शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेवर मनसे नेते नाराज? म्हणाले, “त्यांनी आम्हाला दोनदा फसवलेय”
2
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षीय वैभव सूर्यवंशी पदार्पणासह रचणार इतिहास; जाणून घ्या सविस्तर
3
Big Breaking: तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात अखेर डॉ. सुश्रुत घैसास यांच्यावर गुन्हा दाखल
4
"देशात धार्मिक युद्ध भडकवण्यासाठी सुप्रीम कोर्ट जबाबदार"; मर्यादेबाहेर जाताय म्हणत भाजप खासदाराची टीका
5
IPL 2025 Video: 'सुपरमॅन' कॅच! विपराजला हवा होता चौकार, पण जोस बलटरने हवेत उडत घेतला भन्नाट झेल
6
राज ठाकरेंशी युती झाल्यास उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतून बाहेर पडणार का?; संजय राऊत म्हणाले...
7
Video - अग्निकल्लोळ! एका ठिणगीमुळे बोटीला भीषण आग; १४८ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
“मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमुळे राज ठाकरेंची उपयुक्तता सर्वांना वाटत आहे”: छगन भुजबळ
9
“राहुल गांधींचा ‘डरो मत’ संदेश अमलात आणू, एकता, अखंडतेची मशाल घेऊन वाटचाल करू”: सपकाळ
10
Maharashtra Politics : राज ठाकरे अन् उद्धव ठाकरे एकत्र येणार का? संजय राऊतांनी सगळंच सांगितलं
11
“इथले मीठ खाता अन् मराठीला विरोध करता? हिंदीची सक्ती होऊ देणार नाही”; उद्धव ठाकरेंनी ठणकावले
12
IPL 2025: चेन्नई सुपर किंग्जमध्ये आला 'बेबी एबी'; अशी आहे टी२० कारकीर्द
13
“कार्यकर्त्यांनी कठोर मेहनत घ्यावी, ५ वर्षांनंतर काँग्रेस पुन्हा सत्तेत येईल”: नाना पटोले
14
"मी ज्या झोपडपट्टीतून आलोय...", दिसण्यावरून ट्रोल करणाऱ्यांना सिद्धार्थ जाधवची सणसणीत चपराक
15
गुजरातविरुद्ध केएल राहुलचा विक्रमी षटकार; रोहित, विराट आणि धोनीच्या पंक्तीत झाला सामील
16
'तो' प्रवास ठरला शेवटचा! गायीला वाचवण्याच्या प्रयत्नात कार कालव्यात पडली, एअर होस्टेसचा मृत्यू
17
'हिंदू आहोत हा आमचा गुन्हा आहे का?', पश्चिम बंगाल हिंसाचार बाधित महिलांचा भावनिक सवाल
18
“आम्ही कुटुंब फोडणारे नाही, राज अन् उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर स्वागतच”: हर्षवर्धन सपकाळ
19
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांना गती; शिंदे गटातील नेत्यांची प्रतिक्रिया म्हणाले...

Maghi Ganesh Jayanti 2022: गणपती बाप्पाची पुण्यदायक ‘श्रीगणेश चालीसा’ म्हणा; सुख-समृद्धी, शुभलाभ मिळवा, पाहा, नियम

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2022 13:18 IST

Maghi Ganesh Jayanti 2022: गणपती बाप्पाचे मंत्र, स्तोत्र यांप्रमाणे श्रीगणेश चालीसाही अनन्य महत्त्व असून, पठणाचे नियम माहिती असणे गरजेचे आहे. जाणून घ्या...

गणपती बाप्पाचे केवळ नाव उच्चारताच मन अगदी चैतन्यमय होऊन जाते. मराठी वर्षांत गणेशाचे तीन जन्म अगदी मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात. गणेशाचे हे तीन अवतार समाजासाठी खूपच प्रेरणादायक मानले गेले आहेत. यातील एक महत्त्वाचा दिवस म्हणजे माघ महिन्यातील शुद्ध चतुर्थीला येणारी श्रीगणेश जयंती. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी माघी गणेशोत्सवही मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. यानिमित्ताने गणपती बाप्पाचे मंत्र, श्लोक, स्तोत्रे यांचे पठण केले जाते. गणपती अथर्वशीर्षाप्रमाणे गणेश चालीसाला तितकेच महत्त्व असल्याचे सांगितले जाते. 

कोणतेही शुभ व मंगल कार्य सुरू करण्यापूर्वी श्रीगणेशाची पूजा करणे हा नियम आहे, जेणेकरून सर्व कार्य निर्विघ्न पार पडतात. श्रीगणेशाची मनोभावे पूजा केल्याने घरात समृद्धी, व्यवसायात समृद्धी आणि प्रत्येक कामात यश मिळते. गणेश चालीसा स्तोत्राचे पठण शुभपुण्यदायक मानले गेले असून, यामुळे जीवनात सुख-समृद्धी मिळू शकते, असेही सांगितले जाते. मात्र, गणेश चालीसा पठणाचे काही नियम आवर्जुन पाळावे, असा सल्ला दिला जातो. 

गणेश चालीसा महत्त्व

गणेश चालीसा स्तोत्राचे प्रामाणिक अंतःकरणाने पठण केल्याने व्यक्तीच्या जीवनातील दुःख दूर होते आणि त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. श्रीगणेशाची आराधना केल्याने कुटुंबातील सर्व समस्या दूर होतात. गणेश चालीसा स्तोत्राचे नियमित पठण करणाऱ्या भक्तांना आयुष्यभर कशाचीही कमतरता भासत नाही आणि कुटुंबात सदैव सुख-शांती नांदते, अशी मान्यता आहे. 

गणेश चालीसा पठणाचे काही नियम

दररोज सकाळी आपापले कुळधर्म, कुळाचार याप्रमाणे गणपती बाप्पाची पूजा झाल्यानंतर गणेश चालीसा पठण केले तरी चालते. यावेळी बसण्याची जागा आणि वस्त्र स्वच्छ असावे, असे सांगितले जाते. तसेच गणेश चालिसाचे पठण करताना कोणतेही वाईट विचार मनात येऊ देऊ नये. पाठ करताना नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेकडे तोंड करावे. भगवान गणेशाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी भगवान शिव आणि माता पार्वतीचेही ध्यान करावे. पठण करताना किंवा पठण झाल्यानंतर गणपतीच्या मूर्तीवर दूर्वा अर्पण करायला विसरू नये. तसेच गणेश चालीसा पठण करताना शक्य असल्यास तुपाचा दिवा देवासमोर लावावा, असे काही नियम सांगितले जातात. नित्यनेमाने गणपतीची आराधना करणाऱ्या भक्तांच्या जीवनातून दु:खाची छाया दूर होते. श्रीगणेश चालीसाचे यथायोग्य पठण केल्याने गणपती बाप्पा लवकर प्रसन्न होतो आणि व्यक्तीला अपेक्षित फळ मिळू शकते, अशीही मान्यता असल्याचे सांगितले जाते.  

टॅग्स :Maghi Ganesh Jayantiमाघी गणेश जयंती