शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

Makar Sankranti 2025: मकरसंक्रांतीला तिळगुळाचे दान केल्याने शनिदोष होतो दूर; वाचा त्यामागचे कारण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2025 16:32 IST

Makar Sankranti 2025: सालाबादप्रमाणे यंदाही १४ जानेवारीला मकर संक्रांत आहे, शनिदोष निवारणासाठी त्या दिवशी तिळगुळ दान का करतात ते जाणून घ्या. 

सनातन धर्मात मकर संक्रांत हा केवळ एक सण नसून तो शुभ संकेताचे प्रतीक मानला जातो. यंदाही १४ जानेवारी रोजी मकर संक्रांत (Makar Sankranti 2025) आहे. असे म्हटले जाते की मकर संक्रांतीच्या दिवसापासून सर्व शुभ आणि धार्मिक विधी सुरू होतात. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. त्यामुळे मकर संक्रांत साजरी केली जाते. या दिवसापासून सूर्यदेवाचे तेज अधिक वाढते असे म्हणतात. ते तेज आपल्यालाही मिळावे म्हणून मकर संक्रांतीपासून वर्षभर सूर्य पूजा केली जाते तसेच सूर्य नमस्कारदेखील घातले जातात. हा उत्तरायणाचा काळ शुभ मानला जातो. या काळात दान धर्म केल्याने अधिक पुण्य मिळते असे जुने जाणते सांगत असत. हिवाळ्याच्या मौसमात उबदार कपडे देऊन वस्त्रदान केले जाते किंवा तीळगूळ लाडू किंवा कच्चे अन्न दान केले जाते. 

मकर संक्रांतीच्या सणाला प्रत्येकाच्या घरी गुळापासून बनवलेले पदार्थ बनवले जातात. गुळपोळी, तीळगुळाचा लाडू, तिळवडी, तीळ शेंगदाणे चिक्की, गुळपापडी, गजक, गुडदाणी असे विविध प्रकार केले जातात, पण यासगळ्यात तीळ-गुळाचा समावेश केला जातो. हिवाळ्यात हे दोन घटक मुख्यत्त्वे वापरण्यामागे कोणते पौराणिक कारण आहे ते जाणून घेऊ 

मकर संक्रांतीला तिळगुळाचाच लाडू का? 

एकदा सूर्यदेव त्यांच्या मुलाच्या अर्थात शनिदेवाच्या घरी त्यांना भेटायला गेले, तो मुहूर्त होता मकर संस्क्रान्तीचा! शनिदेवाने आपल्या वडिलांचे मोठ्या आदराने स्वागत केले. त्यांनी सूर्यपूजा केली. नात्यात आणि शरीरात स्निग्धता निर्माण करणाऱ्या तीळ आणि गुळाचे दान केले. सूर्यदेवाला ती भेट आवडली. त्यांचे नाते आणखी दृढ झाले. आपल्या पुत्राच्या भक्तीवर सूर्यदेव प्रसन्न झाले. शनिदेवाला आशीर्वाद देताना ते म्हणाले की, जो कोणी तीळ आणि गुळाचे सेवन करून मकर संक्रांतीच्या पवित्र सणाच्या दिवशी माझी पूजा करील, त्याला माझे आशीर्वाद मिळतील! याला जोड देत शनिदेव म्हणाले, अशा भाविकाला माझेही आशीर्वाद लाभतील. कृपा राहील. तेव्हापासून मकर संक्रांतीच्या दिवशी तीळ आणि गूळ खाण्याची परंपरा सूर्यदेवाच्या आशीर्वादाने सुरू झाली. त्यामुळे मकर संक्रांतीच्या दिवशी मुख्यत्त्वे तीळ गूळ लाडू बनवले जातात.

ज्योतिष शास्त्राच्या दृष्टीने तीळ गुळाचे महत्त्व :

हिंदू धर्मात गुळ हा शुभ मानला जातो आणि अनेक धार्मिक विधींमध्ये त्याचा वापर केला जातो. तसेच गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवला जातो. यावरून गुळाचे महत्त्व लक्षात येते. ज्योतिष शास्त्रानुसार राहू आणि केतूचे दोष दूर करण्यासाठी गूळ विशेषतः उपयुक्त मानला जातो. जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत राहू किंवा केतूचा अशुभ प्रभाव असेल तर ती व्यक्ती गुळाचे दान करून या ग्रहांचे अशुभ प्रभाव कमी करू शकते. विशेषत: रविवारी गुळाचे दान केल्यास लाभ होतो. गुळ हा शनिदेवाला समर्पित मानला जातो. शनिदोषाने त्रस्त असलेल्या व्यक्तीसाठी शनिदेवाच्या मंत्रांच्या जपासह गुळाचे दान करणे किंवा गुळाचे सेवन करणे शुभ सांगितले जाते. 

टॅग्स :Makar Sankrantiमकर संक्रांतीAstrologyफलज्योतिष