शहरं
Join us  
Trending Stories
1
Haryana Assembly Election Results 2024 हरियाणात भाजपचा विजयी रथ का रोखू शकली नाही काँग्रेस? ही आहेत 5 महत्वाची कारणं
2
अवघ्या २०० दिवसांत 'त्यांनी' सूत्रं हलवली, पुन्हा भाजपाची सत्ता आणून दाखवली! हरयाणातील 'मॅन ऑफ द मॅच' 
3
"भाजपाशी थेट लढाई असते तिथे काँग्रेस कमीच पडते"; ठाकरे गटाच्या प्रियंका चतुर्वेदी यांचा खोचक टोला
4
Haryana Results 2024: भाजपाने हरयाणा जिंकले, पण पाच मंत्री हरले; कोणी केला पराभव?
5
देशातील सर्वात श्रीमंत महिलेला भाजपनं तिकीट नाकारलं, पण अपक्ष म्हणून निवडणूक लढविली अन् जिंकलीही...
6
Haryana Assembly Election Results 2024 : बाजी हातातून निसटताना भाजपाने केली खेळी; हरयाणात या समि‍करणामुळे झाली उलथापालथ
7
Haryana, Jammu & Kashmir Assembly Election Results 2024 Live: जम्मू काश्मीरचा अंतिम निकाल हाती, पाहा कुठल्या पक्षाला किती जागा...
8
जम्मू-काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्सची 'बाजी', पण भाजपा 'बाजीगर'; जागा वाढल्या अन्...
9
सूरज चव्हाण बिग बॉस जिंकल्यावर मराठी अभिनेत्री म्हणते, 'छपरीपणा सुरु करायला हवा...'
10
हरियाणातील निकालामुळे राज्यात काँग्रेसवर दबाव?; पृथ्वीराज चव्हाणांनी मांडली भूमिका
11
भाजपची रणनीती कामी आली; हरयाणात 'ऑल इज वेल', शेतकरी-जवान नाराज नाहीत..!
12
"तुम्ही मला मत दिलं, तर मी तुम्हाला चंद्रावर घर देईन", उद्धव ठाकरे असं का म्हणाले?
13
SEBI नं १०० पेक्षा अधिक स्टॉक ब्रोकर्सना पाठवली नोटीस, काय आहे कारण; जाणून घ्या
14
कोण आहेत मेहराज मलिक? ज्यांच्यासाठी अरविंद केजरीवालांचा 'झाडू' चालला; भाजपचा किती मतांनी केला पराभव?
15
जयराम रमेश यांनी डेटा अपडेटमध्ये उशीर केल्याचा आरोप केला; निवडणूक आयोगाने प्रत्येक मिनिटांचे उत्तर दिले
16
Uddhav Thackeray : "गद्दारांना ५० खोके आणि बहिणीला फक्त १५०० रुपये; हा महाराष्ट्रधर्म नाही" - उद्धव ठाकरे
17
ढोल वाजवले, फटाके फोडले; लाडू, जिलेबी वाटली, पण… काँग्रेसच्या उत्साही कार्यकर्त्यांवर नामुष्की 
18
"...हाच आजच्या निवडणूक निकालाचा धडा"; अरविंद केजरीवाल निकालावर काय म्हणाले?
19
ओमर अब्दुल्ला होणार जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री; विजयानंतर फारुख अब्दुल्लांची घोषणा
20
'त्या' लोकांना दहशतवाद्यांसारखी वागणूक द्या; तुषार गांधींची उद्धव ठाकरेंकडे मागणी

Maha Shivratri 2022: महाशिवरात्रीला अशा पद्धतीनं अर्पण करा बेलपत्र, जाणून घ्या बेल तोडण्याची योग्य पद्धत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2022 1:09 PM

Maha Shivratri 2022: महाशिवरात्री संपूर्ण देशभर शिवभक्तांकडून मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. शिवभक्तांमध्ये संपूर्ण वर्षभर महाशिवरात्रीची उत्सुकता लागून राहिलेली असते.

Maha Shivratri 2022: महाशिवरात्री संपूर्ण देशभर शिवभक्तांकडून मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. शिवभक्तांमध्ये संपूर्ण वर्षभर महाशिवरात्रीची उत्सुकता लागून राहिलेली असते. महाशिवरात्रीला भगवान शंकराची मोठ्या श्रद्धेनं पूजा केली जाते. हिंदू दिनदर्शिकेनुसार दरवर्षी फाल्गुन महिन्यात कृष्ण पक्ष चतुर्दशीला महाशिवरात्र साजरी केली जाते. यंदा महाशिवरात्र मंगळवारी १ मार्च २०२२ रोजी साजरी होणार आहे. महाशिवरात्री दिवशी भगवान भोलेनाथांचा माता पार्वतीसोबत विवाह सोहळा संपन्न झाला होता. त्यामुळे महाशिवरात्रीचं व्रत करुन भगवान शंकराला प्रसन्न केलं जाण्याची परंपरा आणि श्रद्धा आहे. बेलपत्र भगवान शंकराला खूप प्रिय आहे. शास्त्रात फुलं किंवा कोणतीही पानं तोडण्याचे काही नियम सांगितले गेले आहेत. यातच भगवान शंकराला वाहण्यात येणारे बेलपत्र तोडण्याचे आणि ते अर्पण करण्याची एक विशिष्ट पद्धत सांगण्यात आली आहे. 

बेलपत्र तोडण्याचे नियम१. शास्त्रानुसार चतुर्थी, अष्टमी, नवमी, चतुदर्शी आणि अमावस्या तिथी, संक्रांतीच्या वेळी तसंच सोमवारी बेलपत्र कधीच तोडू नये. 

२. भगवान शंकराला बेल अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे वरील तिथी किंवा दिवशी बेलपत्र तोडू नये असं शास्त्रात नमूद आहे. 

३. बेलपत्राबाबत शास्त्रात नमूद असलेल्या माहितीनुसार जर नवं बेलपत्र मिळत नसेल तर दुसऱ्यानं वाहिलेलं बेलपत्र धुवून ते पूजेत भगवान शंकराला अर्पण केलं तरी चालतं. 

४. बेलपत्र नेहमी संध्याकाळ झाल्यानंतर तोडावे. 

५. बेलपत्र नेहमी फांदीपासून एक एक करुन तोडावं. एकत्र कधीच तोडू नये. संपूर्ण फांदीला नुकसान होईल अशापद्धतीनं बेल तोडू नये. 

६. बेलपत्र तोडण्यापूर्वी मनात भगवान शंकराला प्रणाम करावा. 

बेलपत्र कसं अर्पण करायचं?१. भगवान शंकराला बेलपत्र नेहमी उलट वाहायचं असतं. बेलाच्या पानाचा जो तुकतुकीत भाग आहे तो आतल्या बाजूस म्हणजेच शिवलिंगाच्या बाजूस असायला हवी. 

२. तुम्ही जे बेलपत्र अर्पण करत आहात त्यात वज्र आणि चक्र असता कामा नये. 

३. भगवान शंकराला अर्पण केले जाणारे बेलपत्र ३ ते ११ पानांचे असायला हवे. यात जितकी जास्त पानं अर्पण केली जातात तितकं अधिक लाभदायी ठरतं असं म्हटलं जातं. 

४. बेलपत्र न मिळाल्यास बेलाच्या वृक्षाला नमन करुनही भगवान शंकराला हात जोडून नमस्कार करावा. 

५. बेलपत्रावर भगवान शंकराचं नाव लिहून अर्पण केलं तर उत्तम. 

(वरील सर्व माहिती धार्मिक आस्था आणि समाजमान्यतांवर आधारित आहे. यात कोणतंही वैज्ञानिक प्रमाण नाही. सामान्य व्यक्तींची अभिरुची लक्षात घेऊन वरील माहिती पोहोचविण्याचा प्रयत्न केला गेला आहे.)

टॅग्स :Mahashivratriमहाशिवरात्री