शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारत एक हिंदू राष्ट्र, आपल्या सुरक्षिततेसाठी...; सरसंघचालक मोहन भागवत यांचं हिंदूंना मोठं आवाहन
2
तिलक वर्मा की नितीश रेड्डी? मयंक यादव की रवी बिश्नोई? आकाश चोप्राने निवडली टीम इंडियाची Playing XI
3
"..तर मी स्वतः पीएम नरेंद्र मोदींसाठी प्रचार करेन", अरविंद केजरीवालांचे मोठे वक्तव्य
4
Maharashtra Elections 2024: दादाजी भुसेंविरोधात उद्धव ठाकरेंचा उमेदवार ठरला!
5
चेंबूर आग दुर्घटनेची होणार सखोल चौकशी; मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाख देण्याची CM शिंदेंची घोषणा
6
Beed: चिमुरडीने फोटो बघितला अन् बलात्कारी शिक्षकाला पोलिसांनी केली अटक
7
Israel-Hamas war : हिजबुल्लाहने सेल्सगर्लवर विश्वास ठेवून केली चूक; झाला मोठा घात, इस्त्रायल १० वर्षापासून पेजरवर काम करत होते
8
अजित पवारांना बसणार मोठा झटका! 'तुतारी हाती घ्यायची का?', रामराजेंना कार्यकर्त्यांनी दिला 'होकार'
9
"पिझ्झा घेऊन पोलीस स्टेशनमध्ये जाता, ही मस्ती घरी दाखवायची"; सुप्रिया सुळेंची सुनील टिंगरेंवर जहरी टीका
10
"मोदींनी भाषण करण्यापूर्वी थोडा..."; संजय राऊतांनी पंतप्रधानांना पाटील, राठोडांवरून घेरलं
11
धक्कादायक! श्री रामची भूमिका साकारताना स्टेजवरच हृदयविकाराचा झटका, लाइव्ह परफॉर्मन्स दरम्यान मृत्यू झाला
12
गाझातील मशिदी आहेत 'हमासचा अड्डा'? इस्रायल बनवतोय निशाणा, एअर स्ट्राइकमध्ये अनेकांचा मृत्यू
13
चुकीच्या दिशेने आलेल्या टेम्पोची कारला जोरदार धडक; माय लेकरांसह चौघे ठार, तिघे गंभीर
14
EPF च्या पैशाने होमलोनची परतफेड करणे योग्य आहे का? समजून घ्या हिशोब
15
आता नेतन्याहू फ्रान्सवर भडकले! लेबनॉनमध्ये फ्रेन्च कंपनीवर इस्रायची बॉम्बिंग, नेमकं काय घडलं?
16
काँग्रेस आमदार हिरामण खोसकर अचानक शरद पवारांच्या भेटीला; कारण आले समोर
17
बच्चू कडूंना CM शिंदेंनी दिला जबर झटका! प्रहारचा 'हा' आमदार शिवसेनेत करणार प्रवेश?
18
चेंबुरमध्ये पहाटे अग्नितांडव; चाळीत लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू
19
"त्यांना लाज वाटली पाहिजे", पंतप्रधान नेतन्याहू फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांवर भडकले
20
दुकानातल्या रॉकेलने केला घात; छेदिराम गुप्तांनी पत्नी, मुलगा, सून नातवडं सर्वांनाच गमावलं

देव कोणत्या स्वरूपात मदतीला येईल, हे कोणीही सांगू शकत नाही, आता हीच गोष्ट पहा ना...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2021 5:39 PM

प्रसंग कोणताही असो, मनोबल ढासळू देऊ नका, ईश्वराप्रती श्रद्धा कमी होऊ देऊ नका, मदतीचा हात मिळतोच! कधी देवाकडून तर कधी देवदूतांकडून!

सुटीच्या काळात फेरफटका मारण्यासाठी एक माणूस समुद्रकिनारी गेला. हवामानाचा अंदाज घेत त्याने एकट्याने समुद्रसफारी करण्याचा निर्णय घेतला. एक नाव घेऊन तो समुद्रसफारीला निघाला. लाटांवरून नौका वर खाली डुचमळत होती. सुरुवातीला थोडी भीती वाटत हळू हळू तो सरावला. परंतु, समुद्रसफारीचा आनंद घेत आपण किनाऱ्यापासून बरेच दूर आलो आहोत, हे त्याच्या लक्षात येताच त्याने नाव परत नेण्यासाठी वळवली. अचानक पाण्यामध्ये भोवरा तयार झाला आणि पाहता पाहता लाटांचे वेटोळे नावेला गोल गोल घुमवू लागले.

नावेत बसलेला माणूस देवाचे नाव घेत जीव मुठीत घेऊन प्राण वाचवण्यासाठी धडपडू लागला. त्या भोवऱ्यात नाव अशीकाही अडकली, की नावेचा चुराडा झाला. सुदैवाने तो वाचला आणि तो भोवरा शांत झाल्यावर लाटेसरशी दूर निर्जन बेटावर फेकला गेला. 

त्याची शुद्ध हरपली होती. तो शुद्धीवर आला तेव्हा सभोवताली कोणीच नाही पाहून खूप घाबरला. त्याला सगळा प्रसंग आठवला. आपण जिवंत आहोत, याचा त्याला आनंद वाटला. त्याने मनोमन देवाचे आभार मानले. देवाला सांगितले, `तू जगवले आहेस तर आता पुढे जाण्याचा मार्गही तूच दाखव!'

भूकेची वेळ झाली. तिथल्या जंगलात वणवण फिरून त्याने फळे गोळा केली आणि एक रात्र तिथल्या भयाण जंगलात वास्तव्य केले. पुढचा मार्ग दिसेपर्यंत तिथे राहण्याशिवाय पर्याय नव्हता. परंतु जंगली श्वापदांची भीती होतीच. म्हणून त्याने काट्याकुट्या गोळा करून झोपडी बांधली. बऱ्याच मेहनतीने झोपडी बांधल्यावर त्याने स्वत:चीच पाठ थोपटली, तेवढ्यात... वातावरणात एकाएक बदल झाला. निरभ्र आकाशात काळे ढग गोळा झाले आणि कडाड कडकड अशी वीज चमकली आणि क्षणार्धात वीज कोसळून झोपडीचा भूगा झाला. झोपडीला लागलेल्या आगीच्या ज्वाला आकाशाकडे झेपावत होत्या.

तो माणूस देवाला आणि दैवाला दोष देत कपाळाला हात लावून आक्रोश करू लागला. देवाला वाट्टेल ते बोलू लागला. काही वेळात तिथे मोठा आवाज आला आणि वर आर्मीचे हेलिकॉप्टर दिसले. त्यातून दोन माणसं दुर्बिणीने झोपडीच्या दिशेने पाहत होती. तिथे माणूस दिसताच त्यांनी बचाव कार्य सुरू केले आणि अवघ्या काही मिनीटांत त्या माणसाला निर्जन बेटावरून सुखरूप त्याच्या जागी पोहोचवले. झोपडी जळली म्हणून देवाला दोष देणारा तो, जळत्या झोपडीकडे लक्ष वेधून देवदूतांना पाठवल्याबद्दल देवाचे आभार मानू लागला.

म्हणून प्रसंग कोणताही असो, मनोबल ढासळू देऊ नका, ईश्वराप्रती श्रद्धा कमी होऊ देऊ नका, मदतीचा हात मिळतोच! कधी देवाकडून तर कधी देवदूतांकडून!