शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar On Sharad Pawar : "मी जी राजकीय भूमिका घेतली ती साहेबांना सांगूनच, आधी हो म्हणाले नंतर..."; अजित पवारांचा गौप्यस्फोट
2
Breaking: खळबळजनक! दहशतवाद्यांकडून दोन जवानांचे अपहरण; पैकी एक तावडीतून सुटला
3
साईबाबा संस्थानला गुप्त दानावर कर द्यावा लागणार? हायकोर्टाने महत्वाचा निर्णय घेतला
4
राम रहीमला ६ वेळा पॅरोल देणाऱ्या माजी पोलीस अधिकाऱ्याचा विजय; भाजपमध्ये केला होता प्रवेश
5
"जिंकलेल्या डावाचे पराभवात रूपांतर करायचे काँग्रेसकडून शिकावे"; हरयाणा निकालावरुन ठाकरे गटाचा निशाणा
6
हरयाणात BJP, जम्मू-काश्मिरात इंडिया; महाराष्ट्रात काय होणार? महायुती-मविआत कोणाचा दबाव वाढेल?
7
आजचे राशीभविष्य ९ ऑक्टोबर २०२४; प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवाल
8
हरयाणात घडले तेच महाराष्ट्रातही घडणार; भाजपच्या जल्लोष सभेत देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास
9
अखेर ठरले... अजित पवार बारामतीतूनच लढणार; प्रफुल्ल पटेल यांनी जाहीर केली उमेदवारी
10
जम्मू-काश्मीरमध्ये 'इंडिया', ओमर अब्दुल्ला होणार मुख्यमंत्री; आपनेही खाते उघडले
11
हरयाणात भाजपची हॅट्ट्रिक; काँग्रेसच्या पाच जागा वाढल्या, पण बहुमताची हुलकावणी
12
मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करा; उद्धव ठाकरे यांचे काँग्रेस, शरद पवार गटाला आवाहन
13
एक्झिट पोल पडले तोंडावर; भाजपच्या जागांबाबत बहुतांश अंदाज फसले, निकालांबाबत होती उत्सुकता
14
ओमर हेच मुख्यमंत्री, वाटेकरी कुणीच नाही; फारूख अब्दुल्लांनी केले जाहीर, काँग्रेसचे ६ विजयी
15
घोळ सरेना, नाव ठरेना, अध्यक्ष मिळेना! शर्यतीत अनेक दिग्गज; पण, शिक्कामोर्तब कधी?
16
०.८५ टक्के कमी मते अन् गमावल्या ११ जागा; भाजप-काँग्रेसच्या मतांची टक्केवारी जवळपास सारखीच
17
जम्मू-काश्मीर विधानसभा निकालात ‘इंडिया’ने मारली बाजी, तरी भाजप ठरला बाजीगर
18
हरयाणामध्ये भाजप जिंकण्यामागचे गणित काय? काँग्रेसच्या हातात असलेला विजय हिसकावला
19
मागासवर्गीय मतदारांनी काँग्रेसकडे फिरविली पाठ; हरयाणात जाट-बिगर जाट मतांचे ध्रुवीकरण
20
काँग्रेसच्या मनोबलावर परिणाम होणार नाही; हरयाणा निकालावर रमेश चेन्नीथलांचे मत

वैशाख अमावस्येला 'पांडवांची अवस' असे का म्हणतात आणि ती कशी साजरी केली जाते, ते जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 08, 2021 9:56 AM

हा सण अनेक सांस्कृतिक भावनांनी जोडलेला असल्यामुळे या सणाला 'भावुका' अमावस्या असेही म्हटले जाते. 

आपल्या येथे प्रत्येक सण, उत्सव यामागे विशेष कथा, परंपरा आहे. आधीच्या पिढीकडून पुढच्या पिढीकडे माहितीचे हस्तांतरण होते. परंतु, जेव्हा काही गोष्टींचा आगापिछा आपल्याला माहीत नसतो, तेव्हा आपण आधार घेतो, ग्रंथांचा. वैशाख अमावास्येबाबतीतही अधिक जाणून घेण्यासाठी ज्योतिर्भास्कर जयंत साळगावर लिखित 'धर्मबोध' या ग्रंथाचा आधार घेतला आहे. त्यात ते लिहितात-

वनवास संपवून पांडव परत आले ते याच दिवशी, असे मानून या दिवशी काही प्रतीकात्मक विधी केला जातो. परतत असताना द्रौपदीसह पाचही पांडव गावाच्या वेशीजवळच्या एका डेरेदार निंबाच्या झाडाखाली विसाव्यासाठी थांबले. म्हणून विशेषकरून मराठवाड्यामध्ये या दिवशी सकाळीच प्रत्येक जण आपल्या घराजवळ अंगणातील एक कोपरा सजवतात. आसपास कडुलिंबाचे झाड असेल तर त्याच्याखाली प्रथम कोपऱ्याची जागा झाडून पुसून स्वच्छ करतात. तिथे कडुलिंबाच्या पानाची सुंदर मऊ बैठक तयार करतात. त्याच्यावर पाच पांडव आणि द्रौपदी म्हणून चुना लावलेले सहा छोटे दगड ठेवतात. नंतर द्रौपदीला हळद कुंकू, फुले वाहून तिच्यासह सर्वांची पूजा करून त्यांना नैवेद्य अर्पण करतात. 

महाराष्ट्रातील विशेषतः मराठवाड्यातील हा एक विशेष सण आहे. परंपरेने तो कुलाचार म्हणून अतिशय जिव्हाळ्याने साजरा केला जातो. घरातील वस्तू आणि थोडासा वेळ एवढ्यातच जर एवढी सुंदर परंपरा अबाधित राहिली असेल, तर ती नक्कीच कौतुकास्पद म्हणावी लागेल. पूर्वी महाराष्ट्रात सर्वदूर दिवाळीच्या निमित्ताने मुलेबाळे एकत्रितपणे घराच्या दारात मातीचे किल्ले बनवत असत. त्याच्याशी साम्य असलेला हा सण! एका हृद्य आठवणीला उजाळा देणारी ही परंपरा आपणही स्वीकारण्यास हरकत नाही. त्यामुळे संस्कृतीची मुळे अधिक बळकट होतील. पुढच्या पिढीला आपल्या संस्कृतीबद्दल कुतूहल वाटेल. ती पिढीदेखील इतिहास जाणून घेण्यास उत्सुक होईल. एकूणच हा सण अनेक सांस्कृतिक भावनांनी जोडलेला असल्यामुळे या सणाला 'भावुका' अमावस्या असेही म्हटले जाते.