शहरं
Join us  
Trending Stories
1
वाल्मीक कराडचा एन्काऊंटर करण्याची ऑफर; निलंबित पोलीस अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा
2
नववर्षातील पहिली संकष्ट चतुर्थी: ९ राशींवर पंचग्रही योगाचा लाभ; सुवर्ण संधी, बाप्पा शुभ करेल!
3
IPL 2025: विराट कोहलीची Live सामन्यात तब्येत बिघडली, हृदयाचे ठोके अचानक वाढेल अन् मग पुढे...
4
"काँग्रेसनं मुस्लीम अध्यक्ष का बनवला नाही? बाबासाहेब जिवंत होते तोवर..."; पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
5
देशातील एकमेव ट्रेन.. नाश्त्यापासून जेवणापर्यंत सर्व काही मोफत; महाराष्ट्रातून आहे मार्ग
6
हिरे व्यापारी ते फरार, कोट्यवधींची संपत्ती जप्त; आता किती आहे PNB घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोक्सीची संपत्ती
7
मध अत्यंत गुणकारी, पण चुकीच्या पद्धतीने खातात ९०% लोक; शरीरासाठी ठरतंय विष
8
वक्फ बिल योग्य असते तर मुस्लिम आज पंक्चर काढत बसला नसता; मोदींचे पहिल्यांदाच वक्फ कायद्यावर वक्तव्य...
9
शेतकऱ्याचा मुलगा बनला ED अधिकारी, गावात पहिलीच सरकारी नोकरी; जाणून घ्या यशोगाथा
10
Video - खळबळजनक! घरात घुसून शहीद जवानाच्या पत्नीला लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण
11
Alphonso Mangoes: कोकण हापूसच्या नावाखाली कर्नाटक, ‘आंध्र’च्या आंब्याची विक्री
12
धक्कादायक! जेवण मागितलं म्हणून बायकोनं नवऱ्याला टेरेसवरून खाली ढकललं
13
मोठा निर्णय! पाणीटंचाईमुळे खासगी टँकर्स, विहिरी, बोअरवेल मुंबई महापालिका ताब्यात घेणार
14
खळबळ उडाली! हवाई दलाच्या विमानावर हवेत असतानाच मोठा हल्ला; म्यानमारला मदत नेत असताना...
15
Health Tips: 'हे' दहा आयुर्वेदिक उपाय देतील निरोगी शरीर आणि संतुलित वजन; आजपासून करा सुरुवात!
16
IPL: पहिल्या पराभवाचे दु:ख, त्यातच मोठा धक्का! Mumbai Indians शी हरल्यानंतर अक्षरवर मोठी कारवाई
17
रॅपिडोची स्टोरी माहितीय का? ७५ वेळा आयडिया नाकारली; आज कोट्यवधी रुपयांचा व्यवसाय
18
देवेंद्र विरुद्ध फुले, आंबेडकर अशा प्रकारचा वाद त्यांच्या मनात; पाटलांचे राऊतांना प्रत्युत्तर
19
Murshidabad Violence : “हल्लेखोर आले, पोलिसांना फोन केला पण...”; मुर्शिदाबाद हिंसाचारातील थरकाप उडवणाऱ्या घटना
20
संतापजनक! साड्या वाटपासाठी बोलावलं, रागाच्या भरात आमदाराने महिलेच्या डोक्यावर मारलं अन्...

life lesson: भगवान बुद्ध म्हणतात, 'स्वत:बरोबर दुसर्‍यांची प्रगती करणे, हा खरा विकासाचा मार्ग!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2025 15:15 IST

Life lesson: प्रवास तेव्हाच सोपा होतो जेव्हा सोबतचा प्रवासी चांगला असतो, आयुष्याचा प्रवास सोपा व्हावा म्हणून असेच प्रवासी जोडा आणि स्वत:बरोबर इतरांना यशस्वी करा.

आपल्या प्रत्येकाला, आयुष्यात पुढे जाताना एक धीर देणारा हात, आश्वासक शब्द किंवा कोणाचातरी पाठींबा हवा असतो. कोणाचा एक शब्द आपल्याला जगण्याचे बळ देऊन जातो. ही गरज जशी आपल्याला असते, तशी अन्य कुणालाही असू शकते. म्हणून आपणही कोणासाठी प्रोत्साहन देण्याची जबाबदारी स्वीकारली केली पाहिजे. 

भगवान बुद्ध त्यांच्या उतार वयातही प्रवचनासाठी, प्रबोधनासाठी, लोककल्याणासाठी गावोगाव फिरत असत. या प्रवासात सोबत त्यांचा शिष्य आनंददेखील होता. प्रवासात चालता चालता भगवान बुद्ध खूपच थकले होते. परंतु, ते शिष्याला म्हणत होते, `हरकत नाही, थोडेच अंतर शिल्लक आहे. आपण लवकरच पोहोचू.'

वाटेत त्यांना एक शेत लागले. तिथे एक शेतकरी राबत होता. आनंदने त्याला थांबवले आणि विचारले, `गाव आणखी किती दूर आहे?' त्याने भगवान बुद्धांकडे पाहिले. स्मित केले आणि आनंदकडे बघत शेतकरी म्हणाला, `फार दूर नाही, दोन किलोमीटर दूर आहे.'

ते दोघे चालू लागले. दोन किलोमीटरच्या वरचे अंतर चालून पार झाले. तरीही गाव दिसेना. वाटेत एक बाई दिसली. आनंदने त्यांना थांबवले आणि विचारले, `गाव आणखी किती दूर आहे?' त्या बाईने भगवान बुद्धांकडे पाहिले. ती हसली आणि आनंदला म्हणाली, `जवळ आलेच म्हणून समजा. दीड दोन किलोमीटर दूर असेल फार तर...'

आनंद पाय आपटत चालू लागला. भगवान बुद्ध त्याच्याकडे पाहून हसत होते. वास्तविक पाहता तेही थकले होते. परंतु दोघे जण थकत भागत पुढचा प्रवास करत होते. दोन तीन किलोमीटर अंतर संपत आले, तरीही गावाचा पत्ता नाही. आनंदने आणखी एका वाटसरूला थांबवत गाव किती दूर आहे, हे विचारले. त्यानेही तेच उत्तर दिल्यावर शेवटी आनंदने वैतागून हातातली गाठोडी रस्त्यावर टाकली आणि भगवान गौतम बुद्धांची क्षमा मागून म्हणाला, `गुरुदेव, मी आणखी नाही चालू शकत. मी खूप थकलो आहे. गाव जवळच आहे या आशेवर इथवर चालत आलो, परंतु आणखी चालवणार नाही.'

भगवान हसले आणि म्हणाले, `काहीच हरकत नाही आनंद. तसेही गाव इतक्यात येणार नाही. कारण ते आणखी वीस किलोमीटर दूर आहे.''आणखी वीस किलोमीटर? म्हणजे तुम्ही इथे आधी येऊन गेला आहात? मग हे लोक माझ्यासी खोटं का बोलले? आणि तुमच्याकडे पाहून का हसले?' आनंद प्रश्नार्थक चेहऱ्याने विचारू लागला. 

भगवान म्हणाले, `हो, मी यापूर्वी इथे येऊन गेलो आहे. परंतु तुला इथे येण्याआधीच मी ते गाव इतके दूर आहे सांगितले असते, तर तू इथपर्यंत आला नसतास. तुला धीर मिळावा, चालण्याचे बळ मिळावे, म्हणून मी आणि वाटेत भेटलेले गावकरी तुला प्रोत्साहन देत होतो. त्यामुळेच वीस किलोमीटरपैकी सहा किलोमीटर अंतर आपण पारही केले. आज रात्री आपण इथेच एका झाडाखाली विश्रांती घेऊया. मग पुढचा प्रवास करूया. आजच्या प्रवासात तुला मिळालेली शिकवण कायम लक्षात ठेव आणि तू सुद्धा इतरांना प्रोत्साहन देत जा.'

हीच शिकवण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लक्षात ठेवली आणि समस्त बहुजन वर्गाला प्रगती पथावर नेण्यासाठी कटिबद्ध झाले. त्यांचे कार्य पुढे नेणे ही आपलीही जबाबदारी आहे. त्यामुळे माणुसकीच्या नात्याने आपणही स्वतःबरोबर इतरांचीही प्रगती करूया आणि हे जग अधिक सुंदर बनवूया. 

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी