शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

Life Lesson: सद्गुरू सांगतात, 'आपण झोपून उठतो तो आपला पुनर्जन्मच आहे असे समजा; कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 07:00 IST

तुम्ही झोपेतून जागे झाले असाल तर हा एक चमत्कार समजा, कारण अनेकांनी ही संधी काल रात्रीच गमावली! - सद्गुरू

ताण- तणाव, काळजी, चिंता, नैराश्य इ. अनेक कारणांमुळे आपण शांत झोप गमावून बसलो आहोत. परंतु लक्षात घ्या, झोपेपेक्षा आयुष्यात महत्त्वाचे काहीही नाही. कारण झोपेतून जागे होणे हे पुनर्जन्माहुन कमी नाही. सांगत आहेत सद्गुरू!

जगभरात जवळपास अडीच लाख लोक आदल्या रात्री झोपतात परंतु दुसऱ्या दिवशीही सकाळ बघू शकत नाहीत. कारण झोपेतच त्यांचा नैसर्गिक रित्या मृत्यू होतो. त्या अडीच लाखांमध्ये आपला क्रमांक लागला नाही, याहून मोठा आनंद दुसरा कोणत्या गोष्टीचा असू शकतो का? ही गोष्ट एखाद्या उत्सवातून कमी नाही. हा उत्सव कसा साजरा करायचा? तर सकाळी उठल्यावर छोटेसे स्मित करून! मात्र मुख्य समस्या हीच आहे, की आजच्या तणावयुक्त जगात आपण हसणे विसरलो. विषय, विचार, विकार आपल्यावर एवढे हावी झाले आहेत की आपण रात्री शांत झोपूही शकत नाही. 

आपला शेवट कसा घडणार आहे माहीत नाही, फक्त मागच्या २४ तासांचा विचार करा. आपण शय्येवर नाही तर मृत्यू शय्येवर बसलेलो आहोत असे समजा आणि स्वतःशी प्रामाणिक राहा. जर तुम्ही दिवसभरात कोणाशी खोटेपणाने वागला नसाल, कोणाला दुखावले नसेल, कोणाला फसवले नसेल, तर तुम्हाला पुढच्या दिवसाची भ्रांत करायची गरज नाही. तुमचे कर्म चांगले असेल तर फळ चांगलेच मिळेल याची खात्री बाळगा. आणि शांत झोप लागण्यासाठी पुढील उपाय करा. 

>> लहान मुलांसारखे फक्त झोपायचे आहे असे ठरवून त्या स्थितीचा आनंद घ्या. तुमचे मनच नाही तर शरीर आणि मुख्यतः डोकं हलके झाल्यासारखे वाटू लागेल. 

>> संध्याकाळी हलका आहार घ्या. मांसाहार किंवा जड पदार्थ खाणार असाल, तर झोपण्याच्या चार तास आधी खा. 

>> झोपण्याआधी कोमट पाण्याने स्नान करा. अंघोळीमुळे केवळ अंगावरचा मळ जातो असे नाही, तर त्यामुळे मनःशुद्धी सुद्धा होते.

>> ज्या खोलीत झोपता त्या खोलीत एखाद्या कोपऱ्यात तेलाचा दिवा लावा. छोटीशी वाटणारी ही गोष्ट खूप प्रभावी ठरेल, करून बघा. 

>> उत्तर दिशेला डोकं करून झोपू नका. कारण उत्तर दिशेला डोकं करून झोपल्याने मेंदूकडे रक्तस्त्राव होऊन अस्वस्थता वाढते. तुम्ही बर्फ़ाळ प्रदेशात राहात असाल तर दक्षिण दिशेला डोकं करून झोपू नका आणि उष्म प्रदेशात राहात असाल तर उत्तर दिशेला डोकं करून झोपू नका. हा साधा नियम लक्षात ठेवा. 

>> अलार्मच्या झटक्याने झोपेतून जागे होणे चांगले नाही. प्रत्येकाला आपल्या झोपेची गरज माहीत असते. त्यानुसार झोपेची वेळ पूर्ण करण्यासाठी लवकर झोपा आणि नैसर्गिक रित्या जाग येऊ द्या. 

>> विश्रांतीच्या अवस्थेतून तुम्ही  तेव्हा सक्रिय होण्यासाठी डाव्या कुशीवर वळून उठा. दोन्ही हात चोळून डोळ्यावर ठेवा. तुमची मज्जासंस्था जागृत होते. शरीर हलवण्याआधी मेंदू सक्रिय करणे गरजेचे असते. 

लक्षात ठेवा, दिवसापेक्षा रात्रीच्या झोपेत तुमचा व्यक्तिमत्त्व विकास वेगाने होतो. त्यामुळेच सकारात्मकता वाढते आणि आयुष्य आनंदी होते. त्यामुळे साधी झोप नाही तर शांत झोप महत्त्वाची असते हे कायम लक्षात ठेवा!

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सInspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी