शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसची १६ जणांची तिसरी उमेदवार यादी जाहीर; मुंबईतील २ मतदारसंघाचा समावेश
2
पुण्यात भाजपाला बसणार मोठा फटका?; कसबा पेठ उमेदवार निवडीवरून पसरली नाराजी
3
दहिसर मतदारसंघात ठाकरेंचा ट्विस्ट; आधी तेजस्वी घोसाळकरांना उमेदवारी, पण आता...
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: तिकिट कापल्याने भाजपा आमदाराला अश्रू अनावर
5
शिंदेंच्या शिवसेनेत गेलेल्या बच्चू कडूंच्या आमदाराचा महायुतीत पत्ता कट
6
NCP नेते बाबा सिद्दीकी हत्याकांडात नवा खुलासा; हत्येआधी शूटरच्या संपर्कात अन्...
7
मनसेची १५ उमेदवारांची पाचवी यादी जाहीर; सोलापूर, कोल्हापूर, बीडमध्ये कोणाला संधी?
8
नवाब मलिक मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघात लढणार; भाजपा काय भूमिका घेणार?
9
कोरेगावची जागा राष्ट्रवादीला दिली, सातारा मतदारसंघातून ठाकरे गट लढणार; संजय राऊतांची माहिती
10
अपक्ष आमदार किशोर जोरगेवार भाजपात प्रवेश करणार; सुधीर मुनगंटीवारांची नाराजी दूर?
11
गौतम गुरुजींचं नशीब फुटकं! आधी खेळाडू अन् आता कोचिंगमध्ये टीम इंडियावर आली 'गंभीर' वेळ
12
Harun Khan: ठाकरेंनी उतरवला अल्पसंख्याक उमेदवार, कोण आहेत हारुन खान?
13
Sanjay Singh : "भाजपाने केला केजरीवालांना मारण्याचा प्रयत्न, द्वेषाच्या राजकारणाने..."; आप नेत्याचा गंभीर आरोप
14
'बटेंगे तो कटेंगे': भाजपच्या भूमिकेवर RSS चं पहिल्यांदाच भाष्य; होसबळे म्हणाले...
15
नेत्रदिपक कामगिरी! CA चं शिक्षण घेतल्यानंतर 'तो' शेतीकडे वळला; आता ५५ लाखांचा टर्नओव्हर
16
बंडोबा झाले थंड! उल्हासनगरमध्ये आयलानी व कलानी लढतीकडे सगळ्यांचे लक्ष का?
17
"आम्हाला टोलमाफीचे गाजर नको", सुमीत राघवनचा संताप, शिंदे-फडणवीसांना टॅग करत म्हणाला...
18
नेटकऱ्यांनी रोहित-विराटला दाखवला 'आरसा'; सचिनच्या चाळीशीतील 'त्या' व्हिडिओचाही दिला दाखला
19
मोठी बातमी: भाजपची दुसरी उमेदवार यादी जाहीर; जतमधून पडळकर, खडकवासल्यातून पुन्हा तापकीर!
20
पोटनिवडणुकीत पराभव तरी भाजपने दिली पुन्हा संधी! हेमंत रासनेंनी कसं जुळवलं गणित?

New year 2021: २०२१ मध्ये कोणत्या व्यक्तींना यश मिळेल जाणून घ्या

By ज्योत्स्ना गाडगीळ | Published: December 28, 2020 7:13 PM

New year 2021: येत्या काळात तीच व्यक्ती टिकून राहील, तीच व्यक्ती राज्य करेल, तीच व्यक्ती बदल घडवू शकेल, जिच्याजवळ सकारात्मकतेचा मोठा स्रोत असेल.

ज्योत्स्ना गाडगीळ 

थांबा थांबा. शीर्षक वाचून, सदर लेख भविष्याशी निगडीत आहे, असे कदाचित आपल्याला वाटू शकेल. परंतु नाही. हा लेख भविष्य कथन करण्यासाठी नाही, तर भविष्य घडवण्यासाठी उपयुक्त असणाऱ्या गोष्टींचा आढावा घेणारा आहे. 

हेही वाचा : २०२१ मधील 'अच्छे दिन'; जाणून घ्या, पुढच्या वर्षीचे सण-वार-उत्सव-मुहूर्त

१ जानेवारी हे हिंदूंचे नववर्ष नाही, तरीदेखील आपले दैनंदिन व्यवहार इंग्रजी तारखेनुसार चालतात. त्यामुळे इंग्रजी सालाप्रमाणे त्याचे स्वागत ओघाने आलेच. स्वागत म्हटले, की जल्लोष, आनंद, नवे संकल्प या गोष्टीही आल्याच. या सर्व गोष्टींसाठी मुख्यत्वे लागणार आहे, ती म्हणजे प्रचंड सकारात्मकता. येत्या काळात तीच व्यक्ती टिकून राहील, तीच व्यक्ती राज्य करेल, तीच व्यक्ती बदल घडवू शकेल, जिच्याजवळ सकारात्मकतेचा मोठा स्रोत असेल. म्हणून नववर्षाच्या पूर्वसंध्येला एक खूणगाठ मनाशी पक्की बांधून घ्या, ती म्हणजे, परिस्थिती कितीही वाईट असेल, परंतु आपल्याला सकारत्मकतेनेच विचार करायचा आहे. सकारात्मकता अंगी बाणण्यासाठी काही पथ्ये पाळावी लागतील, ती पुढीलप्रमाणे-

चित्रपटात आपण पाहतो, कोणी काही अपशब्द काढला, वाईट बोलले, की नायिका ते वाक्य मध्यातून तोडत नायकाच्या तोंडावर हात ठेवते. या गोष्टी फिल्मी किंवा रोमँटिक वाटतात. परंतु, वास्तवातही कोणी अभद्र बोलले की आपण, त्याला तिथेच हटकतो. कारण, वाईट गोष्टींचा उच्चारही नको. म्हणूनच मनात कितीही वाईट विचार आले, तरी ते एकवेळ कागदावर लिहून काढावे, फाडून टाकावे, पण त्यांचा उच्चार करू नये.

गुगलवर एखादी गोष्ट सर्च केली, की गुगलशी संलग्न असलेल्या सर्व समाज माध्यमांवर संबंधित जाहिराती झळकू लागतात. कारण, या गोष्टी सर्व्हरने आपापसात जोडलेल्या असतात. त्याचप्रमाणे जी गोष्ट आपण सातत्याने बोलतो, त्या गोष्टीचे आपल्याभोवती वलय तयार होते आणि तशाच गोष्टी घडू लागतात. हा काही चमत्कार नाही, तर हे आपल्याच विचारांनी निर्माण केलेले जाळे आहे. त्यात न अडकता आपल्याला अलिप्तपणे बाहेर पडायचे असेल, तर नकारात्मक विचार, उच्चार टाळले पाहिजेत. बोलायचेच आहे, तर चांगलेच बोलूया, चांगलेच वागूया, चांगलाच विचार करूया. 

आपण बऱ्याचदा, आपल्याजवळ काय आहे, ते न पाहता, काय नाही, त्याचा विचार करत दु:खी होतो. येत्या वर्षात आणि पुढील आयुष्यातही आपल्याला उणिवांचा विचार न करता, जमेची बाजू कोणती, त्याचा विचार करायचा आहे. जे नाही, त्यावर मात कशी करता येईल, यासाठी प्रयत्न करायचा आहे. तसे केल्याने आपोआपच आपल्या विचारात परिवर्तन घडेल. आपल्या मनाला नैराश्य शिवणार देखील नाही आणि शिवलेच तरी त्यातून बाहेर पडण्याची आपल्या मनाची तयारी असेल.

आपल्या आयुष्यातला मोठा काळ रुसव्या, पुâगव्यांमध्ये, कोण काय बोलला, कसा वागला, या गोष्टींच्या चिंतनात खर्च होतो. त्यामुळे नात्यांचा आणि वेळेच क्षय होतो. ज्या गोष्टींचा त्रास होतो, त्या तिथेच सोडून, दुर्लक्षित करून पुढच्या कामाला सुरुवात केली, तर भूतकाळातल्या कटू आठवणींचा आपल्याला त्रास होणार नाही. फार काळ कोणावर राग न ठेवता, नदीच्या प्रवाहाप्रमाणे आयुष्यही प्रवाहित ठेवण्याचा प्रयत्न करूया.

कटू आठवणी मागे सोडून भविष्य घडवण्यासाठी सकारात्मकतेने पाऊल टाकणे गरजेचे आहे. आपल्या परिस्थितीतून आपल्याला एकच व्यक्ती बाहेर काढू शकते, ती म्हणजे आपण स्वत:! यासाठीच चांगल्या कार्याचा, चांगल्या विचाराचा आणि चांगल्या कृतीचा श्रीगणेशा करूया आणि नव वर्षाचे सहर्षाने स्वागत करूया.

हेही वाचा :2020 इंग्रजी वर्षाअखेरीस गुरुपुष्यामृत योग, ही तर नववर्षाच्या अनुकूलतेची नांदीच!

टॅग्स :New Yearनववर्ष