शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
2
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
3
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
5
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
6
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
7
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी
8
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
9
पैसा ही पैसा होगा... सौरव गांगुलीला मिळणार तब्बल १२५ कोटी रूपये! महत्त्वाच्या करारावर झाली स्वाक्षरी
10
Swami Samartha: 'स्वामी' शब्दाचा 'हा' अर्थ जाणून घेतलात तर तारक मंत्राचा अर्थही नव्याने उलगडेल हे नक्की!
11
हॉस्पिटलमध्ये मनीषाला बळ मिळालं डॉक्टरांच्या कुटुंबातील सदस्याकडून; आत्महत्येच्या दिवशी डॉक्टरांचा चेहरा पडला होता
12
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
13
Pahalgam Attack: दहशतवादी हल्ल्यानंतर शाहरुख हळहळला, भाईजान म्हणाला- "स्वर्गासारखं काश्मीर नरकात बदलत आहे..."
14
ट्रम्प टॅरिफची दहशत संपली? निफ्टी ४ महिन्यांच्या शिखरावर, आयटीमध्येही तेजी परतली
15
Pahalgam Terror Attack : हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून कारवाईची भीती, पाकिस्तानचा शेअर बाजार आपटला
17
Marriage Ritual: लग्नांनंतर वर्षभर उलटे मंगळसूत्र घालण्यामागे काय आहे कारण? जाणून घ्या!
18
हे पहिल्यांदाच घडलं.. गौतम अदानींचा 'या' व्यवसायातून काढता पाय; सुनील मित्तल यांना विकण्याची तयारी
19
Post Office ची 'ही' स्कीम करणार तुमचे पैसे डबल, जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
20
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी

Mahakumbh 2025: कुंभमेळ्यात स्नान करून एका दिवसात पाप धुतले जात नाही, तर...सद्गुरूंचा व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 16:35 IST

Mahakumbh 2025: हातून कळत नकळत घडलेली पापं नष्ट व्हावीत म्हणून लाखो भाविक कुंभस्नान करतात; मात्र सद्गुरूंचे मत थोडे वेगळे आहे, काय ते जाणून घ्या!

'अन्य क्षेत्रे कृतं पापं पुण्यक्षेत्रे विनश्यति' असे वचन आहे. अर्थात अन्य ठिकाणी केलेली पापे पुण्यक्षेत्री गेल्यामुळे नष्ट होतात. या वचनानुसार प्रयागराज येथे भरलेल्या महाकुंभमेळ्याचा (Mahakumbh 2025) विचार केला, तर तिथे जमलेल्या लाखो लोकांचे पाप धुतले जाणे शक्य आहे का? यावर सद्गुरू काय म्हणाले ते पाहू. 

सनातन धर्मात तीर्थक्षेत्री केलेले स्नान तीर्थस्नान म्हणून ओळखले जाते. अनेक भाविक श्रद्धेने आजही तीर्थक्षेत्रावर जाऊन स्नान करतात. कुंभमेळ्यात तर त्याचे महत्त्व अधिकच वाढते. कारण ग्रहांच्या विशिष्ट योगात कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते. त्यातही प्रयाग राज येथे भरलेला महाकुंभ १४४ वर्षांनी आला आहे, तिथे त्रिवेणी संगम आहे, अनेक नागा साधू तिथे शाही स्नानासाठी येतात, त्यामुळे लाखोंच्या संख्येने भाविक तिथे कुंभ स्नान करण्यासाठी धडपडतात. 

कुंभस्नानाने पाप धुतले जाते का?

मात्र सद्गुरू सांगतात, 'कुंभमेळ्यात स्नान करून एका दिवसात पाप धुतले जात नाही, तर त्यासाठी तुमचे पूर्व कर्म, वर्तमान आणि भविष्यातील कर्म शुद्ध असावे लागते. अन्यथा पापांचे परिमार्जन होणार नाही. याउलट तुम्ही जर सत्कर्म करत राहिलात, तर तुमच्या शरीरावर पडणारे पाणीच नाही तर शरीरात असलेले ७२ टक्के पाणी संगमावरील पाण्यासारखे तीर्थ होईल आणि तुम्हाला पुण्य मिळेल आणि मृत्यूपश्चात मोक्ष मिळेल. त्यामुळे कर्मावर भर द्या, ते योग्य आहे की अयोग्य ते वेळोवेळी तपासून बघा आणि ते सुधारून पावन व्हा!'

कुंभस्नान करावे की नाही?

सद्गुरू सांगतात, तीर्थक्षेत्री जावे, स्नान करावे, अगदी कुंभस्नानदेखील करावे. मात्र त्यामुळे सगळी पापे धुतली गेली आणि आपण नवीन पापे करण्यास तयार झालो असा गैरसमज करून घेऊ नका. तीर्थक्षेत्री गेल्याने मनुष्यात अंतर्बाहय बदल होतात. ती दिव्य अनुभूती घेण्यासाठी कुंभमेळ्यात जा, कुंभस्नान करा मात्र त्याबरोबरीने आपले कर्म स्वच्छ ठेवा आणि सत्कार्य करत राहा, म्हणजे मोक्ष मिळेल. 

महाकुंभात सहभागी होता आले नाही तर?

ज्यांना महाकुंभात सहभागी होता आले नाही त्यांनी वाईट वाटून घ्यायचे कारण नाही. प्रत्यक्ष तिथे जाता आले नाही, तरीदेखील १४४ वर्षातून एकदा येणाऱ्या महाकुंभाचे आपण दुरून का होईना साक्षीदार आहोत. त्यामुळे अंघोळ करताना पंचनद्यांचे स्मरण करावे, देवाचे स्मरण करावे, आपले कर्म शुद्ध अंत:करणाने आचरावे. ही कृती केवळ पर्वकाळात नाही तर आयुष्यभर करता येणार आहे. विशेषतः शाही स्नानाच्या तारखा दिल्या आहेत, त्यादिवशी आवर्जून हा उपाय करा, पुण्य लाभेल. 

शाही स्नानाची तिथी :

१३ जानेवारी : पौष पौर्णिमा १४ जानेवारी : मकर संक्रांति २९ जानेवारी : पौष अमावस्या ०३ फेब्रुवारी : वसंत पंचमी १३ फेब्रुवारी : माघ पौर्णिमा २६ फेब्रुवारी : महाशिवरात्री 

प्रयाग राज येथे गेल्यास या दोन मंदिरांना भेट द्या : 

महाकुंभात शाही स्नान आणि दान केल्यानंतर बडे हनुमान आणि नाग वसुकीच्या दर्शनाला नक्की जा. शाही स्नानानंतर या दोन्हीपैकी कोणत्याही एका मंदिरात गेल्यास महाकुंभाचा धार्मिक प्रवास पूर्ण मानला जातो!

टॅग्स :Kumbh Melaकुंभ मेळा