन २२ पाकिस्तानी राहायचे, बनावट कागदपत्रे बनवून देणाराही अटकेत
7
दबा धरुन बसलेल्या बिबट्याचा महिलेवर हल्ला; घरापासून १०० फूट ओढत नेलं अन्...
8
PhysicsWallahचा IPO येणार! कंपनीनं सुरू केलं काम; ४ इन्व्हेस्टमेंट बँकर्सचीही केली नियुक्ती
9
"हा देखावा कशासाठी?"; सामूहिक अत्याचाराच्या जागेची पाहणी करणाऱ्या सुप्रिया सुळेंवर टीकास्त्र
10
बहुमत असले तरी अब्दुल्लांची नॅशनल कॉन्फरन्स भाजपसोबत जाणार? जम्मू काश्मीरमध्ये लावले जातायत अंदाज
11
ऑस्ट्रेलियानं लावली न्यूझीलंडची वाट; आता सेमीसाठी टीम इंडिया कशी ठरेल पात्र?
12
मंदिरातून परतणाऱ्या मुलीची काढली छेड; भावाने विरोध करताच बेदम मारहाण, झाला मृत्यू
13
कोलकाता निर्भया प्रकरण : आरजी कर रुग्णालयातील ५० वरिष्ठ डॉक्टरांनी दिला राजीनामा
14
Savitri Jindal Haryana Election Networth : हिसारमधून निवडणूक जिंकणाऱ्या सावित्री जिंदाल यांची नेटवर्थ माहितीये? भल्याभल्यांना टाकलंय मागे
15
Breaking: खळबळजनक! दहशतवाद्यांकडून दोन जवानांचे अपहरण; पैकी एक तावडीतून सुटला
16
साईबाबा संस्थानला गुप्त दानावर कर द्यावा लागणार? हायकोर्टाने महत्वाचा निर्णय घेतला
17
राम रहीमला ६ वेळा पॅरोल देणाऱ्या माजी पोलीस अधिकाऱ्याचा विजय; भाजपमध्ये केला होता प्रवेश
18
"जिंकलेल्या डावाचे पराभवात रूपांतर करायचे काँग्रेसकडून शिकावे"; हरयाणा निकालावरुन ठाकरे गटाचा निशाणा
19
हरयाणात BJP, जम्मू-काश्मिरात इंडिया; महाराष्ट्रात काय होणार? महायुती-मविआत कोणाचा दबाव वाढेल?
20
आजचे राशीभविष्य ९ ऑक्टोबर २०२४; प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवाल

वर्तमानात जगायला शिका, तर आणि तरच आनंदी राहू शकाल!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 08, 2021 12:58 PM

आपल्या हातात केवळ वर्तमान आहे, याचे भान ठेवले तरच आयुष्याचा रसास्वाद आपण घेऊ शकू.

भविष्याच्या काळजीने आणि भूतकाळाच्या आठवणीने आपण वर्तमानात जगणे सोडून देतो आणि जे मिळाले आहे त्यात समाधान न मानता, जे मिळाले नाही, त्याबद्दल दु:ख करत बसतो. अशा स्वभावाने आपण आनंदी कधीच राहू शकणार नाही. यासाठी वेळीच बदल करायला हवा. तो कसा? ते या गोष्टीतून शिकुया...

एक बाई तरुण वयात विधवा होते. पतीच्या मृत्यूपश्चात पदरी असलेल्या दोन मुलींचे संगोपन करण्यासाठी अपार कष्ट घेते. मुलींना मोठे करते. त्यांच्या पसंतीच्या मुलाशी लग्न लावून देते. त्यांचा सुखाचा संसार बघण्यासाठी कधी एका लेकीकडे तर कधी दुसरीकडे आलटून पालटून राहते.

मुलींच्या घरची परिस्थितीही बेताची असते. म्हणून त्यादेखील व्यवसाय करुन संसाराला हातभार लावत असतात. एका मुलीचा व्यवसाय असतो छत्रीचा, तर दुसरीचा वाळवणाचे पदार्थ करण्याचा! त्यांचे घर छान चालावे एवढीच तिची इच्छा होती. परंतु बदलत्या ऋतूमानाचा परिणाम त्या दोघींच्या व्यवसायावर पडत होता. म्हणून त्यांची आई दरदिवशी देवाला दोष देत असे. पाऊस पडला तर छत्री विकणाऱ्या मुलीच्या व्यवसायाला फायदा होईल आणि कडक ऊन पडले, तर वाळवणे करणाऱ्या मुलीच्या व्यवसायाला फायदा होईल. तिची ईच्छा पूर्ण करण्यासाठी देव कधी ऊन तर कधी पाऊस पाडत असे. तरी तिचे रडगाणे सुरूच असे.

एक दिवस गावातून जाणाऱ्या एका साधुबाबांनी तिला रडण्याचे कारण विचारले, तर म्हणाली, `देवाने माझ्या वाट्याला कष्ट दिले, मी केले परंतु माझ्या मुलींना तरी सुख द्यायला हवे होते. पण तो मात्र त्यांच्या परिश्रमाच्या आड येत आहे. ऊन आणि पाऊस यांचा समतोल त्याला राखताच येत नाही, मग माझ्या मुलींनी व्यवसाय करायचा तरी कसा?'

यावर साधूबाबा म्हणाले, `ही मनुष्याची असमाधानीवृत्ती आहे. देवदयेने तुझ्या मुलींचा छान संसार सुरू आहे, व्यवसायही ठीक ठाक सुरू आहे, पण तुझ्या अवास्तव मागण्या देव कसा पूर्ण करणार? त्याला एकाच वेळी अनेकांचे पालन पोषण करायचे आहे. तरीदेखील तो आपली काळजी घेत आहे याचे समाधान मानायचे सोडून आपण रडत बसलो, तर कधीच सुखी होऊ शकणार नाही. म्हणून काळजी करणे सोड. ज्याप्रमाणे तू कष्ट करून तुझ्या मुलींच्या आयुष्याचे सोने केलेस, तसे त्याही त्यांचे भविष्य घडवतील. म्हणून काळजी करणे सोड आणि वर्तमानात जगायला शिक, तरच आयुष्याचा आनंद घेऊ शकशील.