शहरं
Join us  
Trending Stories
1
वडीगोद्री ते जालना मार्गावर बस - टेम्पोचा भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, १७ जखमी
2
शिवसेना-भाजपा वाद संपेना; आमदार योगेश कदमांविरोधात भाजपा पदाधिकारी संतापले
3
जुना अनुभव फार डेंजर, बॅकअप प्लॅन तयार ठेवलाय; अपक्ष आमदाराचा महायुतीला सूचक इशारा
4
Post Office ची सुपरहिट स्कीम! ५ वर्षांपर्यंत दर महिन्याला मिळतील ₹९,२५०; पाहा स्कीमचे फायदे
5
आमदार आदित्य ठाकरेंना निमंत्रण; मनसेच्या 'व्हिजन वरळी'त काका-पुतणे एकत्र येणार?
6
iPhone 16 ची भारतात विक्री सुरू होताच खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड; मुंबई, दिल्लीत लागल्या रांगा  
7
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
8
मारु का सोडू? संभ्रमात पडल्यामुळं फसला जड्डू! शतकासह 'द्विशतकी' डावही हुकला
9
Aadhaar मध्ये केवळ एकदा करू शकता 'हा' बदल; अनावधानानेही करू नका 'ही' चूक; पुन्हा संधी मिळणार नाही
10
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
11
उर्वशी रौतेला क्रिकेटर ऋषभ पंतला करतेय डेट? अभिनेत्री म्हणाली...
12
ही तर कमालच! १ लाखांचे झाले १ कोटी रुपये, मद्य तयार करणाऱ्या कंपनीकडून गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस
13
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
14
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
15
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
16
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
17
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
18
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
19
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
20
Pitru Paksha 2024: दक्षिण दिशेला फक्त श्राद्ध विधी केले जातात, अन्य शुभ कार्य नाही; का ते जाणून घ्या!

Makar Sankranti 2023: कणभर दिसणाऱ्या तिळामध्ये मणभर गुण सामावले आहेत, म्हणून धर्मशास्त्र सांगते... 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2023 7:00 AM

Makar Sankranti 2023:  'एक तीळ सात जणांनी वाटून खावा' असे का म्हटले जाते, याबद्दल वाचा शास्त्रशुद्ध माहिती!

>>मकरंद करंदीकर 

भारतभर मकरसंक्रांतीला खास महत्व आहे. हा सण साजरा करण्याची प्रत्येक राज्यामधील तऱ्हा वेगवेगळी आहे. महाराष्ट्रात सुगड पूजन, वाण देणे, लहान मुलांचे हलव्याचे दागिने घालून तिळवण, बोरन्हाण, नवविवाहितेचे हलव्याचे दागिने घालून साजरे केले जाणारे हळदीकुंकू अशा अनेक गोष्टी मोठ्या हौसेने केल्या जातात. या सर्वांमध्ये काळ्या वस्त्राला फार महत्व असते. स्वामी अय्यप्पाचे भक्त तर काळे कपडे परिधान करूनच ४० दिवसांचे व्रत करतात. काळ्या कपड्यांमध्ये सूर्यकिरण म्हणजेच पर्यायाने उष्णता सर्वाधिक शोषली जाते. या काळात सर्वत्र खूप थंडी पडत असल्याने या उष्णतेची शरीराला खूप गरज असते. आहारातही तीळ, गूळ, ऊस, भुईमुगाच्या शेंगा इ उष्ण आणि स्निग्ध पदार्थांचा उपयोग केला जातो. 

 तिळाच्या  छोट्याशा  दाण्यात काय काय सामावले आहे हे वाचले तर थक्क व्हायला होते. तांबे, मँगेनीज, कॅल्शियम, मॅग्नेशियम, आयर्न, फॉस्फरस, व्हिटॅमिन बी १ आणि बी ६, थायामीन फॉलेट, नायासिन, झिंक, मॉलिब्डेनम, सेलेनियम तसेच  सिसॅमिन व  सिसॅमोलीन हे दोन अत्यंत महत्वाचे दुर्मीळ  पोषक घटक या तिळाच्या टीचभर दाण्यात असतात. सिसॅमिन व  सिसॅमोलीन हे लिग्नन्स म्हणून ओळखले जातात आणि ते रक्तदाब आणि कोलेस्टेरॉल कमी करणारे तसेच इ व्हिटॅमिन देणारे आहेत.

अत्यंत महत्वाच्या  घटकयुक्त अशा तिळांमुळे मधुमेहाला प्रतिबंध करायला आणि त्याचे  नियंत्रण करायला मदत होते. या शिवाय कॅन्सरचा धोका कमी करणे, हाडांची शक्ती वाढवणे, सूज प्रतिबंध, पचनक्रिया सुधारणे, पचनक्रियेत सर्व अवयवांची शक्ती वाढविणे इत्यादी गोष्टीदेखील हा इवलासा तीळ करतो. हृदयाची कार्यक्षमता वाढविणे, उच्च रक्तदाब कमी करणे, स्नायू आणि केसांची ताकत वाढविणे, अकाली वृद्धत्व टाळणे, इत्यादी गोष्टींसाठी तीळ फार उपयुक्त आहे.  एवढासा तीळ असा अत्यंत बहुगुणी असल्यामुळेच मराठीत ' १ तीळ ७ जणांनी वाटून खावा ' ही  वरकरणी विनोदी वाटावी अशी म्हण रुजली असावी. 

गूळ हा पदार्थही तसाच गुणी आहे. गुळामध्येदेखील व्हिटॅमिन बी ६, बी १२,आयर्न, कॅल्शियम, फॉस्फरस,प्रोटीन्स, फॉलेट, सेलेनियम असा खजिना भरलेला असतो. आपल्याकडील लोकांमध्ये विशेषत: स्त्रियांमध्ये अनेक व्हिटॅमिन्स आणि पोषक द्रव्यांची कमतरता आढळते. म्हणूनच आपल्या अनेक धार्मिक कार्यांमध्ये, व्रतांमध्ये नैवेद्यासाठी चणे गूळ, पुरण, पुरणपोळी, गुळपोळी असे पदार्थ आवर्जून वापरले जातात. प्रसाद म्हणून नंतर ते खाल्ले जातात.

तिळगुळ घ्या, मास्क लावा आणि गोड गोड बोला !( तिळाची पोषणमूल्ये संदर्भ : प्रा. मीनाक्षी भट्टाचारजी, राईस युनिव्हर्सिटी, ह्यूस्टन,टेक्सास, यांचा लेख )

टॅग्स :Makar Sankrantiमकर संक्रांतीfoodअन्नHealth Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्यWinter Care Tipsथंडीत त्वचेची काळजी