शहरं
Join us  
Trending Stories
1
इकडे आड...! अमेरिकेसोबत व्यापारी करार केलात तर याद राखा; चीनची जगाला धमकी
2
Maharashtra Politics :"दोन ‘बंधू’ एकत्र येणार, त्यामुळे अनेकांच्या पोटात भीतीचा गोळा..."; सामनातून विरोधकांना डिवचले, संकेतही दिले
3
झारखंडच्या बोकारोमध्ये चमकम! सुरक्षा दलांनी ६ नक्षलवाद्यांना ठार केले
4
वानखेडेवर १७ वर्षांच्या आयुष म्हात्रेची तुफानी फटकेबाजी, सामना पाहणाऱ्या भावाला आनंदाश्रू अनावर, व्हिडीओ होतोय व्हायरल 
5
राज्य सरकार हिंदीचा प्रचार का करतंय?; २२ शैक्षणिक संघटनांचा हिंदी सक्तीला विरोध
6
Stock Market Today: ३४९ अंकांच्या तेजीसह उघडला Sensex, बँक निफ्टीचा रेकॉर्ड; रियल्टी-हेल्थकेअरमध्ये मोठी तेजी
7
‘अटी’तटीत अडकली ठाकरे युती, चर्चेचे गुऱ्हाळ सुरूच; मनसेची आक्रमक भूमिका
8
NAV म्हणजे नक्की काय हो? Mutual Fund मध्ये गुंतवणूक करत असाल तर हे माहितच हवं
9
महाराष्ट्रात सौर ऊर्जा क्रांती, राज्याला महत्त्वपूर्ण यश; ८,४५० मेगावॅट वीजनिर्मिती
10
Post Office ची कमालीची सेव्हिंग स्कीम; गुंतवणूक करा आणि महिन्याला २० हजारांचं पेन्शन फिक्स
11
काश्मीरमध्ये हाहाकार! ढगफुटीने तीन जणांचा मृत्यू; १०० हून अधिक लोकांना वाचवण्यात यश
12
"भारतातील निवडणूक प्रक्रियेत...’’, महाराष्ट्रातील मतदानाचा उल्लेख करत राहुल गांधींचं अमेरिकेत मोठं विधान
13
राज्यात हिंदीची सक्ती नाहीच, इतर भाषेचा पर्याय घेता येणार; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
14
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २१ एप्रिल २०२५: साशंक वृत्ती आपल्या मनाला अस्वस्थ करेल
15
साहेब, तुमच्या लाडक्या बहिणीच्या मुलीने गळफास घेतला, त्या क्रूर नराधमांना शिक्षा द्या
16
दोन मुलांना मारून टाकणार, पेटवून घेणार; महिलेचा 'तो' ईमेल आणि विख्यात डॉक्टरांनी संपवलं जीवन
17
राज्यात उन्हाने होरपळ, उकाड्यानं नागरिक हैराण; उष्णतेच्या लाटेचा इशारा
18
"मोदीजी या लोकांना रोखले नाही, तर..."; निशिकांत दुबे यांच्या विधानावरून ओवेसींचा हल्लाबोल
19
'असा' शिक्षक विद्यार्थ्यांना काय शिकवणार?; शिक्षणाचा खेळखंडोबा म्हणजे देशाशी गद्दारी!
20
मुंबई विद्यापीठासाठी उघडले संशोधनाचे नवे दालन; आयआयटी-मुंबईच्या ‘हब’ संस्थेत समावेश

Mahabharat : धनुर्धारी अर्जुन गुरु द्रोणाचार्य यांच्यापुढे नतमस्तक होण्यामागे होते 'हे' एकमेव कारण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2023 09:15 IST

Mahabharat Story: महाभारतातील छोटे छोटे प्रसंगही खूप मोठा बोध देतात, जगदजेता अर्जुन आणि गुरु द्रोणाचार्य यांच्याबद्दल सुधा मूर्ती काय सांगतात पहा!

लेखिका सुधा मूर्ती आपल्या एका व्याख्यानात सांगतात, रामायण महाभारतातून आपल्याला बरेच काही शिकण्यासारखे आहे. छोटे छोटे प्रसंग, वाक्य, श्लोक, सुभाषिते जीवनाला मोठा बोध देतात. माझ्या आजोबांनी मला बालपणी महाभारतातला एक श्लोक सांगितला होता, तो मला कायमस्वरूपी लक्षात राहिला. त्या श्लोकाचे सार सांगते- 

एकाने अर्जुनाला विचारले की तुझ्याकडे एवढे शौर्य आहे, धनुर्विद्या आहे, राज्य आहे, संपत्ती आहे, सत्ता आहे, सुंदर पत्नी आहे, तरी तू त्या द्रोणाचार्य ऋषींना एवढा मान का देतोस? अर्जुनाने एका वाक्यात उत्तर दिले, हे सगळे त्यांच्यामुळेच मला मिळाले आहे म्हणून!

द्रोणाचार्यांकडे सत्ता-संपत्ती नाही, पण त्यांच्याकडे जे बहुमूल्य ज्ञान आहे, ते कोणीही चोरू शकत नाही, मिटवू शकत नाही की हिसकावून घेऊ शकत नाही. त्यांच्याकडे असलेले ज्ञान ही त्यांची सर्वात मोठी संपत्ती आहे. त्या संपत्तीची तुलना प्रापंचिक सुखांशी होणारही नाही. त्या ज्ञानासमोर मी नतमस्तक होतो. कारण भौतिक सुख येईल-जाईल, मात्र ज्ञान हे नेहमीच वर्धिष्णू राहील. म्हणून आपण सर्वानीच गुरूंसमोर नतमस्तक झाले पाहिजे. 

अर्जुन द्रोणाचार्य हे गुरु शिष्याचे सुंदर नाते आजच्या पिढीसमोर ठेवायला हवे. आजचे विद्यार्थी शिक्षकांची मस्करी करतात, अपमान करतात, कमी लेखतात, त्यांनी अर्जुनाला आपला आदर्श मानून गुरूंना द्रोणाचार्य मानले पाहिजे आणि जास्तीत जास्त शिक्षण घेऊन ज्ञानाचा प्रचार प्रसार केला पाहिजे. ज्ञान जितके वाटाल तेवढे वाढते. 

म्हणूनच आजच्या तंत्रज्ञान युगातही एक गोष्ट निक्षून सांगावीशी वाटते, की जग कितीही वेगाने पुढे जात असले, ५G चे युग आले, तरी गुरुG ना पर्याय नाही. गुरूंचा आदर करा आणि अर्जुनासारखे शिष्योत्तम होऊन भारताची प्रतिमा जगात उंच करण्यासाठी प्रयत्नशील व्हा!

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी