शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
3
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
5
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
6
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
7
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
8
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
9
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
10
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
11
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
12
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
13
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
14
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
15
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
16
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
17
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
18
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
19
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
20
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी

Maha Shivratri 2023: ज्योतिर्लिंग म्हणजे काय? त्यांचा शोध सर्वप्रथम कोणी घेतला? ज्योतिर्लिंगाचे महत्त्व जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2023 5:50 PM

Maha Shivratri 2023: सद्यस्थितीत सहाव्या ज्योतिर्लिंगावरून वाद सुरू आहे, शिवपुराणात त्याबद्दल काय उल्लेख आहे ते पाहू. 

राजकारणामुळे समाजकारणही ढवळून निघते. इतकी वर्षे कधीही न निघालेला मुद्दा अलीकडे चर्चेत आला आहे, तो म्हणजे सहावे ज्योतिर्लिंग भीमाशंकर हे पुण्याचे नसून आसाम येथील गुवाहाटीचे ज्योतिर्लिंग आहे असे म्हटले जात आहे. हा गोंधळ झाला आहे तो सारख्या नावांमुळे. ही दोन्ही शिवमंदिरं प्राचीन काळातली आहेत. मात्र, बारा ज्योतिर्लिंगांचा शोध आद्य शंकराचार्य यांनी लावला आणि पाच ज्योतिर्लिंग एकट्या महाराष्ट्रात आहेत, म्हणून हे राष्ट्र 'महा'राष्ट्र म्हणून ओळखले जाते अशी जोड आणखी संतांनी दिली.

त्या पाचांपैकी एक म्हणजे सह्याद्रीच्या कुशीतले पुण्याजवळचे भीमाशंकर! त्याचीच पुनर्बांधणी अहिल्या देवी होळकर यांनी केली. त्यामुळे जी मूळ ज्योतिर्लिंग आहेत तिथे आद्य शंकराचार्य आणि अहिल्यादेवींचे मंदिर हमखास असते. हीच ज्योतिर्लिंग ओळखण्याची खूण म्हणता येईल! तसे ते मंदिर महाराष्ट्रातल्या भीमाशंकर जवळ आहे, त्यामुळे ते ज्योतिर्लिंग स्वयंभू म्हणता येईल.

मग गुवाहाटीच्या भीमाशंकरचे काय?

तर शिवपुराणात उल्लेख केल्यानुसार कामाख्या देवीजवळदेखील भीमाशंकराचे देवस्थान आहे आणि तेही प्राचीन आहे. मात्र ज्योतिर्लिंगांच्या गणनेत त्याचा उल्लेख करता येणार नाही. कारण ते देवस्थान आदी शंकराचार्यांच्या यादीत आढळत नाही. आदी शंकराचार्य हे शंकराचे अवतार मानले जात असल्याने त्यांनी नमूद केलेली १२ ज्योतिर्लिंगं गृहीत धरता येतील. असे असले तरी गुवाहाटीच्या प्राचीन भीमाशंकराचे पावित्र्य आणि महत्त्व कमी होत नाही.

आता जाणून घेऊ ज्योतिर्लिंग म्हणजे काय? -

ज्योती म्हणजे प्रकाश. ज्योती म्हणजे तेज. ज्योती म्हणजे ज्ञान. ज्योती म्हणजे प्रेरणा. ज्योती म्हणजे चेतना. या सर्व शक्तिरूपी शिवाचे प्रतीक, संस्कृतात त्याला लिंग असे म्हणतात, तेच ज्योतिर्लिंग! ती एकूण बारा आहेत. त्याचे वर्णन एका श्लोकात केले आहे. बारा ज्योतिर्लिंगांची नावे लक्षात राहत नसतील, तर हा श्लोक पाठ करून टाका. या श्लोकाच्या उच्चाराने ज्योतिर्लिंगांचे स्मरण होईल आणि पुण्यही पदरात पडेल.

सौराष्ट्रे सोमनाथंच श्रीशैले मल्लिकार्जुनम् ।उज्जयिन्यां महाकालमोंकारममलेश्वरम् ।परल्यां वैद्यानाथंच डाकिन्यां भीमशंकरम् ।सेतुबंधे तु रामेशं नागेशं दारुकावने।वाराणस्यां तु विश्वेशं त्र्यंबक गौतमीतटे।हिमालये तु केदारं घृष्णेशं च शिवालये।

सोरटी सोमनाथ, श्रीशलि, महांकालेश्वर, ओंकारमांधता, परळी वैजनाथ, भीमाशंकर, रामेश्वर, औंढ्या नाननाथ, काशी विश्वनाथ, त्र्यंबकेश्वर, केदारनाथ, घृष्णेश्वर ही बारा ज्योतिर्लिंगे आहेत. याशिवाय नेपाळमधील पशुपतिनाथ हे दोन्ही मिळून एक ज्योतिर्लिंग होत असते.

ही बारा ज्योतिर्लिंगे भारताच्या पूर्व-पश्चिम, दक्षिण-उत्तर भागात आहेत. एवढ्या मोठ्या आपल्या देशातील लोकांच्या भाषा वेगवेगळ्या असतील, पण आपली संस्कृती एक आहे. अन ती म्हणजे भारतीय संस्कृती. याची प्रतीके म्हणजे ज्योतिर्लिंगे! एकराष्ट्रीयत्त्वाची ती एक खूण म्हटली पाहिजे. मानवांना प्रकाश, तेज, ज्ञान, प्रेरणा आणि चेतना देत राहणारी ही बारा ज्योतिर्लिंगे आहेत. प्रत्येक ज्योतिर्लिंगाशी निगडीत काही कथा आणि वैशिष्ट्ये आहेत. 

तूर्तास 'जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत' या संत उक्तीनुसार महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर देवस्थानांवर वाद निर्माण करण्यापेक्षा चराचरात परमेश्वर पाहून  निरपेक्ष मनाने शिवभक्ती करणे इष्ट!

टॅग्स :Mahashivratriमहाशिवरात्रीBhimashankarभीमाशंकर