शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा फोटो समोर, ओळखही पटली, दोघे पाकिस्तानी तर दोघे स्थानिक
3
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत मोठी सर्वात कारवाई करणार; 'हे' 4 संकेत काय सांगतात..?
5
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांनी मुस्लीम तरुणाचीही केली हत्या; कुटुंबाचा टाहो, म्हणाले, 'आम्हाला न्याय हवा'
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर 'या' बँकेचे शेअर्स विकण्यासाठी रांग, ९% टक्क्यांपेक्षा जास्त आपटला
7
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधून पहिल्यांदाच उमटल्या अशा प्रतिक्रिया, दिसल्या या चार गोष्टी    
8
ऑटो कंपोनट निर्माता कंपनीची वर्षात ५१,५३० टक्के वाढ; प्रत्येक शेअरवर मिळणार ६० रुपयांचा लाभांश
9
भोपाळ जवळ GAIL प्लांटमध्ये मिथेन गॅस गळती; परिसरात भीतीचे वातावरण
10
बाळाला खाली ठेवायला लावले आणि तीन मिनिटे चालवल्या गोळ्या; भरत भूषण यांच्या सासूने सांगितली आपबिती
11
सोन्याच्या दरात २७०० रुपयांची मोठी घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर
12
"तिथून परत आलेच नसते तर...", काश्मीरला फिरायला गेलेली मराठी अभिनेत्री, दहशतवादी हल्ल्यानंतर केली पोस्ट
13
अजित पवारांनीही केला ओमर अब्दुल्लांना फोन; पर्यटकांच्या सुटकेबाबत काय म्हणाले?
14
स्वामी समर्थ स्मरण दिन: ३ दिवस सेवा करा, असीम कृपेचे धनी व्हा; शुभ घडेल, अशक्यही शक्य होईल!
15
Pahalgam Attack: पहलगाम हल्ल्याबाबत मोठा खुलासा! दहशतवाद्यांनी १ ते ७ एप्रिल दरम्यान रेकी केली, नंतर हल्ला केला
16
Pahalgam Attack Update : वाढदिवसानिमित्त काश्मीर ट्रिप...; दहशतवाद्यांनी पत्नी आणि मुलांसमोरच केली शैलेशची हत्या
17
यंदा इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम तारीख काय आहे? अनेकजण करतात 'ही' चूक
18
IPL 2025: भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध! ना फटाके, ना चीअरलीडर्स; खेळाडू, पंच बांधणार काळ्या फिती
19
चैत्र वरुथिनी एकादशी: ‘असे’ करा व्रताचरण, श्रीविष्णू शुभच करतील; पाहा, महत्त्व अन् मान्यता
20
पत्नीसोबत काश्मीरला गेले अन् तो व्हिडीओ ठरला शेवटचा! दहशतवाद्यांनी हत्या करण्यापूर्वीचा व्हिडीओ होतोय व्हायरल

Marriage Ritual: लग्नांनंतर वर्षभर उलटे मंगळसूत्र घालण्यामागे काय आहे कारण? जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2025 16:27 IST

Marriage Ritual: लग्न विधीच्या वेळेस अनेक प्रथा, परंपरांचे पालन केले जाते, त्यातलीच एक रीत म्हणजे वर्षभर उलट मंगळसूत्र घालणे; पण असे का? ते जाणून घ्या. 

लग्नातल्या प्रत्येक विधीमागे सखोल विचार दडलेला आहे. मग ते कन्यादान असो, सप्तपदी असो वा मंगळसूत्र परिधान करणे असो. गुरुजी त्या प्रत्येक विधीचा अर्थ सांगतात, त्याला जोडूनच मंत्र म्हणतात. सुखी संसाराला पूरक असे ते मंत्र असतात. ते नीट ऐकले आणि त्या प्रत्येक रितीमागचा अर्थ जाणून घेतला तर विवाहाला सोहळा का म्हटले जाते ते लक्षात येईल. नवे नाते रुजवण्याचा हा सोहळा मंगळसूत्र घातल्यावर पूर्णत्त्वाला जातो. त्यात एक रीत आहे मंगळसूत्र उलटे घालण्याची! त्यामागे काय आहे कारण ते जाणून घेऊ. 

अलीकडच्या काळात लग्नाचे वय वर आणि वधूचे वाढत चालले आहे. तिशी-पस्तिशीनंतरही विवाह होतात. तरीदेखील विवाहप्रसंगी उलटे मंगळसूत्र घालण्याची प्रथा काही ठिकाणी वर्षभर तर काही ठिकाणी लग्नानंतर सोळा दिवस पाळली जाते. त्यामागचे मुख्य कारण काय आहे ते पाहू. 

मंगळसूत्राला सौभाग्य अलंकार म्हटला जातो आणि त्यात गुंफलेल्या दोन वाट्या म्हणजे सासर माहेरची खूण म्हटली जाते. त्या वाट्यांमध्ये हळद कुंकू भरले जाते आणि मणीमंगळसूत्राबरोबरच वाटी असलेले मंगळसूत्र उलट घातले जाते. ही ओळख आहे पूर्वीच्या काळची!

डॉ. मानसी मेहंदळे सांगतात, ''पूर्वी बालविवाहाची प्रथा होती. कमी वयात लग्न होऊन आलेली कुमारिका लग्न होऊन जरी सौभाग्यवती झाली तरी मासिक धर्म सुरु न झाल्याने ती संसार पुढे नेण्यास सक्षम नाही, याची खूण म्हणजे उलट मंगळसूत्र! जेव्हा त्या मुलीचा मासिक धर्म सुरु होईल, तेव्हा तिची ओटी भरून मंगळसूत्र सुलट केले जाई. याचा अर्थ ती आता वंशवाढीसाठी सक्षम मानली जात असे.''

एक छोटीशी खूण तरी त्यात दडला आहे मोठा संदेश! आहे की नाही पूर्वजांची दूरदृष्टी? आता बालविवाह बंद झाले तरी ती प्रथा मात्र सुरु आहे. ती नुसतीच फॉलो न करता या आणि अशा इतरही प्रथांमागचे अर्थ जाणून घेऊया आणि संस्कृतीशी पुन्हा नाळ जोडूया. 

{{{{facebook_video_id####https://www.facebook.com/reel/967071005609202/}}}}

टॅग्स :marriageलग्न