शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

महाशिवरात्री: बिल्वपत्रासह ‘ही’ पानेही करा अर्पण, शिवपूजनात सर्वाधिक महत्त्व; पाहा, मान्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2024 17:23 IST

Mahashivratri 2024: महाशिवरात्रीला बेलपानांसह देशभरात विविध विशेष पाने, फुले वाहण्याची परंपरा असल्याचे सांगितले जाते. जाणून घ्या...

Mahashivratri 2024: मराठी वर्षातील माघ महिना सुरू आहे. माघ महिन्यात अनेकविध सण-उत्सव, व्रते साजरी केली जातात. मराठी वर्षातील श्रावणानंतर महादेव शिवशंकराच्या पूजनासाठी सर्वश्रेष्ठ आणि सर्वोत्तम मानला गेलेला दिवस म्हणजे महाशिवरात्री. माघ वद्य त्रयोदशीला महाशिवरात्री देशभरात साजरी केली जाते. यंदा ०८ मार्च २०२४ रोजी महाशिवरात्री आहे. देशभरातील हजारो शिवमंदिरात जाऊन लाखो भाविक जलाभिषेक, रुद्राभिषेक करतात. विशेष व्रताचरण, पूजन, नामस्मरण, जप-मंत्रांचे पठण अशा अनेक गोष्टी आवर्जून केल्या जातात. शिवपूजनात बिल्वपत्र अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. यासह अन्य काही पाने आहेत, जी महाशिवरात्रीला शंकराला अर्पण करावीत, असे सांगितले जाते. 

महाशिवरात्रीला भारतातील अनेकविध ठिकाणी महादेवाची पूजा मोठ्या प्रमाणात करता येते. तसे पाहिल्यास प्रत्येक मराठी महिन्यात शिवरात्र असते. मात्र, माघ महिन्यातील शिवरात्र, महाशिवरात्री म्हणून साजरी करण्यात येते. महाशिवरात्रीच्या शिवपूजनावेळी काही पानांना अनन्य साधारण असे महत्त्व आहे. शिवपुराणात बेलाच्या पानाचा महिमा सांगितलेला आहे. तीनही लोकांमध्ये जेवढी पुण्यतीर्थ आहेत, त्या सर्वांचे मूळ बिल्व पत्रात असल्याची मान्यता आहे. शिवपूजनात बिल्व पत्राचा वापर केल्यास शंकराची विशेष कृपा होते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. बेलाच्या पानाचे आरोग्याच्या दृष्टीनेही महत्त्व आहे.

धोत्र्याचे पान/फळ

महाशिवरात्रीच्या शिवपूजनात धोत्र्याचे पान आणि फळ यांचा समावेश केला जातो. शिवपुराणानुसार, शिवाला धोत्रा अत्यंत प्रिय आहे. धोत्र्याचे पान, फळ आणि फूल अत्यंत औषधी मानले गेले आहे. शिवपूजनात धोत्र्याचे पान आणि फळ वाहिले जाते. भगवान महादेवाला भांग प्रिय असल्याची मान्यता आहे. त्यामुळे महाशिवरात्रीला शंकराला भांगाची पाने अर्पण केली जातात. वास्तविक पाहता भांगाच्या पानाचे औषधी महत्त्व जास्त आहे. समुद्र मंथनावेळी शंकराने विष प्राशन केले होते, त्यावेळी उपचार करण्यासाठी भांगाच्या पानाचा वापर करण्यात आला होता, अशी कथा सांगितली जाते. यासाठी शिवपूजनात भांगाच्या पानाचे महत्त्व आहे, असे म्हटले जाते. 

‘ही’ पानेही अर्पण करण्याची परंपरा

बिल्वपत्र, भांगाचे पान, धोत्र्याचे पान/फळ याव्यतिरिक्त घोंगलाचे फूल वाहण्याची विदर्भात परंपरा आहे. तर काही ठिकाणी तुळशीची पाने शिवपूजनावेळी वाहिली जातात, असे म्हटले जाते. तसेच दक्षिण भारतात महाशिवरात्रीला शंकराला निळी कमळे वाहण्याची प्रथा आहे. त्याचप्रमाणे अशोकाची पाने, आवळीची पाने, कण्हेरीची पाने, कदंबाची पाने, ब्राह्मीची पाने, आघाडाची पाने शिवशंकराला शिवपूजनावेळी वाहिली जातात, असे सांगतात.

 

टॅग्स :Mahashivratriमहाशिवरात्रीPuja Vidhiनवरात्री पूजा विधी २०२३